शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

शहरातील दगडखाणी रडारवर

By admin | Updated: March 26, 2016 02:28 IST

औद्योगिक वसाहतीमधील अनेक दगडखाणीत बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू असल्याचे उघड झाले आहे. पाच दगडखाणी सील केल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात अवैध उत्खननाव्यतिरिक्त

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

औद्योगिक वसाहतीमधील अनेक दगडखाणीत बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू असल्याचे उघड झाले आहे. पाच दगडखाणी सील केल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात अवैध उत्खननाव्यतिरिक्त अनेक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. खाणी भाड्याने देणे, खाणींच्या जागेवर इतर व्यवसायही केले जात असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी नियम व अटींचे उल्लंघन करणाऱ्या दगडखाणी सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईतील पाच दगडखाणी सील केल्या आहेत. अजून सहा खाणींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. वास्तविक नेरूळ ते दिघापर्यंतचा डोंगर खाणचालकांनी पोखरून टाकला आहे. मुंबई, नवी मुंबई ते पनवेलपर्यंत बांधकाम व्यवसाय तेजीत असल्याने खडीला प्रचंड मागणी आहे. यामुळे खाणमालकांनी नियम धाब्यावर बसविण्यास सुरवात केली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. देशातील सर्वाधिक धुळीचे प्रदूषण असणाऱ्या परिसरामध्ये नवी मुंबईचाही समावेश होतो. खाणींमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी आरएसपीएमच्या मात्रेसह सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रदूषणामुळे शहरवासीयांना श्वसनाचे आजार होवू लागले आहेत. खाणकामगार व या परिसरात राहणाऱ्या अनेकांना क्षय व इतर आजार होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. दगड, खडी विकून जास्तीत जास्त पैसे मिळविण्याची स्पर्धा सुरू झाली असून त्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी काहीच उपाययोजना केली जात नाही. नेरूळ परिसरात १०६, तुर्भेमध्ये ९२, कोपरखैरणे ८ व दिघामध्ये ३ दगडखाणी होत्या. सद्य:स्थितीमध्ये ८० खाणी सुरू आहेत. दगडखाण चालक शासनाच्या अटी व नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करत आहेत. अनेकांनी खाणीमधील मोकळ्या जागा काँक्रीट मिक्सिंगच्या प्लांटसाठी भाड्याने दिल्या आहेत. अनेकांनी झोपड्या बांधून त्या भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. हॉटेलपासून इतर अनेक व्यवसाय करण्यासाठी जागा परस्पर दिल्या आहेत. दगडखाण भाडेतत्त्वावर देता येत नाही, यामुळे भागीदारी करार केले आहेत. ज्यामध्ये मूळ मालकांना १ ते १० टक्के व दुसऱ्या भागीदारास ९0 ते ९९ टक्के वाटा देण्यात येत आहे. अवैध कामकाज वैध ठरविण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. शासनाची रॉयल्टी चुकविण्यात येत असल्याचेही अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत. खडीची वाहतूक करणारे अनेक जण शासकीय यंत्रणांना गुंगारा देवून रॉयल्टी चुकवत आहेत. अनेक वेळा शासकीय यंत्रणांचेच त्यांना अभय असल्याचे बोलले जाते. वास्तविक जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी स्वत: या परिसराची पाहणी केल्यास येथील अनागोंदी कारभार निदर्शनास येईल, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. शहरवासीयांच्या हितासाठी डोंगर पोखरण्याचा हा व्यवसाय बंद व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.