शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

शहरातील दगडखाणी रडारवर

By admin | Updated: March 26, 2016 02:28 IST

औद्योगिक वसाहतीमधील अनेक दगडखाणीत बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू असल्याचे उघड झाले आहे. पाच दगडखाणी सील केल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात अवैध उत्खननाव्यतिरिक्त

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

औद्योगिक वसाहतीमधील अनेक दगडखाणीत बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू असल्याचे उघड झाले आहे. पाच दगडखाणी सील केल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात अवैध उत्खननाव्यतिरिक्त अनेक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. खाणी भाड्याने देणे, खाणींच्या जागेवर इतर व्यवसायही केले जात असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी नियम व अटींचे उल्लंघन करणाऱ्या दगडखाणी सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईतील पाच दगडखाणी सील केल्या आहेत. अजून सहा खाणींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. वास्तविक नेरूळ ते दिघापर्यंतचा डोंगर खाणचालकांनी पोखरून टाकला आहे. मुंबई, नवी मुंबई ते पनवेलपर्यंत बांधकाम व्यवसाय तेजीत असल्याने खडीला प्रचंड मागणी आहे. यामुळे खाणमालकांनी नियम धाब्यावर बसविण्यास सुरवात केली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. देशातील सर्वाधिक धुळीचे प्रदूषण असणाऱ्या परिसरामध्ये नवी मुंबईचाही समावेश होतो. खाणींमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी आरएसपीएमच्या मात्रेसह सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रदूषणामुळे शहरवासीयांना श्वसनाचे आजार होवू लागले आहेत. खाणकामगार व या परिसरात राहणाऱ्या अनेकांना क्षय व इतर आजार होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. दगड, खडी विकून जास्तीत जास्त पैसे मिळविण्याची स्पर्धा सुरू झाली असून त्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी काहीच उपाययोजना केली जात नाही. नेरूळ परिसरात १०६, तुर्भेमध्ये ९२, कोपरखैरणे ८ व दिघामध्ये ३ दगडखाणी होत्या. सद्य:स्थितीमध्ये ८० खाणी सुरू आहेत. दगडखाण चालक शासनाच्या अटी व नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करत आहेत. अनेकांनी खाणीमधील मोकळ्या जागा काँक्रीट मिक्सिंगच्या प्लांटसाठी भाड्याने दिल्या आहेत. अनेकांनी झोपड्या बांधून त्या भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. हॉटेलपासून इतर अनेक व्यवसाय करण्यासाठी जागा परस्पर दिल्या आहेत. दगडखाण भाडेतत्त्वावर देता येत नाही, यामुळे भागीदारी करार केले आहेत. ज्यामध्ये मूळ मालकांना १ ते १० टक्के व दुसऱ्या भागीदारास ९0 ते ९९ टक्के वाटा देण्यात येत आहे. अवैध कामकाज वैध ठरविण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. शासनाची रॉयल्टी चुकविण्यात येत असल्याचेही अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत. खडीची वाहतूक करणारे अनेक जण शासकीय यंत्रणांना गुंगारा देवून रॉयल्टी चुकवत आहेत. अनेक वेळा शासकीय यंत्रणांचेच त्यांना अभय असल्याचे बोलले जाते. वास्तविक जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी स्वत: या परिसराची पाहणी केल्यास येथील अनागोंदी कारभार निदर्शनास येईल, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. शहरवासीयांच्या हितासाठी डोंगर पोखरण्याचा हा व्यवसाय बंद व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.