शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

मानकु लेत शेतीला उधाणाचा फटका

By admin | Updated: November 17, 2016 06:01 IST

समुद्राच्या उधाणाचा फटका अलिबाग तालुक्यातील मानकुले येथील शेतीला बसला आहे.

अलिबाग : समुद्राच्या उधाणाचा फटका अलिबाग तालुक्यातील मानकुले येथील शेतीला बसला आहे. समुद्राचे खारेपाणी शेतामध्ये घुसून तेथील शेतक ऱ्यांचे नुकसान झाले आहे. तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी खारभूमी सर्वेक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.मानकुले परिसरात सातत्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसतच असते. खारे पाणी शेतामध्ये घुसून आतापर्यंत हजारो हेक्टर शेतीचे क्षेत्र नष्ट झाले आहे. शेतीमध्ये खारे पाणी घुसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात खारफुटी वनस्पतींचे जंगल निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन तर घेता येतच नाही, शिवाय तेथील शेतकरी शेतीही विकू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेत. सरकारने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. तेथे असणारी खारबंदिस्ती तुटली. उधाणामुळे समुद्राचे खारे पाणी शेतामध्ये घुसले. यामुळे शेतक ऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.खारभूमी विभागाकडून २००६-०७ पासून या विभागात खारबंदिस्तीचे काम झालेले नाही; परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये या ठिकाणी २०१३-१४ आणि २०१६-१७ या कालावधीमध्ये सुमारे पाच लाख ९३ हजार ६०६ रु पये खर्च करण्यात आले आहेत. एकही रु पया खर्च झालेला नसताना लाखोंची कामे कुठे झाली या कामांची चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर चंद्रकांत पाटील, गजाजन पाटील, नवनाथ पाटील, महादेव पाटील, बलदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. नुकसानभरपाई सरकारच्या तिजोरीतून नको, तर खारभूमीचे कनिष्ठ अभियंता यांच्या पगारातून द्यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खारभूमीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)कामाच्या चौकशीची मागणी : खारभूमी विभागाकडून २००६-०७ पासून या विभागात खारबंदिस्तीचे काम झालेले नाही; परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये या ठिकाणी २०१३-१४ आणि २०१६-१७ या कालावधीमध्ये सुमारे पाच लाख ९३ हजार ६०६ रु पये खर्च करण्यात आले आहेत. एकही रु पया खर्च झालेला नसताना लाखो रु पयांची कामे कुठे झाली या कामांची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर चंद्रकांत पाटील, गजाजन पाटील, नवनाथ पाटील, महादेव पाटील, बलदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.