शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मानकु लेत शेतीला उधाणाचा फटका

By admin | Updated: November 17, 2016 06:01 IST

समुद्राच्या उधाणाचा फटका अलिबाग तालुक्यातील मानकुले येथील शेतीला बसला आहे.

अलिबाग : समुद्राच्या उधाणाचा फटका अलिबाग तालुक्यातील मानकुले येथील शेतीला बसला आहे. समुद्राचे खारेपाणी शेतामध्ये घुसून तेथील शेतक ऱ्यांचे नुकसान झाले आहे. तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी खारभूमी सर्वेक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.मानकुले परिसरात सातत्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसतच असते. खारे पाणी शेतामध्ये घुसून आतापर्यंत हजारो हेक्टर शेतीचे क्षेत्र नष्ट झाले आहे. शेतीमध्ये खारे पाणी घुसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात खारफुटी वनस्पतींचे जंगल निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन तर घेता येतच नाही, शिवाय तेथील शेतकरी शेतीही विकू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेत. सरकारने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. तेथे असणारी खारबंदिस्ती तुटली. उधाणामुळे समुद्राचे खारे पाणी शेतामध्ये घुसले. यामुळे शेतक ऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.खारभूमी विभागाकडून २००६-०७ पासून या विभागात खारबंदिस्तीचे काम झालेले नाही; परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये या ठिकाणी २०१३-१४ आणि २०१६-१७ या कालावधीमध्ये सुमारे पाच लाख ९३ हजार ६०६ रु पये खर्च करण्यात आले आहेत. एकही रु पया खर्च झालेला नसताना लाखोंची कामे कुठे झाली या कामांची चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर चंद्रकांत पाटील, गजाजन पाटील, नवनाथ पाटील, महादेव पाटील, बलदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. नुकसानभरपाई सरकारच्या तिजोरीतून नको, तर खारभूमीचे कनिष्ठ अभियंता यांच्या पगारातून द्यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खारभूमीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)कामाच्या चौकशीची मागणी : खारभूमी विभागाकडून २००६-०७ पासून या विभागात खारबंदिस्तीचे काम झालेले नाही; परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये या ठिकाणी २०१३-१४ आणि २०१६-१७ या कालावधीमध्ये सुमारे पाच लाख ९३ हजार ६०६ रु पये खर्च करण्यात आले आहेत. एकही रु पया खर्च झालेला नसताना लाखो रु पयांची कामे कुठे झाली या कामांची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर चंद्रकांत पाटील, गजाजन पाटील, नवनाथ पाटील, महादेव पाटील, बलदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.