शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

मानकु लेत शेतीला उधाणाचा फटका

By admin | Updated: November 17, 2016 06:01 IST

समुद्राच्या उधाणाचा फटका अलिबाग तालुक्यातील मानकुले येथील शेतीला बसला आहे.

अलिबाग : समुद्राच्या उधाणाचा फटका अलिबाग तालुक्यातील मानकुले येथील शेतीला बसला आहे. समुद्राचे खारेपाणी शेतामध्ये घुसून तेथील शेतक ऱ्यांचे नुकसान झाले आहे. तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी खारभूमी सर्वेक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.मानकुले परिसरात सातत्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसतच असते. खारे पाणी शेतामध्ये घुसून आतापर्यंत हजारो हेक्टर शेतीचे क्षेत्र नष्ट झाले आहे. शेतीमध्ये खारे पाणी घुसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात खारफुटी वनस्पतींचे जंगल निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन तर घेता येतच नाही, शिवाय तेथील शेतकरी शेतीही विकू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेत. सरकारने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. तेथे असणारी खारबंदिस्ती तुटली. उधाणामुळे समुद्राचे खारे पाणी शेतामध्ये घुसले. यामुळे शेतक ऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.खारभूमी विभागाकडून २००६-०७ पासून या विभागात खारबंदिस्तीचे काम झालेले नाही; परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये या ठिकाणी २०१३-१४ आणि २०१६-१७ या कालावधीमध्ये सुमारे पाच लाख ९३ हजार ६०६ रु पये खर्च करण्यात आले आहेत. एकही रु पया खर्च झालेला नसताना लाखोंची कामे कुठे झाली या कामांची चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर चंद्रकांत पाटील, गजाजन पाटील, नवनाथ पाटील, महादेव पाटील, बलदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. नुकसानभरपाई सरकारच्या तिजोरीतून नको, तर खारभूमीचे कनिष्ठ अभियंता यांच्या पगारातून द्यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खारभूमीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)कामाच्या चौकशीची मागणी : खारभूमी विभागाकडून २००६-०७ पासून या विभागात खारबंदिस्तीचे काम झालेले नाही; परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये या ठिकाणी २०१३-१४ आणि २०१६-१७ या कालावधीमध्ये सुमारे पाच लाख ९३ हजार ६०६ रु पये खर्च करण्यात आले आहेत. एकही रु पया खर्च झालेला नसताना लाखो रु पयांची कामे कुठे झाली या कामांची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर चंद्रकांत पाटील, गजाजन पाटील, नवनाथ पाटील, महादेव पाटील, बलदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.