शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

ज्येष्ठ नागरिकांचे सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 01:54 IST

ज्येष्ठ नागरिकांचे सर्व प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोडविले जातील, असे आश्वासन सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये दिले होते.

नामदेव मोरे, नवी मुंबई ज्येष्ठ नागरिकांचे सर्व प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोडविले जातील, असे आश्वासन सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये दिले होते. परंतु प्रत्यक्षात एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. ज्येष्ठ नागरिक धोरणासाठी निधीची तरतूदच केली नसल्याने सरकारने फसवणूक केल्याची भावना सव्वा कोटी ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सरकारविषयी असंतोष निर्माण झाला असून, ७ एप्रिलला प्रत्येक जिल्ह्यात भाजपा सरकारचा निषेध केला जाणार आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा कोटी झाली असून त्यांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असताना त्यांनी घाईगडबडीत ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले; परंतु अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद केली नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येताच ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात शपथविधी झाल्यापासून अनेक पत्रे व स्मरणपत्रे पाठवूनही ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीला भेटण्याची वेळही दिली जात नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह ११ आमदारांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी मांडली होती. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास शासन कटिबद्ध आहे. अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद केली जाईल व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील ज्येष्ठ नागरिक डिसेंबरपासून अर्थसंकल्पाची वाट पाहात होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पूर्ण भाषण टीव्हीसमोर थांबून ऐकले, परंतु ज्येष्ठांसाठीच काहीच सुविधा नसल्याचे लक्षात आल्याने ज्येष्ठांचा भ्रमनिरास झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यापासून ज्येष्ठ नागरिकांना भेट देण्याचेच नाकारले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही भेटीसाठी पाच मिनिटांची वेळही दिली जात नाही. पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्रीच ज्येष्ठांची अवहेलना करीत असतील तर सामान्य नागरिक ज्येष्ठांचा आदर कसा करणार, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक संघटनांनी उपस्थित केला आहे. शासनाच्या विरोधात ७ एप्रिलपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच दिवशी राज्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.