शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
3
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
4
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
5
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
6
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
7
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
8
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
9
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
10
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
11
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
12
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
13
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
14
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
15
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
16
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
17
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
18
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
19
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  

ज्येष्ठ नागरिकांचे सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 01:54 IST

ज्येष्ठ नागरिकांचे सर्व प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोडविले जातील, असे आश्वासन सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये दिले होते.

नामदेव मोरे, नवी मुंबई ज्येष्ठ नागरिकांचे सर्व प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोडविले जातील, असे आश्वासन सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये दिले होते. परंतु प्रत्यक्षात एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. ज्येष्ठ नागरिक धोरणासाठी निधीची तरतूदच केली नसल्याने सरकारने फसवणूक केल्याची भावना सव्वा कोटी ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सरकारविषयी असंतोष निर्माण झाला असून, ७ एप्रिलला प्रत्येक जिल्ह्यात भाजपा सरकारचा निषेध केला जाणार आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा कोटी झाली असून त्यांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असताना त्यांनी घाईगडबडीत ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले; परंतु अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद केली नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येताच ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात शपथविधी झाल्यापासून अनेक पत्रे व स्मरणपत्रे पाठवूनही ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीला भेटण्याची वेळही दिली जात नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह ११ आमदारांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी मांडली होती. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास शासन कटिबद्ध आहे. अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद केली जाईल व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील ज्येष्ठ नागरिक डिसेंबरपासून अर्थसंकल्पाची वाट पाहात होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पूर्ण भाषण टीव्हीसमोर थांबून ऐकले, परंतु ज्येष्ठांसाठीच काहीच सुविधा नसल्याचे लक्षात आल्याने ज्येष्ठांचा भ्रमनिरास झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यापासून ज्येष्ठ नागरिकांना भेट देण्याचेच नाकारले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही भेटीसाठी पाच मिनिटांची वेळही दिली जात नाही. पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्रीच ज्येष्ठांची अवहेलना करीत असतील तर सामान्य नागरिक ज्येष्ठांचा आदर कसा करणार, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक संघटनांनी उपस्थित केला आहे. शासनाच्या विरोधात ७ एप्रिलपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच दिवशी राज्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.