शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांचे सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 01:54 IST

ज्येष्ठ नागरिकांचे सर्व प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोडविले जातील, असे आश्वासन सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये दिले होते.

नामदेव मोरे, नवी मुंबई ज्येष्ठ नागरिकांचे सर्व प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोडविले जातील, असे आश्वासन सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये दिले होते. परंतु प्रत्यक्षात एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. ज्येष्ठ नागरिक धोरणासाठी निधीची तरतूदच केली नसल्याने सरकारने फसवणूक केल्याची भावना सव्वा कोटी ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सरकारविषयी असंतोष निर्माण झाला असून, ७ एप्रिलला प्रत्येक जिल्ह्यात भाजपा सरकारचा निषेध केला जाणार आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा कोटी झाली असून त्यांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असताना त्यांनी घाईगडबडीत ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले; परंतु अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद केली नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येताच ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात शपथविधी झाल्यापासून अनेक पत्रे व स्मरणपत्रे पाठवूनही ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीला भेटण्याची वेळही दिली जात नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह ११ आमदारांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी मांडली होती. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास शासन कटिबद्ध आहे. अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद केली जाईल व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील ज्येष्ठ नागरिक डिसेंबरपासून अर्थसंकल्पाची वाट पाहात होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पूर्ण भाषण टीव्हीसमोर थांबून ऐकले, परंतु ज्येष्ठांसाठीच काहीच सुविधा नसल्याचे लक्षात आल्याने ज्येष्ठांचा भ्रमनिरास झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यापासून ज्येष्ठ नागरिकांना भेट देण्याचेच नाकारले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही भेटीसाठी पाच मिनिटांची वेळही दिली जात नाही. पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्रीच ज्येष्ठांची अवहेलना करीत असतील तर सामान्य नागरिक ज्येष्ठांचा आदर कसा करणार, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक संघटनांनी उपस्थित केला आहे. शासनाच्या विरोधात ७ एप्रिलपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच दिवशी राज्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.