शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात, सढळ हाताने होऊद्या फोडणी; आवक वाढली

By नामदेव मोरे | Updated: March 15, 2024 19:52 IST

महागाईचा उच्चांक गाठलेल्या लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात झाली आहे.

नवी मुंबई: महागाईचा उच्चांक गाठलेल्या लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी २५० टन लसणाची आवक झाली आहे. एक महिन्यात बाजारभाव प्रतिकिलो २२० ते ३७० वरून ५० ते १६० रुपयांवर आले आहेत. निम्यापेक्षा दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. देशभर लसणाची टंचाई निर्माण झाल्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान देशभर बाजारभाव सातत्याने वाढू लागले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाचे दर २२० ते ३७० रुपये किलो झाले होते. 

किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ४४० ते ७०० रुपये किलोपर्यंत पोहचले होते. जुन्या मालाचा साठा संपत आल्यामुळे व नवीन माल मार्केटमध्ये येण्यास विलंब झाल्याने प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. परंतु काही दिवसांपासून लसूणची आवक प्रचंड वाढू लागली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सरासरी २५० टन आवक होत आहे. आवक वाढल्याने दर घसरू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये प्रतिकिलो ५० ते १६० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. किरकोळ मार्केटमध्ये १०० ते २५० रुपये दराने लसणाची विक्री होत आहे. यापुढे लसणाचे दर अजून कमी होण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असून राज्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये दर घसरले आहेत.

राज्यातील बाजार समितीमधील लसूणचे दरबाजार समिती - बाजारभाव

  • मुंबई ५० ते १६०
  • सोलापूर ८० ते १३०
  • अकलुज ८० ते १००
  • जळगाव ३० ते११०
  • श्रीरामपूर ८० ते१५०
  • राहता ८० ते १३०
  • कल्याण १३० ते २१०
  • अमरावती ५० ते १२०
  • जळगाव ५० ते २००
  • सांगली ५० ते १४०
  • पुणे ५० ते १४०
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई