शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

रोह्यात वणव्याची मालिका सुरूच

By admin | Updated: May 2, 2017 03:07 IST

होळी सणापासून जंगल भागात लावल्या जाणाऱ्या वणव्यांची मालिका सुरूच असून, रोहे तालुक्यातील जंगल भागात रोज कुठे ना

रोहा : होळी सणापासून जंगल भागात लावल्या जाणाऱ्या वणव्यांची मालिका सुरूच असून, रोहे तालुक्यातील जंगल भागात रोज कुठे ना कुठे तरी वणवे लागत असल्याने जंगल परिसर रात्रंदिवस धुमसत आहे. शनिवारी रात्री संभे येथील गावानजीकच्या जंगलात मोठा वणवा लागल्याने वनसंपत्तीची मात्र मोठी हानी झाली आहे.एका बाजूला जंगल भागात लागणाऱ्या वणव्यांवर उपाययोजना करायची नाही, तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम करायचे. आहेत तीच जंगले वाचविली तरी सध्या भेडसावणाऱ्या समस्या दूर होतील, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. केवळ वणवेच नाही, तर इतर अनेक घटक जंगल संपत्तीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत असताना याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. होळी सणाच्या प्रारंभापासून जंगल भागात वणव्यांना प्रारंभ झाला असून जंगल भागात लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे तालुक्यातील मेढे, खांब, सुकेळी, कोलाड, संभे, किल्ला, धाटाव विभागातील जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडू लागली आहेत. वणव्यामुळे वनस्पती जीवन व प्राणिजीवन यांची अपरिमित हानी होत असताना पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. सरपण गोळा करणे, जंगलात दळी भाग तयार करणे, शिकार करणे, कोळशाची निर्मिती, जंगल भागातील इतर महत्त्वाची संपत्ती मिळविणे आदींसाठी जंगल भागात राजरोसपणे वणवे लावले जात आहेत. स्वत:च्या स्वार्थापोटी वणवे लावल्यामुळे जंगले नष्ट होत आहेत. परिणामी, जंगल व प्राणी संपत्तीची अपरिमित हानी होत आहे. वणवे लावणाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने व कायद्याचे भय नसल्याने त्यांच्याकडून वारंवार अशाप्रकारचे कृत्य होताना दिसत आहे. वास्तविक पाहता वणवे लावणाऱ्यांना जोपर्यंत कडक शासन होत नाही, तोपर्यंत वणवे लावण्याच्या घटना या वारंवार होणारच, अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त के ली जात आहे. (वार्ताहर)वणव्यांमुळे औषधी वनस्पतींचे नुकसानजंगल भागात लागणाऱ्या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलातील औषधी वनस्पती नष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे या औषधी वनस्पती जतन करणे गरजेचे झाले आहे. यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.कोकणात राब भाजणीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, यामुळे शेतकरी राब भाजत असतानादेखील जंगलात वणवे लागण्याचे प्रकार घडत आहेत. जंगलामध्ये पूर्वीच्या काळी वणवे आपोआप लागायचे, मात्र आज वणवे लावले जात आहेत. यामुळे वनसंपत्तीबरोबरच प्राण्यांवरही परिणाम होत असून त्या वन्यप्राण्यांच्याही सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर येत आहे.