शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शहरात क्रीडा सुविधांची वानवा; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 05:27 IST

सुविधा नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या स्पर्धांचे नियोजन करताना पालिकेच्या क्रीडा विभागाला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ४८ प्रकारच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरविण्यात येतात. जिल्हास्तरीय स्पर्धा असल्याने या क्रीडा स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील सर्वच शाळांमधील विद्यार्थी सहभागी होतात; परंतु काही निवडक खेळ सोडल्यास इतर स्पर्धेच्या सुविधा महापालिकेकडे नसल्याने महापालिकेला या स्पर्धा घेण्यासाठी खासगी संस्था आणि खासगी शाळांची मदत घेऊन क्रीडा सुविधांचा वापर करावा लागत आहे. सुविधा नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या स्पर्धांचे नियोजन करताना पालिकेच्या क्रीडा विभागाला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.क्रीडा क्षेत्रातील सुविधा देण्यास नवी मुंबई महापालिका मागे राहिली आहे. प्रत्येक शहरातील खेळाडूंना वाव मिळावा, यासाठी केंद्र शासनाच्या स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडिया या उपक्रमाअंतर्गत राज्य शासनाच्या क्र ीडा व युवक संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महापालिकेला जिल्हास्तरीय स्पर्धा खेळविण्याचा दर्जा दिला आहे. जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई शहरात २००८ सालापासून महानगरपालिका क्षेत्र जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. यावर्षी सुरू झालेल्या या स्पर्धेत विविध ४८ क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत; परंतु महापालिकेकडे क्रिकेट, कबड्डी आणि फुटबॉल या खेळांव्यतिरिक्त इतर स्पर्धा घेण्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत. त्यामुळे नवी मुंबईतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन, नेरु ळ जिमखाना, फादर अ‍ॅग्नेल स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल ऐरोली, टिळक कॉलेज नेरुळ, न्यू हॉरिजन पब्लिक स्कूल नेरु ळ आदी शाळा आणि खासगी संस्थांची मदत घ्यावी लागत लागत आहे. तसेच पालिकेच्या शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना इतर क्रीडा स्पर्धा शिकवल्या जात नसल्याने अनेक खेळाडू या स्पर्धांच्या प्रशिक्षणापासून वंचित राहत आहेत. नवी मुंबईतील खेळाडूंना कबड्डी, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स, व्हॉलिबॉल या स्पर्धांचे प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेने २०१२ साली ठरावदेखील मंजूर केले होते; परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या सुविधा होऊ शकलेल्या नाहीत. यामुळे शहरातील खेळाडूंना सरावासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी जावे लागत आहे.नवी मुंबई शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहेत; परंतु या सुविधा नसल्याने त्यांनादेखील सरावासाठी शहराबाहेर जावे लागत आहे. तसेच या खेळांच्या सुविधा पालिकेने निर्माण केल्या नसल्याने शहरातील पालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि आर्थिक परिस्थितीने गरीब खेळाडू या खेळांच्या प्रशिक्षणापासून वंचित राहत आहेत. पालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी क्रीडा विभागासाठी तरतूद करण्यात येते; परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे क्रीडा क्षेत्रात सुविधा निर्माण करण्यासाठी निधी वापरला जात नाही. सन २०१८-१९ च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात ५२ कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये क्रीडा संकुल बनविणे सात कोटी, तरण तलावासाठी सहा कोटी, मैदाने विकसित करण्यासाठी १७ कोटी, आंतरक्रीडा संकुल बांधण्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.शहरातील खेळाडू घडविण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात क्र ीडासाठी ठेवण्यात आलेला निधी जास्तीत जास्त प्रमाणावर वापरण्यात येत आहे. ऐरोली येथे क्र ीडा संकुल बांधणीसाठी भूखंड मिळाला असून, त्या ठिकाणीदेखील लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. शहरात राहणाºया विद्यार्थी खेळाडूंना प्रशिक्षण देता यावे, यासाठी विविध वास्तूदेखील बांधण्यात येणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून कबड्डी, खो-खो यांसारख्या काही खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.- नितीन काळे,उपायुक्त क्र ीडा विभाग

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका