शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मुंबईतील मसाला मार्केटमध्ये अतिक्रमण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 01:59 IST

गोडाऊन तीन फूट वाढविले : सार्वजनिक वापराची जागाही व्यापली : मंजुरीपेक्षा दुप्पट चटईक्षेत्राचा वापर

नामदेव मोरे 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे. पोटमाळा व वाढीव एक मजल्याचे बांधकाम केल्यानंतर व्यापाऱ्यांनी आता गोडाऊन तीन फूट वाढविण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक वापराच्या जागेवरच अतिक्रमण केले असून मंजुरीपेक्षा दुप्पट चटईक्षेत्राचा वापर केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तुर्भे परिसरामध्ये ७२ हेक्टर जमिनीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वसली आहे. सुनियोजितपणे मार्केटची उभारणी करण्यात आली होती; परंतु महानगरपालिका व बाजार समिती प्रशानाच्या दुर्लक्षामुळे काही मार्केटमधील व्यापाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. यामध्ये भाजी, फळ व मसाला मार्केटमध्ये सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे. मसाला मार्केटमधील व्यापाºयांनी बाजार समितीकडे वाढीव एफएसआय मिळावा यासाठी मागणी केली होती. बाजारसमितीने वाढीव एफएसआय मंजूर केला आहे. सद्यस्थितीमध्ये ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे; परंतु व्यापाºयांनी मात्र महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता वाढीव बांधकाम केले आहे. या पूर्वी पोटमाळा व वाढीव एक मजल्याचे बांधकाम करण्यात आले होते. ९० टक्के गाळेधारकांनी पोटमोळे व वाढीव मजला बांधला आहे. आता व्यापाºयांनी गाळ्यांच्या समोरील जागेवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. सी विंगमधील गाळेधारकांनी जवळपास तीन फूट वाढीव बांधकाम केले आहे. यामुळे दोन्ही गाळ्यांच्या मध्ये ग्राहकांना व कामगारांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. अनेक गाळेधारकांनी गाळ्यांच्या बाहेरून वरील मजल्यावर जाण्यासाठी दरवाजा केला असून जिन्याचे बांधकामही केले आहे. मूळ गोडाऊनच्या वरील दोन मजले भाड्याने दिले आहेत.

सी विंगप्रमाणे मसाला मार्केटमधील इतर विंगमध्येही व्यापाºयांनी वाढीव बांधकाम केले आहे. काहींनी तीन फूट तर काहींनी चार फूट ओटले वाढविले आहेत. वाढीव जागेमध्ये माल ठेवून त्यांची विक्री केली जात आहे. बाजार समिती किंवा महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामासाठीचे साहित्य मार्केटमध्ये आलेच कसे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मार्केटमध्ये देखभालीसाठी सुरक्षारक्षक व एपीएमसीचे कर्मचारी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम कसे करण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. व्यापाºयांच्या दबावामुळे कर्मचारी कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे. अशीच स्थिती राहिली तर मार्केटच्या दोन्ही विंगच्या मध्ये चालण्यास जागाही उपलब्धहोणार नाही. मार्केटमध्ये आग लागली किंवा इतर काही दुर्घटना झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.एपीएमसी कर्मचाºयांकडूनही कारवाई नाहीच्बाजार समितीमधील सर्व व्यवहारावर एपीएमसी प्रशासनाचे नियंत्रण असते. पाचही मार्केटला संरक्षण भिंत आहे. परवानगीशिवाय कोणालाही मार्केटमध्ये कोणतेच साहित्य आणता येत नाही.च्प्रत्येक गाळ्यांमधून सुरक्षारक्षक फेरी मारत असतात. यानंतरही मार्जिनल स्पेसमध्ये अतिक्रमण झालेच कसे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. देखभाल शाखेचे अधिकारी व कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत.२०१६ मध्ये झाली होती कारवाईमसाला मार्केटमधील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने २०१६ मध्ये कारवाई केली होती. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जवळपास ३४ गाळे सिल केले होते. यानंतर अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झालेली नाही. वाढीव मजल्यानंतर आता मार्जिनल स्पेसमधील जागेवर बांधकाम सुरू झाले असून ते थांबविण्याची मागणी होत आहे.महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष : एपीएमसी मार्केटमधील बांधकामावर महानगरपालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही. महापालिका प्रशासनाने कधीच येथील अतिक्रमण थांबविण्यासाठी ठोस भूमिका घेतलेली नाही. सुरू असलेले बांधकाम थांबविलेले नाही व झालेले बांधकाम पाडलेले नाही. यामुळे अतिक्रमण करण्याचे मनोबल वाढत असून दिवसेंदिवस अतिक्रमणांची संख्या वाढत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई