शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

क्लस्टरमुळे विकासाला गती

By admin | Updated: June 10, 2017 01:19 IST

उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्याचा मार्ग मोकळा

नामदेव मोरे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने योग्य वेळी तयार केलेल्या इम्पॅक्ट असेसमेंट (आघात मूल्यांकन) अहवालामुळे नवी मुंबईबरोबरच मुंबई, ठाण्यामधील पुनर्बांधणीचा मार्गही मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसह गावठाण परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी क्लस्टर योजना राबविण्याचा व ४ चटईक्षेत्र देण्याचा निर्णय राज्य शासनाने २०१४ मध्ये घेतला होता. परंतु यामुळे शहरांमधील पायाभूत सुविधांवर ताण येईल अशी याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने या योजनेच्या अंमलबजावणीवर स्थगिती दिली होती. नवी मुंबई महानगरपालिकेने ही योजना राबविण्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार केला होता. सिडकोनेही त्यांचा अहवाल तयार केला होता. नवी मुंबई महापालिकेच्यानंतर मुंबई व ठाणे महापालिकेनेही त्यांचे अहवाल तयार करून राज्य शासनाकडे पाठविले आहेत. न्यायालयामध्ये शासनाने नवी मुंबई महापालिकेच्या अहवालाचा संदर्भ देवून इतर अहवाल प्राप्त झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने बंदी उठविली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ मुंबई व ठाणे शहराला होणार आहे. ३० वर्षे जुन्या धोकादायक इमारतींच्या जागेवर क्लस्टर योजना राबविता येणार आहे. ४ हजार चौरस मीटरचा भूखंड व ७० टक्के रहिवाशांची परवानगी असल्यास ही योजना राबविणे शक्य होणार आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मूळ गावांमधील विकासाला क्लस्टरमुळे चालना मिळणार आहे. रहिवाशांची संमती असेल व अपेक्षित क्षेत्रफळाचा भूखंड असल्यास पुनर्बांधणी करता येणार आहे. याशिवाय भविष्यात कोपरखैरणे, नेरूळ, वाशी, तुर्भे, ऐरोली परिसरातील बैठ्या चाळींचा पुनर्विकास करणेही शक्य होणार आहे. वाशी, नेरूळ परिसरातील सिडकोच्या धोकादायक इमारतींच्या एकापेक्षा जास्त सोसायटी एकत्र करून ही योजना राबविणे शक्य होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठी घरे उपलब्ध करून देणेही शक्य होणार आहे. महापालिका क्षेत्रामध्ये मोकळे भूखंड अत्यंत कमी असल्याने बांधकाम व्यवसायाला संधीच नव्हती. क्लस्टरमुळे बांधकाम व्यवसायालाही गती मिळणार आहे. शासन व महापालिकेने सकारात्मक प्रयत्न करावे अशाप्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक व नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.