शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

दहीहंडी मंडळांची सामाजिक बांधिलकी, केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात, सीमेवरील हुतात्मांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 04:29 IST

केरळात झालेल्या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो जण मृत्युमुखी पावले आहेत. आजही या भागात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील काही दहीहंडी उत्सव मंडळांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : केरळात झालेल्या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो जण मृत्युमुखी पावले आहेत. आजही या भागात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील काही दहीहंडी उत्सव मंडळांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवावर अधिक खर्च न करता केरळ पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय काही मंडळांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर शत्रूशी लढताना हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. प्लॅस्टिक बंदीसाठी गोविंदा पथकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले जाणार आहे.शिरवणे गावातील मंडळांकडून स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.ऐरोली सेक्टर १६ येथील श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या मैदानात सुनील चौगुले स्पोटर््स असोसिएशनच्या माध्यमातून मोठ्या बक्षिसाची दहीहंडी बांधली जाते. परंतु यावर्षी बक्षिसातील काही रकम केरळ पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचे या दहीहंडीचे आयोजक तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी स्पष्टकेले आहे.ही आर्थिक मदत वाशीतील केरळ भवनमध्ये जमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशाच्या सीमेवर धारातीर्थी पडून हुतात्मा झालेल्या जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. घणसोली गावात संस्कार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक अंकुश पांडुरंग नाईक यांनी घणसोलीत स्वर्गीय बाळाजी आंबो पाटील महापालिका शाळेच्या मैदानात दहीहंडीचे आयोजन केले आहे. या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीबाबत नागरिकांत जनजागृती केली जाणार असल्याचे अंकुश नाईक यांनी सांगितले.वाशी सेक्टर १ येथे श्री गणेश बाल मित्र मंडळाच्या वतीने आयोजक शंकर ऊर्फ बाबा पुजारी यांनी एक लाखाचे पारितोषिक असलेली दहीहंडी जाहीर केली आहे. तसेच केरळ पूरग्रस्तांनाही आर्थिक मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिरवणे गावात विनोद-सारिका कला क्र ीडा मंडळाने महापालिका शाळेजवळ दहीहंडीचे आयोजन केले आहे.स्वच्छतेचा संदेश देत ‘सुंदर नवी मुंबई आणि स्वच्छ नवी मुंबई’चा जागर करण्याचा मंडळाचा संकल्प असल्याची माहिती महापौर जयवंत सुतार यांनी दिली.नवी मुंबईत ५० टक्के दहीहंड्या रद्दपोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर नवी मुंबईमधील अनेक प्रमुख मंडळांनी दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मंडळांनी केरळ आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरखैरणेत डी मार्ट मॉलसमोर वनवैभव कला व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी लाख मोलाच्या पारितोषिकांची दहीहंडीची परंपरा गेल्या वर्षीपर्यंत सुरू होती.

टॅग्स :Dahi Handiदही हंडी