शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

दहीहंडी मंडळांची सामाजिक बांधिलकी, केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात, सीमेवरील हुतात्मांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 04:29 IST

केरळात झालेल्या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो जण मृत्युमुखी पावले आहेत. आजही या भागात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील काही दहीहंडी उत्सव मंडळांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : केरळात झालेल्या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो जण मृत्युमुखी पावले आहेत. आजही या भागात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील काही दहीहंडी उत्सव मंडळांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवावर अधिक खर्च न करता केरळ पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय काही मंडळांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर शत्रूशी लढताना हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. प्लॅस्टिक बंदीसाठी गोविंदा पथकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले जाणार आहे.शिरवणे गावातील मंडळांकडून स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.ऐरोली सेक्टर १६ येथील श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या मैदानात सुनील चौगुले स्पोटर््स असोसिएशनच्या माध्यमातून मोठ्या बक्षिसाची दहीहंडी बांधली जाते. परंतु यावर्षी बक्षिसातील काही रकम केरळ पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचे या दहीहंडीचे आयोजक तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी स्पष्टकेले आहे.ही आर्थिक मदत वाशीतील केरळ भवनमध्ये जमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशाच्या सीमेवर धारातीर्थी पडून हुतात्मा झालेल्या जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. घणसोली गावात संस्कार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक अंकुश पांडुरंग नाईक यांनी घणसोलीत स्वर्गीय बाळाजी आंबो पाटील महापालिका शाळेच्या मैदानात दहीहंडीचे आयोजन केले आहे. या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीबाबत नागरिकांत जनजागृती केली जाणार असल्याचे अंकुश नाईक यांनी सांगितले.वाशी सेक्टर १ येथे श्री गणेश बाल मित्र मंडळाच्या वतीने आयोजक शंकर ऊर्फ बाबा पुजारी यांनी एक लाखाचे पारितोषिक असलेली दहीहंडी जाहीर केली आहे. तसेच केरळ पूरग्रस्तांनाही आर्थिक मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिरवणे गावात विनोद-सारिका कला क्र ीडा मंडळाने महापालिका शाळेजवळ दहीहंडीचे आयोजन केले आहे.स्वच्छतेचा संदेश देत ‘सुंदर नवी मुंबई आणि स्वच्छ नवी मुंबई’चा जागर करण्याचा मंडळाचा संकल्प असल्याची माहिती महापौर जयवंत सुतार यांनी दिली.नवी मुंबईत ५० टक्के दहीहंड्या रद्दपोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर नवी मुंबईमधील अनेक प्रमुख मंडळांनी दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मंडळांनी केरळ आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरखैरणेत डी मार्ट मॉलसमोर वनवैभव कला व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी लाख मोलाच्या पारितोषिकांची दहीहंडीची परंपरा गेल्या वर्षीपर्यंत सुरू होती.

टॅग्स :Dahi Handiदही हंडी