शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळत्या मृतदेहांचा धूर शोकाकुलाच्या तोंडावर; चिमणी बंद असल्याने स्मशानभूमीतच धुराचे लोट 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 5, 2024 19:08 IST

तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई: तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मृतदेहाला अग्नी देण्याच्या ठिकाणी छताच्या चिमणी बंद अवस्थेत आहेत. यामुळे अंत्यविधीवेळी होणारा धूर चिमनीवाटे हवेत जाण्याऐवजी शोकाकुळ नागरिकांमध्येच पसरत आहे. त्यामुळे अगोदरच दुःखात असलेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात धूर फेकून अधिक त्रास देण्याचे काम त्याठिकाणी होताना दिसत आहे. 

महापालिकेने स्मशान भूमी व्हिजन अंतर्गत शहरातील स्मशानभूमींवर लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी देखभाल दुरुस्तीकडे पाठ फिरवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारातून मागील दहा दिवसांपासून तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी दुपारी त्याठिकाणी एकाच वेळी चार मृतदेहांवर अंत्यविधी केला जात होता. त्यासाठी चारही कुटुंबियांच्या परिचितांनी मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली होती. मात्र मृतदेहांना अग्नी देताच निघणारा धूर हवेत न जाता जमिनीवर पसरू लागला. यामुळे उपस्थितांना एक एक पाऊल मागे जावे लागले. 

मात्र धूर अधिकच पसरू लागल्यानंतर काहींनी चौकशी केली असता तिथली चिमणी बंद असल्याचे कारण समोर आले. मागील दहा दिवसांपासून स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या शेडची चिमणी बंद असल्याने हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना फोन करण्यास सुरवात केली असता अनेक अधिकाऱ्यांना तिथली चिमणी बंद असल्याचे माहित देखील नसल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. शिवाय तुर्भे स्मशानभूमीत तीन कामगार असतानाही त्याठिकाणी अंत्यविधीची बहुतांश कामे हि शोकाकुळ कुटुंबीयांकडूनच करून घेतली जात असल्याचेही समोर आले. दरम्यान स्मशानभूमीत पसरणाऱ्या धुराबाबत पालिकेचे अभियंता विश्वकांत लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुरुस्तीसाठी चिमणी बंद असून पुढील तीन दिवसात तिचे काम होईल असे सांगितले.

दहा दिवसांपासून स्मशानभूमीची चिमणी बंद असतानाही अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती नाही यावरून त्यांची अकार्यक्षमता सिद्ध होत आहे. अंत्यविधीच्या धूर हवेत जाण्याऐवजी थेट नागरिकांच्या तोंडावर येत असल्याने अग्नी देऊन स्मशानभूमी बाहेर पाऊल टाकावे लागत आहे. प्रशासनाने हि बाब गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. - गोविंद साळुंखे- सामाजिक कार्यकर्ते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई