शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जळत्या मृतदेहांचा धूर शोकाकुलाच्या तोंडावर; चिमणी बंद असल्याने स्मशानभूमीतच धुराचे लोट 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 5, 2024 19:08 IST

तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई: तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मृतदेहाला अग्नी देण्याच्या ठिकाणी छताच्या चिमणी बंद अवस्थेत आहेत. यामुळे अंत्यविधीवेळी होणारा धूर चिमनीवाटे हवेत जाण्याऐवजी शोकाकुळ नागरिकांमध्येच पसरत आहे. त्यामुळे अगोदरच दुःखात असलेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात धूर फेकून अधिक त्रास देण्याचे काम त्याठिकाणी होताना दिसत आहे. 

महापालिकेने स्मशान भूमी व्हिजन अंतर्गत शहरातील स्मशानभूमींवर लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी देखभाल दुरुस्तीकडे पाठ फिरवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारातून मागील दहा दिवसांपासून तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी दुपारी त्याठिकाणी एकाच वेळी चार मृतदेहांवर अंत्यविधी केला जात होता. त्यासाठी चारही कुटुंबियांच्या परिचितांनी मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली होती. मात्र मृतदेहांना अग्नी देताच निघणारा धूर हवेत न जाता जमिनीवर पसरू लागला. यामुळे उपस्थितांना एक एक पाऊल मागे जावे लागले. 

मात्र धूर अधिकच पसरू लागल्यानंतर काहींनी चौकशी केली असता तिथली चिमणी बंद असल्याचे कारण समोर आले. मागील दहा दिवसांपासून स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या शेडची चिमणी बंद असल्याने हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना फोन करण्यास सुरवात केली असता अनेक अधिकाऱ्यांना तिथली चिमणी बंद असल्याचे माहित देखील नसल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. शिवाय तुर्भे स्मशानभूमीत तीन कामगार असतानाही त्याठिकाणी अंत्यविधीची बहुतांश कामे हि शोकाकुळ कुटुंबीयांकडूनच करून घेतली जात असल्याचेही समोर आले. दरम्यान स्मशानभूमीत पसरणाऱ्या धुराबाबत पालिकेचे अभियंता विश्वकांत लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुरुस्तीसाठी चिमणी बंद असून पुढील तीन दिवसात तिचे काम होईल असे सांगितले.

दहा दिवसांपासून स्मशानभूमीची चिमणी बंद असतानाही अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती नाही यावरून त्यांची अकार्यक्षमता सिद्ध होत आहे. अंत्यविधीच्या धूर हवेत जाण्याऐवजी थेट नागरिकांच्या तोंडावर येत असल्याने अग्नी देऊन स्मशानभूमी बाहेर पाऊल टाकावे लागत आहे. प्रशासनाने हि बाब गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. - गोविंद साळुंखे- सामाजिक कार्यकर्ते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई