शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जळत्या मृतदेहांचा धूर शोकाकुलाच्या तोंडावर; चिमणी बंद असल्याने स्मशानभूमीतच धुराचे लोट 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 5, 2024 19:08 IST

तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई: तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मृतदेहाला अग्नी देण्याच्या ठिकाणी छताच्या चिमणी बंद अवस्थेत आहेत. यामुळे अंत्यविधीवेळी होणारा धूर चिमनीवाटे हवेत जाण्याऐवजी शोकाकुळ नागरिकांमध्येच पसरत आहे. त्यामुळे अगोदरच दुःखात असलेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात धूर फेकून अधिक त्रास देण्याचे काम त्याठिकाणी होताना दिसत आहे. 

महापालिकेने स्मशान भूमी व्हिजन अंतर्गत शहरातील स्मशानभूमींवर लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी देखभाल दुरुस्तीकडे पाठ फिरवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारातून मागील दहा दिवसांपासून तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी दुपारी त्याठिकाणी एकाच वेळी चार मृतदेहांवर अंत्यविधी केला जात होता. त्यासाठी चारही कुटुंबियांच्या परिचितांनी मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली होती. मात्र मृतदेहांना अग्नी देताच निघणारा धूर हवेत न जाता जमिनीवर पसरू लागला. यामुळे उपस्थितांना एक एक पाऊल मागे जावे लागले. 

मात्र धूर अधिकच पसरू लागल्यानंतर काहींनी चौकशी केली असता तिथली चिमणी बंद असल्याचे कारण समोर आले. मागील दहा दिवसांपासून स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या शेडची चिमणी बंद असल्याने हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना फोन करण्यास सुरवात केली असता अनेक अधिकाऱ्यांना तिथली चिमणी बंद असल्याचे माहित देखील नसल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. शिवाय तुर्भे स्मशानभूमीत तीन कामगार असतानाही त्याठिकाणी अंत्यविधीची बहुतांश कामे हि शोकाकुळ कुटुंबीयांकडूनच करून घेतली जात असल्याचेही समोर आले. दरम्यान स्मशानभूमीत पसरणाऱ्या धुराबाबत पालिकेचे अभियंता विश्वकांत लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुरुस्तीसाठी चिमणी बंद असून पुढील तीन दिवसात तिचे काम होईल असे सांगितले.

दहा दिवसांपासून स्मशानभूमीची चिमणी बंद असतानाही अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती नाही यावरून त्यांची अकार्यक्षमता सिद्ध होत आहे. अंत्यविधीच्या धूर हवेत जाण्याऐवजी थेट नागरिकांच्या तोंडावर येत असल्याने अग्नी देऊन स्मशानभूमी बाहेर पाऊल टाकावे लागत आहे. प्रशासनाने हि बाब गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. - गोविंद साळुंखे- सामाजिक कार्यकर्ते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई