शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जळत्या मृतदेहांचा धूर शोकाकुलाच्या तोंडावर; चिमणी बंद असल्याने स्मशानभूमीतच धुराचे लोट 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 5, 2024 19:08 IST

तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई: तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मृतदेहाला अग्नी देण्याच्या ठिकाणी छताच्या चिमणी बंद अवस्थेत आहेत. यामुळे अंत्यविधीवेळी होणारा धूर चिमनीवाटे हवेत जाण्याऐवजी शोकाकुळ नागरिकांमध्येच पसरत आहे. त्यामुळे अगोदरच दुःखात असलेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात धूर फेकून अधिक त्रास देण्याचे काम त्याठिकाणी होताना दिसत आहे. 

महापालिकेने स्मशान भूमी व्हिजन अंतर्गत शहरातील स्मशानभूमींवर लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी देखभाल दुरुस्तीकडे पाठ फिरवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारातून मागील दहा दिवसांपासून तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या शोककुळांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी दुपारी त्याठिकाणी एकाच वेळी चार मृतदेहांवर अंत्यविधी केला जात होता. त्यासाठी चारही कुटुंबियांच्या परिचितांनी मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली होती. मात्र मृतदेहांना अग्नी देताच निघणारा धूर हवेत न जाता जमिनीवर पसरू लागला. यामुळे उपस्थितांना एक एक पाऊल मागे जावे लागले. 

मात्र धूर अधिकच पसरू लागल्यानंतर काहींनी चौकशी केली असता तिथली चिमणी बंद असल्याचे कारण समोर आले. मागील दहा दिवसांपासून स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या शेडची चिमणी बंद असल्याने हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना फोन करण्यास सुरवात केली असता अनेक अधिकाऱ्यांना तिथली चिमणी बंद असल्याचे माहित देखील नसल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. शिवाय तुर्भे स्मशानभूमीत तीन कामगार असतानाही त्याठिकाणी अंत्यविधीची बहुतांश कामे हि शोकाकुळ कुटुंबीयांकडूनच करून घेतली जात असल्याचेही समोर आले. दरम्यान स्मशानभूमीत पसरणाऱ्या धुराबाबत पालिकेचे अभियंता विश्वकांत लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुरुस्तीसाठी चिमणी बंद असून पुढील तीन दिवसात तिचे काम होईल असे सांगितले.

दहा दिवसांपासून स्मशानभूमीची चिमणी बंद असतानाही अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती नाही यावरून त्यांची अकार्यक्षमता सिद्ध होत आहे. अंत्यविधीच्या धूर हवेत जाण्याऐवजी थेट नागरिकांच्या तोंडावर येत असल्याने अग्नी देऊन स्मशानभूमी बाहेर पाऊल टाकावे लागत आहे. प्रशासनाने हि बाब गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. - गोविंद साळुंखे- सामाजिक कार्यकर्ते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई