शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्याचा होणार स्मार्ट विकास

By admin | Updated: November 26, 2015 01:54 IST

देशभर स्मार्ट सिटीचा गवगवा सुरू असताना ग्रामीण भाग विकासाच्या नवनवीन योजनेपासून वंचित राहतो की काय असे वाटत होते.

आविष्कार देसाई, अलिबागदेशभर स्मार्ट सिटीचा गवगवा सुरू असताना ग्रामीण भाग विकासाच्या नवनवीन योजनेपासून वंचित राहतो की काय असे वाटत होते. मात्र सरकारने ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील ही भीती आता दूर केली आहे. जिल्ह्यात स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडे योजनेबाबत सरकारने निकष मागविले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या तुलनेत आता स्मार्ट ग्राम योजनेने गावाचा चेहरामोहरा बदलण्यास निश्चितच मदत होणार आहे.विकासाच्या नवनवीन संकल्पना राबविण्यावर सरकारने भर दिला आहे. त्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनातील घटकांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे योजनांचा पाऊस पाडताना उपलब्ध मनुष्यबळाचा विचारही सरकारने करण्याची गरज असल्याचे बोलले जाते.शहराचा विकास अत्याधुनिक पध्दतीने करण्यावर भर देताना तेथे हायटेक सुविधा पुरवून विकासाला नवा आयाम देण्यावर सरकारने भर दिला आहे. ग्रामीण भागात वीज, पाणी, रस्ते याच्याही पलीकडे विकास कसा असायला पाहिजे याची विचारणा नुकतीच सरकारने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांकडे विकासाचे निकष मागविण्यात आले असल्याचे कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.स्मार्ट गावासाठी किती निधी लागणार आहे, किती गावे यादीत घ्यायची आहेत यावर विचार होणे बाकी आहे. विकासाच्या आराखड्याची माहिती सरकारला दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्मार्ट ग्राममध्ये निर्मल पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, पर्यावरणाचा विकास रत्न पुरस्कार, यशवंत पंचायत राज पुरस्कार यांच्यासह आदी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा समावेश होणार आहे. त्यानंतर गावाची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती आणि पेसाअंतर्गत आदिवासीबहुल ग्रामपंचायतींचा समावेश स्मार्ट ग्राम योजनेत होणार आहे.