शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रायगड जिल्ह्याचा होणार स्मार्ट विकास

By admin | Updated: November 26, 2015 01:54 IST

देशभर स्मार्ट सिटीचा गवगवा सुरू असताना ग्रामीण भाग विकासाच्या नवनवीन योजनेपासून वंचित राहतो की काय असे वाटत होते.

आविष्कार देसाई, अलिबागदेशभर स्मार्ट सिटीचा गवगवा सुरू असताना ग्रामीण भाग विकासाच्या नवनवीन योजनेपासून वंचित राहतो की काय असे वाटत होते. मात्र सरकारने ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील ही भीती आता दूर केली आहे. जिल्ह्यात स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडे योजनेबाबत सरकारने निकष मागविले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या तुलनेत आता स्मार्ट ग्राम योजनेने गावाचा चेहरामोहरा बदलण्यास निश्चितच मदत होणार आहे.विकासाच्या नवनवीन संकल्पना राबविण्यावर सरकारने भर दिला आहे. त्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनातील घटकांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे योजनांचा पाऊस पाडताना उपलब्ध मनुष्यबळाचा विचारही सरकारने करण्याची गरज असल्याचे बोलले जाते.शहराचा विकास अत्याधुनिक पध्दतीने करण्यावर भर देताना तेथे हायटेक सुविधा पुरवून विकासाला नवा आयाम देण्यावर सरकारने भर दिला आहे. ग्रामीण भागात वीज, पाणी, रस्ते याच्याही पलीकडे विकास कसा असायला पाहिजे याची विचारणा नुकतीच सरकारने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांकडे विकासाचे निकष मागविण्यात आले असल्याचे कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.स्मार्ट गावासाठी किती निधी लागणार आहे, किती गावे यादीत घ्यायची आहेत यावर विचार होणे बाकी आहे. विकासाच्या आराखड्याची माहिती सरकारला दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्मार्ट ग्राममध्ये निर्मल पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, पर्यावरणाचा विकास रत्न पुरस्कार, यशवंत पंचायत राज पुरस्कार यांच्यासह आदी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा समावेश होणार आहे. त्यानंतर गावाची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती आणि पेसाअंतर्गत आदिवासीबहुल ग्रामपंचायतींचा समावेश स्मार्ट ग्राम योजनेत होणार आहे.