शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

रायगड जिल्ह्याचा होणार स्मार्ट विकास

By admin | Updated: November 26, 2015 01:54 IST

देशभर स्मार्ट सिटीचा गवगवा सुरू असताना ग्रामीण भाग विकासाच्या नवनवीन योजनेपासून वंचित राहतो की काय असे वाटत होते.

आविष्कार देसाई, अलिबागदेशभर स्मार्ट सिटीचा गवगवा सुरू असताना ग्रामीण भाग विकासाच्या नवनवीन योजनेपासून वंचित राहतो की काय असे वाटत होते. मात्र सरकारने ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील ही भीती आता दूर केली आहे. जिल्ह्यात स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडे योजनेबाबत सरकारने निकष मागविले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या तुलनेत आता स्मार्ट ग्राम योजनेने गावाचा चेहरामोहरा बदलण्यास निश्चितच मदत होणार आहे.विकासाच्या नवनवीन संकल्पना राबविण्यावर सरकारने भर दिला आहे. त्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनातील घटकांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे योजनांचा पाऊस पाडताना उपलब्ध मनुष्यबळाचा विचारही सरकारने करण्याची गरज असल्याचे बोलले जाते.शहराचा विकास अत्याधुनिक पध्दतीने करण्यावर भर देताना तेथे हायटेक सुविधा पुरवून विकासाला नवा आयाम देण्यावर सरकारने भर दिला आहे. ग्रामीण भागात वीज, पाणी, रस्ते याच्याही पलीकडे विकास कसा असायला पाहिजे याची विचारणा नुकतीच सरकारने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांकडे विकासाचे निकष मागविण्यात आले असल्याचे कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.स्मार्ट गावासाठी किती निधी लागणार आहे, किती गावे यादीत घ्यायची आहेत यावर विचार होणे बाकी आहे. विकासाच्या आराखड्याची माहिती सरकारला दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्मार्ट ग्राममध्ये निर्मल पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, पर्यावरणाचा विकास रत्न पुरस्कार, यशवंत पंचायत राज पुरस्कार यांच्यासह आदी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा समावेश होणार आहे. त्यानंतर गावाची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती आणि पेसाअंतर्गत आदिवासीबहुल ग्रामपंचायतींचा समावेश स्मार्ट ग्राम योजनेत होणार आहे.