शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

झोपडपट्ट्यांना भूस्खलनाचा धोका, वृक्षतोड करून जेसीबीच्या साहाय्याने डोंगरामध्ये सपाटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:53 IST

नामदेव मोरेनवी मुंबई : एमआयडीसीसह सीबीडी परिसरामध्ये डोंगर पोखरून झोपड्या उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. वृक्षतोड करून जेसीबीच्या साहाय्याने डोंगरामध्ये सपाटीकरण केले जात आहे. या अतिक्रमणामुळे भूस्खलन होऊन मोठी माळीण सारखी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात असून, १० हजार नागरिकांवर अपघाताचे सावट निर्माण झाले आहे. पालिकेने धोकादायक वसाहती घोषित ...

नामदेव मोरेनवी मुंबई : एमआयडीसीसह सीबीडी परिसरामध्ये डोंगर पोखरून झोपड्या उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. वृक्षतोड करून जेसीबीच्या साहाय्याने डोंगरामध्ये सपाटीकरण केले जात आहे. या अतिक्रमणामुळे भूस्खलन होऊन मोठी माळीण सारखी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात असून, १० हजार नागरिकांवर अपघाताचे सावट निर्माण झाले आहे. पालिकेने धोकादायक वसाहती घोषित केल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्या वसाहतीच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक अद्याप लावलेले नाहीत.झोपड्या उभारण्यासाठी डोंगर पोखरल्यामुळेच सीबीडीमध्ये भूस्खलन झाल्याचे प्राथमिक पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जेसीबीच्या साहाय्याने डोंगरावरील माती पोखरून सपाटीकरण करण्यात आले होते. मातीचे ढिगारे महापालिकेने बांधलेल्या गटारांमध्ये ढकलण्यात आले होते. यामुळेच सोमवारी रात्री भूस्खलन होऊन कल्पतरू सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. या ठिकाणी दुर्गामाता झोपडपट्टीला लागून नवीन वसाहत उभी राहू लागली आहे. डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळांचे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. वृक्षतोड व खोदकामामुळे जमीन खचण्याची शक्यता वाढली आहे. नवी मुंबईमध्ये दिघा ते सीबीडीपर्यंत डोंगर पोखरून झोपडपट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. नेरुळमधील रमेश मेटल कॉरीही पूर्णपणे डोंगर उतरावर वसली आहे. या ठिकाणी दरड कोसळण्याची व भूस्खलन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच परिसरामध्ये महात्मा गांधी झोपडपट्टीमध्येही डोंगराचा भाग कोसळून अपघाताची शक्यता आहे. तुर्भेमध्ये इंदिरानगर झोपडपट्टी, रबाडे- भीमनगर, अश्विन क्वारी, आंबेडकरनगर झोपडपट्टी, इलठाणपाडा झोपडपट्टी परिसरामध्येही जमीन खचण्याची शक्यता आहे.महापालिका प्रत्येक वर्षी भूस्खलन होण्याच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करत होती. धोकादायक ठिकाणांची माहिती देणारे फलक लावण्यात येत होते. मदत करणाºया संस्था, नागरिकांच्या राहण्याची-जेवणाची सोय कुठे केली जाणार, या सर्व गोष्टींची माहिती प्रकाशित करून ती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविली जात होती; परंतु दोन वर्षांपासून महापालिकेच्या आपत्कालीन आराखड्याच्या पुस्तिकाच प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे आपत्ती ओढावल्यास मदत उपलब्ध करून देणे अवघड होणार आहे. डोंगर उतारावर झोपड्यांचे अतिक्रमण थांबविण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. बंद दगडखाणींच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधण्यात आल्या असून, त्याही धोकादायक स्थितीमध्ये आहेत. धोकादायक ठिकाणी असलेल्या अनधिकृत झोपड्या हटविण्याकडेही दुर्लक्ष केले जात असून, अशीच स्थिती राहिली तर भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते.प्रशासनाचे कारवाईचे आदेशसीबीडीमध्ये भूस्खलन झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय डोंगरामध्ये काही धार्मिक स्थळांचेही बांधकाम करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी तत्काळ नवीन झोपड्या हटविण्यात याव्यात, असे आदेश दिले आहेत.सिडकोसह वनविभागाचेही दुर्लक्षसीबीडीमध्ये वनविभाग व सिडकोच्या जमिनीवर अतिक्रमण झाले. डोंगर उतारावर जेसीबीच्या साहाय्याने सपाटीकरण करून झोपड्या व मंदिरे उभारण्यात येत आहेत. यामुळे भविष्यात भूस्खलन होण्याची शक्यता वाढली आहे. सिडको व वनविभाग या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. महापालिका प्रशासनही कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.दगडखाणी सर्वाधिक धोकादायकदगड खाणी परिसरामध्ये दाटी - वाटीने झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. नाल्याच्या काठावर व दरडींवरही बांधकामे केली आहेत. नाल्यातील पाणी झोपड्यांमध्ये जाऊन व दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे बंद दगडखाणींमधील अतिक्रमण पाडून ते भूखंड मोकळे करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.