शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

कामगारांना गुलामगिरीची वागणूक

By admin | Updated: July 8, 2015 00:36 IST

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या ५०७५ कंत्राटी कामगारांना ठेकेदार गुलामाप्रमाणे वागवत आहेत.

नामदेव मोरे  नवी मुंबईमहापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या ५०७५ कंत्राटी कामगारांना ठेकेदार गुलामाप्रमाणे वागवत आहेत. भविष्यनिर्वाह निधी व इतर गैरसोयींविरोधात आवाज उठविणाऱ्या कामगारांवर आकसाने कारवाई केली जात आहे. काही कामगारांना चक्क कामावरून काढून टाकण्यात आले आहे. महानगरपालिकेने कामकाजाच्या सुलभतेसाठी १२ विभागांत कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली आहे. शहरातील साफसफाई करणे, कचरा उचलणे, पाणी सोडणे, रुग्णालय़्ा, स्मशानभूमीची साफसफाई, आरोग्य व शिक्षण विभागांत तब्बल ५०७५ कामगार काम करत आहेत. कंत्राटी कामगारांना समान वेतन देणारी देशातील एकमेव महापालिका असा गवगवा पालिकेतील अधिकारी व सत्ताधारी नेहमी करत होते. परंतु प्रत्यक्षात कामगारांना समान वेतन कधीच मिळालेले नाही. अत्यावश्यक सुविधाही वेळेवर मिळालेल्या नाहीत. कामगारांच्या हक्काचा भविष्यनिर्वाह निधी वेळेवर भरण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले आहे. काम करत असलेल्या कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी भरला नाही, परंतु जिवंत नसलेल्या कामगाराचा मृत्यूनंतर तीन वर्षे भविष्यनिर्वाह निधी भरल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत कधी ठेकेदाराच्या कधी अधिकाऱ्यांच्या तर कधी सत्ताधाऱ्यांच्या भीतीमुळे कामगार गप्प बसत होते. परंतु आता कामगारांनी स्वत:च संघटित होऊन हक्कासाठी लढा देण्यास सुरुवात केली आहे. कामगारच कामगारांची युनियन चालवू लागले आहेत. ठेकेदार भविष्यनिर्वाह निधीचा तपशील देत नसल्यामुळे संबंधित कार्यालयातून माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागविली, तेव्हा अनेकांना धक्का बसला आहे. काहींचा निधी कमी भरला आहे. काहींची रक्कम २ ते ३ वर्षे भरलेलीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार पाहून कामगारांना स्वत:चे भविष्य अंधकारमय वाटू लागले आहे. कामगारांनी संघटनेच्या माध्यमातून याविषयी जाब विचारण्यास सुरुवात केली. परंतु याचा राग आलेल्या ठेकेदारांनी कामगारांवर सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. दिघा विभागात पाणीपुरवठा विभागातील एम. एस. जाधव कंपनीमध्ये काम करणाऱ्या भूपेश मोकाशी व प्रशांत ठाकूर या दोन जणांनी ठेकेदाराकडे भविष्यनिर्वाह निधीची विचारणा केली. यामुळे संतापलेल्या ठेकेदाराने त्यांना चक्क कामावरून काढून टाकले. २ जूनपासून दोन्ही कामगार बेकार झाले असून त्यांच्यावर बेकार होण्याची वेळ आली आहे. स्वत:च्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम विचारणे गुन्हा आहे का, अशी विचारणा हे कामगार करत आहेत. महापालिकेने नेमलेले ठेकेदार हुकूमशाहीपद्धतीने वागू लागले आहेत. कामगारांना गुलामगिरीची वागणूक दिली जात आहे. भविष्यनिर्वाह निधी व इतर घोटाळा बाहेर येऊ नये यासाठी कामगारांवर दबाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. मानवी अधिकाराचेही उल्लंघन सुरू असून याविरोधात आंदोलन करण्याची व वेळ पडली तर मानवी हक्क आयोग व कामगार विभागाकडेही तक्रार करण्याची तयारी कामगारांनी केली आहे.