शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

सायन-पनवेल मार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:06 IST

१२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

- वैभव गायकर पनवेल : १२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावरील अर्धवट कामे, बंद पथदिवे तसेच अस्तित्वात नसलेल्या लेनच्या पट्ट्या आदीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील दीड वर्षात या मार्गावर तब्बल २५० अपघात झाले असून, यात जवळपास १०३ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेला हा महामार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.१८ किलोमीटरच्या सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करताना दोन्ही बाजूंना पाचपदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. देशातील सर्वात व्यस्त महामार्गापैकी सायन-पनवेल महामार्ग हा एक आहे. या मार्गावरून दररोज पाच लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याचा ढोबळ अंदाज वर्तविला जातो. या मार्गावर सानपाडा, नेरु ळ, उरणफाटा, कामोठे व खारघर अशा पाच उड्डाणपुलाचा समावेश आहे. मागील वर्षी पहिल्या पावसातच या सर्व उड्डाणपुलांवर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले होते. वाहनधारकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. आता पहिल्याच पावसात मार्गावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांत या मार्गावर अधिक अपघात घडतात. आरटीआय कार्यकर्ता दीपक सिंग यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून २०१६-१७ या वर्षात या मार्गावर तब्बल २४२ लहान-मोठे अपघात झाले आहेत. तर चालू वर्षात म्हणजेच मागील सहा महिन्यांत जवळपास ५० अपघात घडले असून, यात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पनवेल, कळंबोली, खारघर, बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले आहेत. यापैकी सर्वाधिक अपघात वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. उड्डाणपूल व रस्त्याच्या दुभाजनाबाबत अनेक ठिकाणी कोणत्याच सूचना अथवा उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यामुळे उड्डाणपुलाला धडकणाऱ्या वाहन अपघातांचे प्रमाण अधिक आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल टोलवेज प्रा. लि. या कंपनीला टोलवसुलीसाठी ठेका दिलेला होता. या कंपनीचा ठेका रद्द करून सध्याच्या घडीला सार्वजनिक बांधकाम खातेच या मार्गावरून टोल वसूल करीत आहेत. याकरिता इगल इन्फ्रा ही खासगी कंपनी टोल वसूल करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे. दररोज लाखो रु पयांची टोल वसूल करूनदेखील या मार्गावरील समस्या वाढतच चाललेल्या आहेत. अनेक ठिकाणी उडाणपुलाखालील भुयारी मार्ग बंद असून, त्यामध्ये पाणी शिरले आहे. मार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसल्याने एक लेन पूर्णपणे पाण्यात जाते. खारघर टोलनाक्यावर पावसाळ्यात अशाप्रकारे पाणी नेहमीच साचलेले पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, अपघातांच्या संख्येत वाढ होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत योग्य पावले उचलताना दिसून येत नाही.दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी एक कन्सल्टन्सी नेमलेली आहे. त्यावरून कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते मंजुरीसाठी पुढे पाठविले जाईल, तसेच बंद असलेले पथदिवे सुरू करण्यासाठी विद्युत विभागाशी पत्रव्यवहार केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न छापण्याची अटीवर दिली.>या मार्गावरील अर्धवट कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला २०पेक्षा जास्त पत्रे लिहिली आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. दररोज अपघातांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नजीकच्या काळात याबाबत सुधारणा झाली नाही, तर उच्च न्यायालयात जनिहत याचिका दाखल करणार.- दीपक सिंग,माहिती अधिकार कार्यकर्ता>मागील सहा महिन्यांत दहा जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर अपघातांची संख्या ५०च्या वर गेलेली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.>२०१६-१७ मधील अपघातांचा आढावाअपघात मृतपनवेल ३९ १४कळंबोली १८ ०९खारघर ५० २५बेलापूर १८ ०७नेरु ळ ३४ १४सानपाडा ०७ ११वाशी ७६ १३