शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल मार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:06 IST

१२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

- वैभव गायकर पनवेल : १२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावरील अर्धवट कामे, बंद पथदिवे तसेच अस्तित्वात नसलेल्या लेनच्या पट्ट्या आदीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील दीड वर्षात या मार्गावर तब्बल २५० अपघात झाले असून, यात जवळपास १०३ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेला हा महामार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.१८ किलोमीटरच्या सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करताना दोन्ही बाजूंना पाचपदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. देशातील सर्वात व्यस्त महामार्गापैकी सायन-पनवेल महामार्ग हा एक आहे. या मार्गावरून दररोज पाच लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याचा ढोबळ अंदाज वर्तविला जातो. या मार्गावर सानपाडा, नेरु ळ, उरणफाटा, कामोठे व खारघर अशा पाच उड्डाणपुलाचा समावेश आहे. मागील वर्षी पहिल्या पावसातच या सर्व उड्डाणपुलांवर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले होते. वाहनधारकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. आता पहिल्याच पावसात मार्गावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांत या मार्गावर अधिक अपघात घडतात. आरटीआय कार्यकर्ता दीपक सिंग यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून २०१६-१७ या वर्षात या मार्गावर तब्बल २४२ लहान-मोठे अपघात झाले आहेत. तर चालू वर्षात म्हणजेच मागील सहा महिन्यांत जवळपास ५० अपघात घडले असून, यात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पनवेल, कळंबोली, खारघर, बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले आहेत. यापैकी सर्वाधिक अपघात वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. उड्डाणपूल व रस्त्याच्या दुभाजनाबाबत अनेक ठिकाणी कोणत्याच सूचना अथवा उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यामुळे उड्डाणपुलाला धडकणाऱ्या वाहन अपघातांचे प्रमाण अधिक आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल टोलवेज प्रा. लि. या कंपनीला टोलवसुलीसाठी ठेका दिलेला होता. या कंपनीचा ठेका रद्द करून सध्याच्या घडीला सार्वजनिक बांधकाम खातेच या मार्गावरून टोल वसूल करीत आहेत. याकरिता इगल इन्फ्रा ही खासगी कंपनी टोल वसूल करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे. दररोज लाखो रु पयांची टोल वसूल करूनदेखील या मार्गावरील समस्या वाढतच चाललेल्या आहेत. अनेक ठिकाणी उडाणपुलाखालील भुयारी मार्ग बंद असून, त्यामध्ये पाणी शिरले आहे. मार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसल्याने एक लेन पूर्णपणे पाण्यात जाते. खारघर टोलनाक्यावर पावसाळ्यात अशाप्रकारे पाणी नेहमीच साचलेले पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, अपघातांच्या संख्येत वाढ होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत योग्य पावले उचलताना दिसून येत नाही.दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी एक कन्सल्टन्सी नेमलेली आहे. त्यावरून कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते मंजुरीसाठी पुढे पाठविले जाईल, तसेच बंद असलेले पथदिवे सुरू करण्यासाठी विद्युत विभागाशी पत्रव्यवहार केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न छापण्याची अटीवर दिली.>या मार्गावरील अर्धवट कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला २०पेक्षा जास्त पत्रे लिहिली आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. दररोज अपघातांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नजीकच्या काळात याबाबत सुधारणा झाली नाही, तर उच्च न्यायालयात जनिहत याचिका दाखल करणार.- दीपक सिंग,माहिती अधिकार कार्यकर्ता>मागील सहा महिन्यांत दहा जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर अपघातांची संख्या ५०च्या वर गेलेली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.>२०१६-१७ मधील अपघातांचा आढावाअपघात मृतपनवेल ३९ १४कळंबोली १८ ०९खारघर ५० २५बेलापूर १८ ०७नेरु ळ ३४ १४सानपाडा ०७ ११वाशी ७६ १३