शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

पहिल्या दिवशी निवडणूक कार्यालयामध्ये शुकशुकाट

By admin | Updated: April 30, 2017 04:01 IST

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सहाही कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसत होता. शनिवार असल्यामुळे एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला

नवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सहाही कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसत होता. शनिवार असल्यामुळे एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. प्रमुख पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत व ज्यांची उमेदवारी निश्चित झालेल्यांनी चांगल्या मुहूर्ताचा शोध सुरू केला आहे. यामुळे २ ते ६ मे दरम्यानच सर्व अर्ज भरले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणूक रिंंगणात असले, तरी खरी लढत शेतकरी कामगार पक्ष व भारतीय जनता पक्षामध्ये असणार आहे. पहिल्याच निवडणुकीमध्ये प्रमुख पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत उमेदवार कोण, बंडखोरी कोण करणार, कोण कोणत्या पक्षाच्या आश्रयाला जाणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी कोण अर्ज भरणार? याकडेही लक्ष लागले होते; पण दिवसभर सहाही कार्यालयांमध्ये शुकशुकाट निर्माण झाला होता. दिवसभरामध्ये एकही उमेदवाराने अर्ज भरला नाही. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी निश्चित केलेली नाही. लवकर उमेदवार निश्चित झाल्यास बंडखोरी होण्याची भीती असल्याने २ मे नंतरच प्रत्यक्षात यादी जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. वादग्रस्त नसलेल्या प्रभागांमधील उमेदवार प्रथम अर्ज भरतील. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा आहे त्या प्रभागांमधील अर्ज शेवटच्या दोन दिवसांत भरले जाणार आहेत. पहिल्या दिवशी शनिवारी असल्याने कोणीही अर्ज दाखल केलेले नाहीत. २० प्रभागांमध्ये ७८ जागांसाठी निवडणूक होत आहे. ५००पेक्षा जास्त अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. रविवार व सोमवारी महाराष्ट्र दिन यामुळे अर्ज दाखल होणार नाहीत. चार ते पाच दिवसांत सर्व अर्ज दाखल होणार असल्याने निवडणूक कार्यालयामधील कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडणार आहे. शेवटच्या दोन दिवसांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याचीही शक्यता आहे. अर्ज भरताना कोणताही गोंधळ होऊ नये व सर्वांना अर्ज भरता यावेत, यासाठी वेळेचे योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार असून राजकीय पक्षांच्या प्रमुखांना विश्वासात घेण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)चांगला मुहूर्त कोणतानिवडणूक सुरू झाल्यापासून अनेक इच्छुक उमेदवारांनी देवदर्शनावर लक्ष केंद्रित केले आहे. उमेदवारी मिळण्यापासून ते जिंकण्यासाठी नवस बोलले जात आहेत. यामुळे अर्ज भरण्यासाठीही चांगल्या मुहूर्ताचा शोध घेतला जात आहे. चांगला दिवस व वेळ पाहूनच अर्ज भरण्याचे अनेकांनी निश्चित केले आहे.