शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

श्रीवर्धन महसूल कर्मचा-यांचे काम बंद , तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 03:03 IST

येथील तहसीलमधील कर्मचारी वर्गाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केले.

श्रीवर्धन : येथील तहसीलमधील कर्मचारी वर्गाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केले.महसूल कर्मचारी संघटनेने ६ नोव्हेंबर २०१७ रोजी आपल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यव्यापी आंदोलनाबाबत निवेदन दिले होते. महसूल कर्मचाºयांच्या प्रमुख प्रलंबित मागण्या, महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहायक करणे, नायब तहसीलदार पदाचा ग्रेड ४८०० करणे, शिपाई संवर्गातून तलाठी पदोन्नती मिळण्याबाबत, नायब तहसीलदार सरळ सेवा भरतीची पदे ३३ टक्केवरून २० टक्के करून पदोन्नती प्रमाण ८० टक्के पदे करणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने २०१२, २०१३, २०१४, २०१५ या वर्षांत महसूल कर्मचारी वर्गाने विविध आंदोलने केली. ६ आॅगस्ट २०१४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री महसूलमंत्री व वरिष्ठ मंत्रालयीन पातळीवर मागण्या मान्य करण्यात आल्या; परंतु अद्याप शासन निर्णय पारित झाला नाही, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. रायगड जिल्हात या महिन्यात वादळी पाऊस झाल्याने शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीसंदर्भात विविध कामे महसूल विभागाशी निगडित असतात. अगोदरच शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे, त्यामध्ये या आंदोलनाने मानसिक त्रासात निश्चित वाढ होणार आहे.