शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सराफांच्या देशव्यापी बंदचा कारागिरांना फटका

By admin | Updated: April 5, 2016 01:31 IST

सराफांच्या देशव्यापी बंदमुळे लग्नसोहळ्यांवर परिणाम झाला आहे. सोन्याची दुकाने बंद असल्याने नकली दागिने घालून लग्नसमारंभ पार पाडले जात आहेत.

खोपोली : सराफांच्या देशव्यापी बंदमुळे लग्नसोहळ्यांवर परिणाम झाला आहे. सोन्याची दुकाने बंद असल्याने नकली दागिने घालून लग्नसमारंभ पार पाडले जात आहेत. केंद्र सरकार व सराफांच्या वादाचा फटका सोने, चांदीचे दागिने बनविणाऱ्या व दुकानाबाहेर दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना बसला आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ सराफांची दुकाने बंद असल्याने या कारागिरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. आणखी काही दिवस संप सुरू राहिला तर उपासमारीची वेळ कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांवर येणार आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या उत्पादनावर केंद्र सरकारने लावलेल्या अबकारी कराच्या विरोधात सराफांनी देशव्यापी संप पुकारला आहे. गेले ३५ दिवस यामुळे सोन्याची दुकाने बंद आहेत. याचा फटका सर्वसामान्यांनाही बसला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून, लग्न नकली दागिने घालून उरकण्यात येत आहेत. या बंदचा मोठा फटका सोन्याच्या दुकानात काम करणारे कामगार व दुकानाबाहेर दुरुस्तीची कामे करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या कारागिरांनाही बसला आहे. दुकाने बंद असल्याने हातावर पोट असलेले हे कारागीर आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील विविध दुकानांबाहेर उदरनिर्वाह करीत असलेल्या कारागिरांची संख्या ५०० पेक्षा जास्त आहे. केंद्र सरकार व सराफ आपल्या मतांवर ठाम असल्याने आणखी काही दिवस ही कोंडी सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे या कारागिरांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत. अशा प्रकारे काम करणारे कारागीर मोठ्या प्रमाणात अन्य राज्यांतून आलेले आहेत. स्थानिक कारागिरांची संख्या २५ टक्क्यांच्या आसपास आहे. पूर्णवेळ दागिन्यांची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना दिवसाकाठी ५०० रुपये मिळत होते. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र गेले काही दिवस दुकाने बंद असल्याने हे कारागीर हवालदिल झाले आहेत.