शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

पतंगमहोत्सवानिमित्त शहरातील दुकाने सजली, २ रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत पतंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 05:09 IST

मकर संक्रांत जवळ आल्याने सर्वत्र पतंगांची धूम दिसत आहे. वेगवेगळे पतंग बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून, दोन रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत पतंग बाजारात उपलब्ध आहेत. एकीकडे बच्चे कंपनी, तरुणाई पतंग उडवून काटाकाटीच्या तयारीत आहेत, तर मांजामुळे पक्षी जखमी होत असल्याने प्राणिमित्रांनी पतंग उडवू नये, याबाबत जनजागृती चालवली आहे.

- प्राची सोनवणेनवी मुंबई : मकर संक्रांत जवळ आल्याने सर्वत्र पतंगांची धूम दिसत आहे. वेगवेगळे पतंग बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून, दोन रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत पतंग बाजारात उपलब्ध आहेत. एकीकडे बच्चे कंपनी, तरुणाई पतंग उडवून काटाकाटीच्या तयारीत आहेत, तर मांजामुळे पक्षी जखमी होत असल्याने प्राणिमित्रांनी पतंग उडवू नये, याबाबत जनजागृती चालवली आहे.नवी मुंबईत ठिकठिकाणी पतंगविक्रीचे स्टॉल लागले आहेत. त्यात विविध पतंग पाहायला मिळत आहेत. दोन, पाच रुपयांपासून ते अडीचशे, हजार रुपयांपर्यंतचे पतंग असून, ते घेण्यासाठी गर्दी होत आहे. वेगवेगळे आकार, रंगांमध्ये तसेच स्टाइलमध्ये पंतग आहेत. हिरॉइन्सचे फोटो असलेले, संदेश असलेले पतंगही दिसत असून, २० ते १५० रुपयांपर्यंतच्या पतंगांना जास्त मागणी आहे. तर महागडे पतंग काही ठरावीक लोकच विकत घेत असल्याचे दिसत आहे. अनेक लोक रात्रीच्या वेळेस पतंगांना छोटे कंदील बांधून ते आकाशात उडवतात. असे छोटे कंदीलही विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. पतंगांची विक्र ी मोठ्या प्रमाणात होत असल्याने विक्रेत्यांना या सीझनमध्ये मोठा फायदा होतो. पतंग उडविण्याची स्पर्धा आतापासूनच लागली आहे. तर शहरात काही ठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पतंगांमध्येही यंदा मोदींची क्रेझ पाहायला मिळत असून, याचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.मकर संक्र ांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज वितरण यंत्रणांपासून सावधगिरी बाळगावी, तसेच विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. संक्र ांतीनिमित्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचा मोह होतो. मात्र, पतंग उडविताना उत्साहाच्या भरात काळजी घेतली जात नाही आणि अपघातांना निमंत्रण मिळते. शहरासह विद्युत वितरणासाठी लघु व उच्चदाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. लहान मुले आणि तरुणही वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवितात. अनेक वेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतात. अतिउत्साही तरुण व लहान मुले, असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. मांजावर धातूमिश्रीत रसायनांचे आवरण असल्याने वीज तारांच्या संपर्कात येताच, या मांजात वीज प्रवाहित होऊ शकते. त्यातून दुर्घटनेसह वीज वितरण यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका संभवतो. जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग जीवाला धोकादायक ठरतो. त्यामुळे पतंग उडविताना काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८Navi Mumbaiनवी मुंबई