शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

हायब्रीड बसेस खरेदीचा घोळ

By admin | Updated: April 25, 2016 03:12 IST

पर्यावरण रक्षणासाठी महापालिका जेएनएनयूआरएमअंतर्गत दहा बसेसची खरेदी करणार होती. परंतु प्रशासकीय राजकीय उदासीनतेमुळे हा प्रस्ताव रखडल्याने अखेर दोनच बस विकत घेण्याचे निश्चित केले.

नवी मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी महापालिका जेएनएनयूआरएमअंतर्गत दहा बसेसची खरेदी करणार होती. परंतु प्रशासकीय राजकीय उदासीनतेमुळे हा प्रस्ताव रखडल्याने अखेर दोनच बस विकत घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी जवळपास दोन कोटी रूपये भरले असून अद्याप बसेस ताब्यात घेतल्या नाहीत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा कारभार वारंवार वादग्रस्त ठरत आहे. नोकरभरती, बसेस खरेदी, बसचे खासगीकरण असे अनेक निर्णय यापूर्वीही वादग्रस्त ठरले आहेत. आता यामध्ये हायब्रीड बस खरेदीच्या प्रस्तावाचीही भर पडली आहे. पालिकेने जेएनएनयूआरएमअंतर्गत दहा बसेस खरेदी करण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. परंतु ते शक्य न झाल्याने ५ बसेस खरेदीसाठी सुधारित मंजुरी घेण्यात आली. प्रत्येक बससाठी २ कोटी ६८ लाख ७८ हजार रूपये, प्रत्येक वर्षी देखभाल दुरूस्तीसाठी ९८ लाख ८४ हजार रूपये खर्च येणार होता. परंतु हा प्रस्ताव मार्च २०१५ च्या समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला. यानंतर व्हाल्वो कंपनीला निविदा स्वीकृतीचे पत्रही दिले होते. परंतु केंद्र शासनाची बस खरेदीसाठीची मुदत डिसेंबर २०१४ पर्यंतच होती. यानंतर शासनाने फेब्रुवारी २०१५ पर्यंत मुदत वाढवून दिली. परंतु याच दरम्यान परिवहन समितीने पाच बसेस खरेदीचा प्रस्तावच रद्द केला. महापालिकेने बसेस खरेदी करण्यासाठी फेरनिविदा मागविल्या व पुन्हा व्हाल्वो कंपनीलाच हे काम दिले. दरम्यान, केंद्र शासनाची मुदत संपल्याने शासनाने जेएनएनयूआरएमअंतर्गत यासाठी मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती. हायब्रीड बसेस ही इंधन व बॅटरीवर चालणार आहे. यामुळे पर्यावरण व इंधनाची बचत होणार आहे. केंद्र शासनाकडून त्याला अनुदान दिले जाणार आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हायब्रीड बस खरेदीची घोषणाही केली. पैसे भरलेले असताना व बसही तयार असताना ती प्रत्यक्षात ताब्यात घेतली जात नसल्याने प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या हेतूवर शिवसेना सदस्यांनी आक्षेप घेतले आहेत.