शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

परदेशात रोवला शिवकार्याचा झेंडा

By admin | Updated: March 11, 2016 02:48 IST

जुईनगर येथील राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम सुरू आहे.

प्राची सोनवणे, नवी मुंबईजुईनगर येथील राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८ लाख लोकांमध्ये शिवप्रतिमांचे वाटप करण्यात आले आहे. जुईनगर येथे राहणाऱ्या योगेश खिलारे या तरुणाला नोकरीनिमित्त अमेरिकेला जावे लागले आहे. परदेशी जाऊनही मनातील शिवप्रेम तिळमात्र कमी न होता इतर देशांमध्ये शिवकार्याचा प्रचार करण्याचा निर्धार योगेशने केला आणि वर्षभरात ५००हून अधिक परदेशी नागरिकांना शिवप्रतिमांचे वाटप करून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगितली.व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या सध्याच्या या पिढीला खरोखरच शिवरायांच्या वैचारिक प्रेरणेची गरज असून स्त्रियांविषयीचा आदर, आई-वडिलांविषयीचे प्रेम, कुटुंबाविषयीची आपुलकी तसेच देशसेवा करण्याकरिता तरुणांना अचूक मार्ग दाखविण्याचे कार्य शिवकार्यातून घडत असते, अशी माहिती राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक विजयदादा खिलारे यांनी दिली. लहानपणापासून योगेशवर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रभाव असून त्यांची आजी शहाबाई रंगराव खिलारे आणि आजोबा रंगराव चंद्रकांत खिलारे यांच्याकडून शिवकार्याची प्रेरणा मिळाली. योगेशला एका क्रुझवर ८५ देशातील व्यक्ती एकत्र काम करत असून योगेशच्या वाढदिवसाला तलवारीचा केक तयार करून तेथील परदेशी नागरिकांनी शिवरायांच्या नामाचा जयजयकार करत शुभेच्छांचा वर्षाव केला, हा आठवणीतला किस्सा योगेशने सांगितला. ‘लोकमत’शी बोलताना त्याने, प्रत्येक घराघरात शिवचरित्राचे वाचन केले पाहिजे. शिवचरित्रातील विचार प्रत्येकाला प्रेरणा देणारे असून यामुळे भारताचे उज्ज्वल भविष्य घडू शकते. परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देताना प्रतिमा पाहताच बरेचजण शिवरायांचा इतिहास माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात शिवकार्याचा प्रचार व प्रसार सुरू असताना भारतामध्ये मात्र शिवकालीन वास्तूंचे जतन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत योगेश यांनी व्यक्त केली, त्याचबरोबर शिवरायांचा एकेरी उल्लेख केला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताचा इतिहास ज्वलंत असून शिवरायांची युध्दनीती, त्यांचे कर्तृत्व, जबाबदारपणा, आत्मविश्वास, कणखरपणा असे अनेक गुण यामधून घेता येण्यासारखे आहेत. लोकांनी शिवरायांवरील प्रेम मनात कायम ठेवून आपल्या आजूबाजूच्या नागरिकांमध्ये शिवकार्याचे बीज पेरणे गरजेचे आहे असा मोलाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाविषयी महाराजांची खलिते असून शिवकालीन इतिहासापासून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्याचे काम केले जात आहे. तरुणांना व्यसनापासून दूर करण्याचे काम राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाच्या वतीने केले जात आहे.