शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

परदेशात रोवला शिवकार्याचा झेंडा

By admin | Updated: March 11, 2016 02:48 IST

जुईनगर येथील राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम सुरू आहे.

प्राची सोनवणे, नवी मुंबईजुईनगर येथील राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८ लाख लोकांमध्ये शिवप्रतिमांचे वाटप करण्यात आले आहे. जुईनगर येथे राहणाऱ्या योगेश खिलारे या तरुणाला नोकरीनिमित्त अमेरिकेला जावे लागले आहे. परदेशी जाऊनही मनातील शिवप्रेम तिळमात्र कमी न होता इतर देशांमध्ये शिवकार्याचा प्रचार करण्याचा निर्धार योगेशने केला आणि वर्षभरात ५००हून अधिक परदेशी नागरिकांना शिवप्रतिमांचे वाटप करून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगितली.व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या सध्याच्या या पिढीला खरोखरच शिवरायांच्या वैचारिक प्रेरणेची गरज असून स्त्रियांविषयीचा आदर, आई-वडिलांविषयीचे प्रेम, कुटुंबाविषयीची आपुलकी तसेच देशसेवा करण्याकरिता तरुणांना अचूक मार्ग दाखविण्याचे कार्य शिवकार्यातून घडत असते, अशी माहिती राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक विजयदादा खिलारे यांनी दिली. लहानपणापासून योगेशवर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रभाव असून त्यांची आजी शहाबाई रंगराव खिलारे आणि आजोबा रंगराव चंद्रकांत खिलारे यांच्याकडून शिवकार्याची प्रेरणा मिळाली. योगेशला एका क्रुझवर ८५ देशातील व्यक्ती एकत्र काम करत असून योगेशच्या वाढदिवसाला तलवारीचा केक तयार करून तेथील परदेशी नागरिकांनी शिवरायांच्या नामाचा जयजयकार करत शुभेच्छांचा वर्षाव केला, हा आठवणीतला किस्सा योगेशने सांगितला. ‘लोकमत’शी बोलताना त्याने, प्रत्येक घराघरात शिवचरित्राचे वाचन केले पाहिजे. शिवचरित्रातील विचार प्रत्येकाला प्रेरणा देणारे असून यामुळे भारताचे उज्ज्वल भविष्य घडू शकते. परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देताना प्रतिमा पाहताच बरेचजण शिवरायांचा इतिहास माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात शिवकार्याचा प्रचार व प्रसार सुरू असताना भारतामध्ये मात्र शिवकालीन वास्तूंचे जतन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत योगेश यांनी व्यक्त केली, त्याचबरोबर शिवरायांचा एकेरी उल्लेख केला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताचा इतिहास ज्वलंत असून शिवरायांची युध्दनीती, त्यांचे कर्तृत्व, जबाबदारपणा, आत्मविश्वास, कणखरपणा असे अनेक गुण यामधून घेता येण्यासारखे आहेत. लोकांनी शिवरायांवरील प्रेम मनात कायम ठेवून आपल्या आजूबाजूच्या नागरिकांमध्ये शिवकार्याचे बीज पेरणे गरजेचे आहे असा मोलाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाविषयी महाराजांची खलिते असून शिवकालीन इतिहासापासून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्याचे काम केले जात आहे. तरुणांना व्यसनापासून दूर करण्याचे काम राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाच्या वतीने केले जात आहे.