शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत कलहामुळेच शिवसेना नवी मुंबईतील सत्तेपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:43 IST

नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविली. परंतु १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून पुन्हा महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. आमंत्रणपत्रिकेच्या वादावरून सोशल मीडियावरून आक्रमकपणे प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे. शिसेनेतील हे मतभेद नवीन नसून वीस वर्षांपासून अंतर्गत कलहामुळेच पक्षाला महानगरपालिकेतील सत्तेपासून वंचित राहावे लागले आहे. नेत्यांमधील या मतभेदामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून विसंवाद थांबविण्याचे आव्हान ठाण्यातील पक्षाच्या नेत्यांसमोर उभे राहिले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविली. परंतु १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून पुन्हा महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. प्रत्येक प्रभागात पक्षाची बांधणी असताना व अनेक वेळा अनुकूल वातावरण असूनही पक्षाच्या नेत्यांमधील अंतर्गत कलहामुळेच महापालिका व विधानसभा निवडणुकीमध्येही पक्षाला अपयश येऊ लागले आहे. यावर्षीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक समर्थक नगरसेवकांना फोडून पक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. 

तुर्भेमधील सुरेश कुलकर्णी, दिघामधील गवते कुटुंबीय यांना शिवबंधन बांधून पक्षाची ताकद वाढविली असताना पुन्हा स्थानिक नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. निमंत्रणपत्रिकेवर नाव नसल्यामुळे विजय नाहटा समर्थक आक्रमक झाले आहेत. समाज माध्यमांमध्ये पक्षाच्याच इतर नेत्यांचा निषध सुरू झाला आहे. वास्तविक अनेक महिन्यांपासून हे मतभेद सुरूच होते. 

गतवर्षी महाविकास आघाडीच्यावतीने आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्यासाठीच्या खर्चासाठी निधी उपलब्ध होऊ नये व आयोजक कोंडीत सापडावेत, असा प्रयत्नही पक्षातीलच काही नेत्यांनी केल्याची चर्चा आहे. कारणे अनेक असली तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या मतभेदामुळे प्रामाणिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून हे मतभेद लवकर मिटावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीतही अपयशठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी २००७ मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून विजय चौगुले यांना शिवसेनेत आणून स्थायी समिती सभापतीपद मिळविण्याची रणनीती आखली. परंतु पक्षातीलच एका गटाला ही रणनीती न पटल्यामुळे अनंत सुतार हे आठ नगरसेवकांसह राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले व शिवसेनेची सत्ता मिळविण्याचे स्वप्न भंग पावले.

निवडणुकीतही अपयशविधानसभेच्या २००९च्या निवडणुकीमध्ये ऐरोली मतदारसंघातून विजय चौगुले यांना अनुकूल वातावरण होते. परंतु पक्षातीलच एका गटाने विरोधात काम केले व या कुरघोडीच्या राजकारणामुळे शिवसेना उमेदवाराचा ११९५७ मतांनी पराभव झाला. अंतर्गत कलहाचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता.

मध्येही झाला होता विसंवादविधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये ऐरोली मतदारसंघातून विजय चौगुले व बेलापूर मतदारसंघातून विजय नाहटा निवडणूक लढवत हाेते. परंतु एकाच शहरातील दोन मतदारसंघ असूनही प्रचारामध्ये संवाद नव्हता. दोन्ही मतदारसंघात अपयश मिळाले. बेलापूर मतदारसंघातही पक्षातील गटबाजीने सेना उमेदवाराचा निसटता पराभव झाला.

सर्वाधिक  बंडखोरी विधानसभा निवडणुकीनंतर २०१५च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही शिवसेनेतील मतभेद ऐरणीवर आले. युतीमुळे तिकीट न मिळालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखाेरी केली. यामुळे युतीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला व शिवसेनेचे महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबई