शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत कलहामुळेच शिवसेना नवी मुंबईतील सत्तेपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:43 IST

नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविली. परंतु १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून पुन्हा महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. आमंत्रणपत्रिकेच्या वादावरून सोशल मीडियावरून आक्रमकपणे प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे. शिसेनेतील हे मतभेद नवीन नसून वीस वर्षांपासून अंतर्गत कलहामुळेच पक्षाला महानगरपालिकेतील सत्तेपासून वंचित राहावे लागले आहे. नेत्यांमधील या मतभेदामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून विसंवाद थांबविण्याचे आव्हान ठाण्यातील पक्षाच्या नेत्यांसमोर उभे राहिले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविली. परंतु १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून पुन्हा महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. प्रत्येक प्रभागात पक्षाची बांधणी असताना व अनेक वेळा अनुकूल वातावरण असूनही पक्षाच्या नेत्यांमधील अंतर्गत कलहामुळेच महापालिका व विधानसभा निवडणुकीमध्येही पक्षाला अपयश येऊ लागले आहे. यावर्षीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक समर्थक नगरसेवकांना फोडून पक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. 

तुर्भेमधील सुरेश कुलकर्णी, दिघामधील गवते कुटुंबीय यांना शिवबंधन बांधून पक्षाची ताकद वाढविली असताना पुन्हा स्थानिक नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. निमंत्रणपत्रिकेवर नाव नसल्यामुळे विजय नाहटा समर्थक आक्रमक झाले आहेत. समाज माध्यमांमध्ये पक्षाच्याच इतर नेत्यांचा निषध सुरू झाला आहे. वास्तविक अनेक महिन्यांपासून हे मतभेद सुरूच होते. 

गतवर्षी महाविकास आघाडीच्यावतीने आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्यासाठीच्या खर्चासाठी निधी उपलब्ध होऊ नये व आयोजक कोंडीत सापडावेत, असा प्रयत्नही पक्षातीलच काही नेत्यांनी केल्याची चर्चा आहे. कारणे अनेक असली तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या मतभेदामुळे प्रामाणिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून हे मतभेद लवकर मिटावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीतही अपयशठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी २००७ मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून विजय चौगुले यांना शिवसेनेत आणून स्थायी समिती सभापतीपद मिळविण्याची रणनीती आखली. परंतु पक्षातीलच एका गटाला ही रणनीती न पटल्यामुळे अनंत सुतार हे आठ नगरसेवकांसह राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले व शिवसेनेची सत्ता मिळविण्याचे स्वप्न भंग पावले.

निवडणुकीतही अपयशविधानसभेच्या २००९च्या निवडणुकीमध्ये ऐरोली मतदारसंघातून विजय चौगुले यांना अनुकूल वातावरण होते. परंतु पक्षातीलच एका गटाने विरोधात काम केले व या कुरघोडीच्या राजकारणामुळे शिवसेना उमेदवाराचा ११९५७ मतांनी पराभव झाला. अंतर्गत कलहाचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता.

मध्येही झाला होता विसंवादविधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये ऐरोली मतदारसंघातून विजय चौगुले व बेलापूर मतदारसंघातून विजय नाहटा निवडणूक लढवत हाेते. परंतु एकाच शहरातील दोन मतदारसंघ असूनही प्रचारामध्ये संवाद नव्हता. दोन्ही मतदारसंघात अपयश मिळाले. बेलापूर मतदारसंघातही पक्षातील गटबाजीने सेना उमेदवाराचा निसटता पराभव झाला.

सर्वाधिक  बंडखोरी विधानसभा निवडणुकीनंतर २०१५च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही शिवसेनेतील मतभेद ऐरणीवर आले. युतीमुळे तिकीट न मिळालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखाेरी केली. यामुळे युतीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला व शिवसेनेचे महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबई