शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अंतर्गत कलहामुळेच शिवसेना नवी मुंबईतील सत्तेपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:43 IST

नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविली. परंतु १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून पुन्हा महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. आमंत्रणपत्रिकेच्या वादावरून सोशल मीडियावरून आक्रमकपणे प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली आहे. शिसेनेतील हे मतभेद नवीन नसून वीस वर्षांपासून अंतर्गत कलहामुळेच पक्षाला महानगरपालिकेतील सत्तेपासून वंचित राहावे लागले आहे. नेत्यांमधील या मतभेदामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून विसंवाद थांबविण्याचे आव्हान ठाण्यातील पक्षाच्या नेत्यांसमोर उभे राहिले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविली. परंतु १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून पुन्हा महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. प्रत्येक प्रभागात पक्षाची बांधणी असताना व अनेक वेळा अनुकूल वातावरण असूनही पक्षाच्या नेत्यांमधील अंतर्गत कलहामुळेच महापालिका व विधानसभा निवडणुकीमध्येही पक्षाला अपयश येऊ लागले आहे. यावर्षीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक समर्थक नगरसेवकांना फोडून पक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. 

तुर्भेमधील सुरेश कुलकर्णी, दिघामधील गवते कुटुंबीय यांना शिवबंधन बांधून पक्षाची ताकद वाढविली असताना पुन्हा स्थानिक नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. निमंत्रणपत्रिकेवर नाव नसल्यामुळे विजय नाहटा समर्थक आक्रमक झाले आहेत. समाज माध्यमांमध्ये पक्षाच्याच इतर नेत्यांचा निषध सुरू झाला आहे. वास्तविक अनेक महिन्यांपासून हे मतभेद सुरूच होते. 

गतवर्षी महाविकास आघाडीच्यावतीने आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्यासाठीच्या खर्चासाठी निधी उपलब्ध होऊ नये व आयोजक कोंडीत सापडावेत, असा प्रयत्नही पक्षातीलच काही नेत्यांनी केल्याची चर्चा आहे. कारणे अनेक असली तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या मतभेदामुळे प्रामाणिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून हे मतभेद लवकर मिटावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीतही अपयशठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी २००७ मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून विजय चौगुले यांना शिवसेनेत आणून स्थायी समिती सभापतीपद मिळविण्याची रणनीती आखली. परंतु पक्षातीलच एका गटाला ही रणनीती न पटल्यामुळे अनंत सुतार हे आठ नगरसेवकांसह राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले व शिवसेनेची सत्ता मिळविण्याचे स्वप्न भंग पावले.

निवडणुकीतही अपयशविधानसभेच्या २००९च्या निवडणुकीमध्ये ऐरोली मतदारसंघातून विजय चौगुले यांना अनुकूल वातावरण होते. परंतु पक्षातीलच एका गटाने विरोधात काम केले व या कुरघोडीच्या राजकारणामुळे शिवसेना उमेदवाराचा ११९५७ मतांनी पराभव झाला. अंतर्गत कलहाचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता.

मध्येही झाला होता विसंवादविधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये ऐरोली मतदारसंघातून विजय चौगुले व बेलापूर मतदारसंघातून विजय नाहटा निवडणूक लढवत हाेते. परंतु एकाच शहरातील दोन मतदारसंघ असूनही प्रचारामध्ये संवाद नव्हता. दोन्ही मतदारसंघात अपयश मिळाले. बेलापूर मतदारसंघातही पक्षातील गटबाजीने सेना उमेदवाराचा निसटता पराभव झाला.

सर्वाधिक  बंडखोरी विधानसभा निवडणुकीनंतर २०१५च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही शिवसेनेतील मतभेद ऐरणीवर आले. युतीमुळे तिकीट न मिळालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखाेरी केली. यामुळे युतीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला व शिवसेनेचे महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबई