शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

केंद्र सरकार कृषी क्षेत्राविषयी उदासीन, शरद पवार यांची घणाघाती टीका

By नामदेव मोरे | Updated: February 11, 2023 14:06 IST

Sharad Pawar: भाजीपाला, फळे यांच्या निर्यातीमध्ये अनेक अडथळे येत आहेत. या समस्या सोडविल्या पाहिजेत. परंतु केंद्र सरकार कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देत नाही अशी टिका शरद पवार यांनी केली आहे.

नवी मुंबई - भाजीपाला, फळे यांच्या निर्यातीमध्ये अनेक अडथळे येत आहेत. या समस्या सोडविल्या पाहिजेत. परंतु केंद्र सरकार कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देत नाही अशी टिका शरद पवार यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेच्या देशस्थ मराठा भवन इमारतीच्या उद्घाटनानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की देशाचा अभ्यास केल्यास महामार्ग, विमानतळ, उद्योग यासाठी जमीनी संपादीत कराव्या लागत आहेत. जमीनी कमी होत असल्यामुळे शेतीवरील भारही कमी करण्याची गरज आहे. शेतीला अधुनीकतेची जोड दिली पाहिजे. देशात फळे, भाजीपाल्याचे उत्पादन वाढत आहे. पण निर्यातीमध्ये अडथळे निर्माण होत आहे. बांगलादेश ते युरोपपर्यंत अनेक देशातील निर्यातीमध्ये अडथळे येत असून ते प्रश्न सोडविले पाहिजेत. केंद्र सरकार कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

कांद्याला चांगला भाव मिळवून देण्यासाठी निर्यातील प्रोत्साहन देण्याची गरज आहे. साखर कारखान्यांच्या आयकर विषयी मंत्री अतुल सावे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेतल्याचे व कर न भरण्याची भुमीका घेतल्याचे स्पष्ट केले. शेती व साखर कारखान्यांशी संबंधीत प्रश्न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य दिले. हे काम करताना जे टिका करताहेत ते कुठेच नव्हते असे मतही व्यक्त केले.पत्रकारांवरील हल्ले चिंतेची गोष्टसंजय राऊत यांना आलेली धमकी व राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले ही चिंतेची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या घटना लोकशाहीसाठी योग्य नाहीत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीagricultureशेती