शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार कृषी क्षेत्राविषयी उदासीन, शरद पवार यांची घणाघाती टीका

By नामदेव मोरे | Updated: February 11, 2023 14:06 IST

Sharad Pawar: भाजीपाला, फळे यांच्या निर्यातीमध्ये अनेक अडथळे येत आहेत. या समस्या सोडविल्या पाहिजेत. परंतु केंद्र सरकार कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देत नाही अशी टिका शरद पवार यांनी केली आहे.

नवी मुंबई - भाजीपाला, फळे यांच्या निर्यातीमध्ये अनेक अडथळे येत आहेत. या समस्या सोडविल्या पाहिजेत. परंतु केंद्र सरकार कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देत नाही अशी टिका शरद पवार यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेच्या देशस्थ मराठा भवन इमारतीच्या उद्घाटनानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की देशाचा अभ्यास केल्यास महामार्ग, विमानतळ, उद्योग यासाठी जमीनी संपादीत कराव्या लागत आहेत. जमीनी कमी होत असल्यामुळे शेतीवरील भारही कमी करण्याची गरज आहे. शेतीला अधुनीकतेची जोड दिली पाहिजे. देशात फळे, भाजीपाल्याचे उत्पादन वाढत आहे. पण निर्यातीमध्ये अडथळे निर्माण होत आहे. बांगलादेश ते युरोपपर्यंत अनेक देशातील निर्यातीमध्ये अडथळे येत असून ते प्रश्न सोडविले पाहिजेत. केंद्र सरकार कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

कांद्याला चांगला भाव मिळवून देण्यासाठी निर्यातील प्रोत्साहन देण्याची गरज आहे. साखर कारखान्यांच्या आयकर विषयी मंत्री अतुल सावे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेतल्याचे व कर न भरण्याची भुमीका घेतल्याचे स्पष्ट केले. शेती व साखर कारखान्यांशी संबंधीत प्रश्न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य दिले. हे काम करताना जे टिका करताहेत ते कुठेच नव्हते असे मतही व्यक्त केले.पत्रकारांवरील हल्ले चिंतेची गोष्टसंजय राऊत यांना आलेली धमकी व राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले ही चिंतेची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या घटना लोकशाहीसाठी योग्य नाहीत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीagricultureशेती