शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शंकरनगरमधील झोपड्या हटविल्या

By admin | Updated: May 12, 2017 02:00 IST

चिंचपाडा परिसरातील शंकरनगरमधील ८०० पेक्षा जास्त झोपड्या महापालिकेसह एमआयडीसीने हटविल्या आहेत. पावसाळ्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : चिंचपाडा परिसरातील शंकरनगरमधील ८०० पेक्षा जास्त झोपड्या महापालिकेसह एमआयडीसीने हटविल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमचे संसार उघड्यावर आले असून सन २००० पूर्वीच्या झोपडीधारकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. चिंचपाडा व यादवनगरच्या मधील मुख्य रोडच्या बाजूला शंकरनगर वसले आहे. येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिका व एमआयडीसीकडून वारंवार कारवाई केली जात आहे. तीन दिवसांपूर्वीही मोठ्या प्रमाणात झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. एमआयडीसीची जागा त्वरित खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. परंतु रहिवाशांनी आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. रहिवासी दिनेश चौगुले यांनी सांगितले की, अनेक नागरिक १९९५ व २००० पासून येथे रहतात. कारवाईमुळे सगळ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. आम्हाला जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या असून आम्ही जायचे कुठे, न्याय मिळविण्यासाठी लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कारवाईनंतरही रहिवाशांनी अद्याप जागा सोडलेली नाही. पुन्हा झोपड्या उभ्या केल्या जावू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.