शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

शनीच्या देव्हाऱ्यात महिलांनाच बंदी का?

By admin | Updated: December 24, 2015 01:37 IST

पुण्यातील भूमाता रणरागिणी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याना रोखण्यात आले.

पुण्यातील भूमाता रणरागिणी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याना रोखण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा समानतेचा प्रश्न ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर महिलांना आपले मत व्यक्त करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे विचाराचे व्यासपीठ खुले करून दिले. यावेळी फक्त स्त्रियांनाच बंदी का, हा भेद कशासाठी, काही वैज्ञानिक कारणे आहेत का, असतील तर ती पटण्यासारखी आहेत का? असे अनेक सवाल त्यांनी प्रतिक्रियांमधून विचारले आहेत. काही महिलांनी जाणे का योग्य नाही, याचे स्पष्टीकरण दिले. या विषयाचा धांडोळा घेतल्यावर आज २१ व्या शतकातही महिला खरंच हतबल आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.वर्गभेद, लिंगभेद, वर्णभेद या गोष्टींवर अवलंबून कुठल्याही गोष्टीचा मज्जाव होणे बरोेबर नाही. आपण काळाप्रमाणे बदलले पाहिजे. भारतात सगळ्यांनाच न्यायदेवताही समान न्याय देते. मग देवाच्या दरबारी तरी वेगळा न्याय का असावा, असा प्रश्न मला पडतो. -मीनल उत्तुरकर, सदस्य, समता विचार प्रसारक त्या महिलांनी मंदिरात जाऊन योग्यच केले आहे. का जाऊ नये, याचे शास्त्रशुद्ध कारण द्यावे आणि हे कारण पटण्यासारखेही असावे. कुठल्याही देवाने स्त्रियांनी आत येऊ नये, असे सांगितले नाही. - स्वराली पाटील, विद्यार्थीशनी शिंगणापुरात चौथऱ्यावर जायला स्त्रियांचा अट्टाहास का? देवाचे पावित्र्य आपणच राखले पाहिजे. सर्वांनीच आपले हक्क आणि कर्तऱ्याचे पालन करणे गरजेचे आहे. जिथे पाहिजे तेथे स्त्रियांना त्यांचे हक्क दिले जातात. परमेश्वर एकच आहे. बाहेरून नमस्कार केला काय किंवा चौथऱ्यावर जाऊन केला तरी तो देवला पोहचाणारच आहे. आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी हॉस्पीटलला जातानाही आपण हात-पाय स्वच्छ धुतो, चप्पल बाहेर काढतो. मंिदर हे मन:शांती करणारे हॉस्पीटलच आहे. -मेधा सोमण, प्राध्यापिका महिलांना प्रवेश देणे गरजेचे आहे. मंदिरात जाऊ न देणे ही पूर्वंपार चालत आलेली परंपरा आहे. हा विरोध उगाचचा आहे. अशा लिंग भेदामुळेच आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारामुळेच भारत देश अजूनही विकसनशीलच राहिला आहे. -अपर्णा कवी, इनरव्हील क्लब माजी अध्यक्षमंदिरात जाऊ न देणे हे चुकीचे आहे. न जाण्यामागचे काही कारणेही त्यांच्याकडे नाही. आपला समाज स्त्रीला माणूस म्हणून जगू देत नाहीत, त्यामुळे हा सगळ्या गोष्टी घडतात. डिस्क्रिमिनेशन करणे चुकीचे आहे आणि असे कुठल्याही देवाने सांगितले नाही. -अंशुल वागळे, विद्यार्थी