शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:13 IST

सेंट्रल पार्कच्या नावाखाली पालिकेने उद्ध्वस्त केलेल्या घणसोलीतील सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : सेंट्रल पार्कच्या नावाखाली पालिकेने उद्ध्वस्त केलेल्या घणसोलीतील सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. प्रकल्पबाधितांनी सेंट्रल पार्कलगतच्याच भूखंडावर पुनर्वसनाची मागणी केली आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात स्थानिक आमदारांच्या समवेत पालिका आयुक्तांसोबत बैठक निश्चित करण्यात आली असून, त्यात तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.सेंट्रल पार्कसाठी भूखंड आरक्षित असल्याच्या कारणावरून घणसोली येथील सावली गाव उद्ध्वस्त करून दहा वर्षांचा कालावधी होत आला आहे, तर तीन वर्षांपूर्वी त्याठिकाणी सुरू झालेल्या पार्कच्या पहिल्या टप्प्याचे देखील काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तिथल्या मूळ ग्रामस्थांच्या घरांसह लगतच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आलेली. या वेळी सदर गावठाणाच्या जागेच्या हक्कावरून देखील ग्रामस्थांनी सिडको व महापालिकेला आव्हान दिले होते; परंतु ग्रामस्थांचा विरोध डावलून त्यांची घरे पाडण्यात आलेली. त्यामुळे सावली गावातील मूळ ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात देखील लढा सुरू ठेवला आहे; परंतु पुनर्वसनाचा तिढा सुटत नसल्याने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरू केले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात महानगरपालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्यासोबत सावली ग्रामस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये पुनर्वसनाचा तिढा सुटेल, असा विश्वास पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पबाधितांकडून व्यक्त होत आहे.सावली गाव हटवल्यानंतर तिथला ४४ हजार १२४.९३ चौ.मी.चा भूखंड सिडकोने सेंट्रल पार्कसाठी हस्तांतर करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र सिडकोने एकूण ५८६४ चौ. मी. क्षेत्रफळाचे तीन भूखंड वगळून उर्वरित ३८ हजार २६०.९३ चौ.मी. भूखंड पालिकेला हस्तांतरण केला. त्यात तीनपैकी एका भूखंडावरच पुनर्वसन व्हावे असे प्रकल्पबाधित सावली ग्रामस्थांचे म्हणणे आहे; परंतु सावली गावठाणातील सुमारे १५ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी २५ गुंठे भूखंडाची आवश्यकता आहे. तेवढ्या क्षेत्रफळाचा एकत्र भूखंड सेंट्रल पार्कलगत नसल्याने एक पूर्ण भूखंड तर दुसºया अर्धा भूखंड पुनर्वसनासाठी वापरला जावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या भावना पालिका व सिडकोपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. तसेच पार्कच्या जागेतून वगळलेले इतरही भूखंड पालिकेच्या ताब्यात मिळावे याची देखील मागणी सिडकोकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.