शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

कामोठे वसाहतीमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू; कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 00:25 IST

३२ सोसायट्यांमधील रहिवाशांची तक्रार

कळंबोली : कामोठे वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ३२ सोसायट्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक सेक्टरमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. सिडकोचे नियोजन नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

कामोठे वसाहतीची लोकसंख्या अडीच लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे साहजिकच येथील पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भविष्यात ती आनखी वाढण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून कामोठे वसाहतीला पाणी दिले जाते. कळंबोली येथून ही जोडणी आहे. या वसाहतीची मागणी ४२ एमएलडी इतकी आहे. परंतु तुलनेत पाणी कमी मिळत आहे. त्यामुळे रहिवाशांना आवश्यक तितके पाणी मिळत नाही. त्यातच पाणी जोडणी केंद्रापासून जी वाहिनी टाकण्यात आली आहे, त्याची क्षमता कमी असल्याने कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्याचबरोबर वसाहतीत पाणी साठवणूक करण्याकरिता जलकुंभ नाहीत. त्यामुळे आणीबाणीच्या काळात पाणी मिळत नाही. सेक्टर ५, ६, ७, ८, ९, १०, १४, १९, २१, २२, ३४, ३६ या ठिकाणी टंचाई म्हणजे जास्त दाबाने पाणी येत नाही. काही ठिकाणी पिण्याइतपर्यंतही पाणी येत नाही. तसेच इतर अडचणी येत आहेत. चाकरमानी महिलांना तर खूप त्रास होत आहे. याबाबत एकता सामाजिक संस्थेकडून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला पत्रव्यवहार केला आहे. सिडकोने याकरिता जास्त व्यासाची पाइपलाइन टाकण्याची मागणी आम्ही केली असल्याचे संस्थेचे सदस्य अल्पेश माने यांनी सांगितले.कामोठे वसाहतीत पाणी कमी दाबाने का येते? तसेच तेथे पाण्याच्या तक्र ारी का आहेत, याविषयी पाहणी केली जाईल. त्यानंतर येथील प्रश्न निकाली काढण्याकरिता प्रयत्न केले जातील. सर्व ठिकाणी पाणी व्यवस्थित वितरित व्हावे असा आमचा प्रयत्न असेल. - गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग