शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

कामोठे वसाहतीमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू; कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 00:25 IST

३२ सोसायट्यांमधील रहिवाशांची तक्रार

कळंबोली : कामोठे वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ३२ सोसायट्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक सेक्टरमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. सिडकोचे नियोजन नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

कामोठे वसाहतीची लोकसंख्या अडीच लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे साहजिकच येथील पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भविष्यात ती आनखी वाढण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून कामोठे वसाहतीला पाणी दिले जाते. कळंबोली येथून ही जोडणी आहे. या वसाहतीची मागणी ४२ एमएलडी इतकी आहे. परंतु तुलनेत पाणी कमी मिळत आहे. त्यामुळे रहिवाशांना आवश्यक तितके पाणी मिळत नाही. त्यातच पाणी जोडणी केंद्रापासून जी वाहिनी टाकण्यात आली आहे, त्याची क्षमता कमी असल्याने कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्याचबरोबर वसाहतीत पाणी साठवणूक करण्याकरिता जलकुंभ नाहीत. त्यामुळे आणीबाणीच्या काळात पाणी मिळत नाही. सेक्टर ५, ६, ७, ८, ९, १०, १४, १९, २१, २२, ३४, ३६ या ठिकाणी टंचाई म्हणजे जास्त दाबाने पाणी येत नाही. काही ठिकाणी पिण्याइतपर्यंतही पाणी येत नाही. तसेच इतर अडचणी येत आहेत. चाकरमानी महिलांना तर खूप त्रास होत आहे. याबाबत एकता सामाजिक संस्थेकडून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला पत्रव्यवहार केला आहे. सिडकोने याकरिता जास्त व्यासाची पाइपलाइन टाकण्याची मागणी आम्ही केली असल्याचे संस्थेचे सदस्य अल्पेश माने यांनी सांगितले.कामोठे वसाहतीत पाणी कमी दाबाने का येते? तसेच तेथे पाण्याच्या तक्र ारी का आहेत, याविषयी पाहणी केली जाईल. त्यानंतर येथील प्रश्न निकाली काढण्याकरिता प्रयत्न केले जातील. सर्व ठिकाणी पाणी व्यवस्थित वितरित व्हावे असा आमचा प्रयत्न असेल. - गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग