शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांकडून उकळले सात लाख

By admin | Updated: January 20, 2016 02:06 IST

विमा योजनेच्या नावाखाली रायगड जिल्ह्णामधील ३,६५० विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ७ लाख ३० हजार रुपये घेऊन पळून गेलेल्या

नवी मुंबई : विमा योजनेच्या नावाखाली रायगड जिल्ह्णामधील ३,६५० विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ७ लाख ३० हजार रुपये घेऊन पळून गेलेल्या एजंटविरोधात पाच पोलीस स्टेशनांमध्ये गुन्हे दाखल झाले असून, नवी मुंबई व रायगड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यामधील प्रमुख संशयित आरोपी के. सी. शर्मा याने पेण, खालापूर, खोपोली, रसायनी व उरण तालुक्यामध्ये विविध शाळांच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन शासनाने आम आदमी विद्यार्थी विमा योजना सुरू केली असल्याचे सांगितले होते. एलआयसीच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांचा पूर्णपणे मोफत विमा काढण्यात येणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याने फक्त २०० रुपये नोंदणी शुल्क भरायचे असल्याचे सांगितले होते. अनेक शाळांमधील व्यवस्थापनाने एजंटवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. परंतु या योजनेविषयी अधिकृतपणे सरकारचे कोणतेही पत्र आले नसल्यामुळे काही शिक्षकांना शंका आली. शिक्षकांनी एलआयसी कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता, अशाप्रकारे कोणतीही योजना नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. विमा योजनेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच रायगड जिल्ह्णातील पाच शाळांमधील व्यवस्थापनाने अनुक्रमे पेण, खालापूर, खोपोली, रसायनी पोलीस स्टेशनांमध्ये संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामधील उरण पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्णातील आरोपी के. सी.शर्मा याचा शोध घेण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. नवी मुंबई पोलिसांनीही त्याला शोधण्यासाठी पथक तयार केले आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वास रायगड व नवी मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. या आरोपीने अजून कोणत्या शाळांमधील विद्यार्थ्यांची फसवणूक केली असेल तर संबंधितांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणामध्ये एका आरोपीचे नाव पुढे आले असले तरी या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा समावेश आहे, याबाबतही माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाकडून संबंधित व्यक्तीची माहिती घेतली आहे. त्याचे संपर्क क्रमांक व इतर माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापणाने कोणत्याही शासकिय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यासाठी एजंटशी संपर्क साधू नये. (प्रतिनिधी)