शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

ठाणे-बेलापूर रोडवर अपघातांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 02:42 IST

महापालिका व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ठाणे-बेलापूर रोडवर अपघातांची मालिका सुरू झाली आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : महापालिका व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ठाणे-बेलापूर रोडवर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. तुर्भे ते दिघा दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. अपघातजन्य ठिकाणांची माहितीही देण्यात आलेली नाही. यामुळे रोज अपघात होवू लागले असून, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होवू लागली आहे.ठाणे-बेलापूर रोडवरून ऐरोलीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील (डीएन ०९ एन ९४५०) चालकाला घणसोलीजवळील उड्डाणपुलाचा अंदाज आला नाही. पुढे उड्डाणपूल असल्याच्या सूचनाही रोडवर कुठेच लावण्यात आल्या नव्हत्या. यामुळे कंटेनरने दुभाजकास धडक दिली. कंटेनर दुभाजकावरून १०० फूट पुढे गेला. या अपघातामध्ये चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. कंटेनर पलटी झाला नसल्याने वाहतूककोंडी व जीवितहानी झाली नाही. घणसोली रेल्वे स्टेशनसमोरील हा पहिला अपघात नाही. एक महिन्यात तीन कंटेनरचे याच ठिकाणी अपघात झाले आहेत. एक कंटेनरच्या धडकेमुळे रोडला लागून असलेली संरक्षण भिंतही कोसळली आहे. अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीही झाली होती. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी रंबलर्स बसविण्यात यावेत. १०० व २०० मीटर अंतरावर पुढे उड्डाणपूल असल्याचे सूचना फलक लावणे आवश्यक आहे. शिवाय एमएमआरडीएच्या भुयारी मार्गाचे काम सुरू असून त्याचा उल्लेखही असणे आवश्यक आहे. पण यापैकी काहीही सूचना नसल्यामुळे हा अपघात झाला. याठिकाणी रोज किमान एकतरी वाहनाचा अपघात होत आहे. पूर्ण ठाणे-बेलापूर रोडवर हीच स्थिती आहे. तुर्भे नाक्यावर या रोडची सुरुवात होते. महामार्ग संपल्यानंतर पुढे एपीएमसीच्या दिशेला जाण्यासाठी उड्डाणपूल आहे. वास्तविक ठाण्याकडे जाणारी वाहने पुलावरून न जाता डावीकडून पुढे जाणे अपेक्षित आहे. पण याविषयी सूचना फलक देण्यात आलेला नाही. यामुळे अनेक वाहने दुभाजकाला धडकत आहेत.तुर्भे स्टोअर्सवरून पुढे आल्यानंतर कोपरीकडे जाणारा उड्डाणपूल आहे. वाशी, एपीएमसीकडे जाणारी वाहने या पुलावरून जाणे अपेक्षित आहे. ठाण्याकडे जाणाºया वाहनांसाठी हा पूल नाही. पण याविषयी योग्य सूचना फलक योग्य अंतरावर लावण्यात आलेले नाहीत. यामुळे ठाणे-बेलापूर रोडवर उड्डाणपुलांच्या सुरुवातीला अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.>कोट्यवधी रुपये पाण्यातमहापालिकेने ठाणे-बेलापूर रोडच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका दिला आहे. ठेकेदाराने वर्षभर रोडवर दुभाजकाजवळ परावर्तक पट्ट्या बसविणे, दुभाजकाची स्वच्छता ठेवून त्यांची रंगरंगोटी करणे, रोडवर आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक बसविणे आवश्यक आहे. पण ठेकेदार कामचुकारपणा करत असून पालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात जात असून अपघातामुळे जीवित व वित्तहानी होत आहे.>रंबलर्स बसवाघणसोली रेल्वे स्टेशनबाहेर उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून वारंवार अपघात होत आहे. गत महिन्यात दोन वेळा कंटेनर पलटी झाल्याने प्रचंड वाहतूककोेंडी झाली होती. बुधवारी पहाटेही याच ठिकाणी कंटेनरचा अपघात झाला आहे. पुलाच्या १०० मीटर अंतरावर सूचना फलक व रंबलर्स बसविण्यात यावेत अशा सूचना वाहतूक पोलिसांनी महापालिकेला केल्या आहेत.>ठाणे-बेलापूर रोडवर पुरेसे सूचना फलक नाहीत. अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स बसविण्यात यावेत, परावर्तक पट्टे व सूचना फलक लावण्यात यावेत यासाठी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे.- नितीन पवार,पोलीस उपआयुक्त,वाहतूक