शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

कर्नाळ्यात अपघातांची मालिका, एका महिन्यात दहा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 02:45 IST

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत अपघातांची मालिका सुरू आहे. येथील वळणावर ट्रेलर व इतर अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना घडत आहेत.

पनवेल - मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत अपघातांची मालिका सुरू आहे. येथील वळणावर ट्रेलर व इतर अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. एका महिन्यात दहा अपघात झाले असून दोघांना जीव गमवावा लागला असून १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महामार्गावर होणाऱ्या अपघाताविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. गुरु वारी देखील या मार्गावर ट्रेलर उलटला. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. खिंडीतील कमळतळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागमोडी वळण देण्यात आले आहे. याठिकाणाहून जाताना वाहन चालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कर्नाळा खिंडीत अवजड वाहनांचेच अपघात होत आहेत. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.२०१८ मध्ये या संपूर्ण मार्गावर सुमारे १५६ अपघातांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातात ४० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये देखील अपघातांचा आकडा वाढतच चालला आहे. यामध्ये कर्नाळा खिंडीत होणाºया अपघातांची संख्या लक्षणीय आहे. कर्नाळा खिंडीत रस्त्याचे रुंदीकरण करताना वृक्षांची मोठी कत्तल करण्यात आली. त्यानंतर मोठी नागमोडी वळणे देऊन हा रस्ता तयार करण्यात आला. विशेष म्हणजे अतिवेगाने याठिकाणाहून वाहने जात असतात. वळणाचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघाताचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी नागमोडी वळण देताना वळण कमी करण्याची गरज होती.मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्याप सुरू आहे. ते पूर्ण झालेले नाही. शासनाने दिलेली १६ जून २०१९ ची डेडलाइन देखील पुढे गेली असल्याने महामार्गाचे काम पूर्ण कधी होणार? असा प्रश्न सध्याच्या घडीला विचारला जात आहे. रुंदीकरण करताना या रोडवरील अपघात कमी करण्यासाठीही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.ग्रामस्थांचीही होत आहे गैरसोयमहामार्गाच्या दोन्ही बाजूला गावे आहेत. या गावांसाठी सर्व्हिस रोड, भुयारी मार्ग व इतर प्रस्तावित आहे. गावांमधील नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी योग्य सुविधा नाही. यामुळे रोडवरूनच रस्ता ओलांडावा लागत असून त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.कर्नाळा खिंडीत नागमोडी वळण असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवून संबंधित नागमोडी वळण कमी करण्याची विनंती केली आहे.- अशोक नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,नवीन पनवेल वाहतूक शाखा

टॅग्स :Raigadरायगड