शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यात सेनेला अपयश

By admin | Updated: January 24, 2017 06:04 IST

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जतन करण्यात नवी मुंबईतील शिवसेना नेत्यांना अपयश आले आहे.

नवी मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जतन करण्यात नवी मुंबईतील शिवसेना नेत्यांना अपयश आले आहे. निधनानंतर चार वर्षानंतरही एकही महत्वाच्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नसल्याने सामान्य शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करण्यात सुरुवात केली आहे. नवी मुंबईच्या उभारणीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेला सत्ता मिळाली व संजीव नाईक हे देशातील सर्वात कमी वयाचे महापौर झाले. यानंतर शहराच्या विकासकामांवर बाळासाहेबांनी स्वत: लक्ष दिले होते. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची रचना करण्यामध्ये त्यांनी स्वत: लक्ष दिले होते. वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयाचा भुखंड मिळविण्यापासून ते रूग्णालय उभारण्यापर्यंत बाळासाहेबांचे योगदान होते. शहरातील एकमेव सांस्कृतिक केंद्र असलेले विष्णुदास भावे नाट्यगृह सिडकोकडून हस्तांतरण करून घेतले होते. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची सुरवातही बाळासाहेबांच्या जन्मदिनाच्या दिवशीच झाली होती. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यापासून बहुतांश प्रमुख नेत्यांची सुरवात शिवसेनेमधूनच झाली होती. राष्ट्रवादी काँगे्रसमधील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आताही आम्ही मुळचे शिवसेनेचे असल्यचे अभिमानाने सांगतात. बाळासाहेबांविषयी सर्वांनाच आदर आहे पण त्यांच्या निधनानंतर चार वर्ष झाल्यानंतरही अद्याप त्यांचे स्मारक शहरात उभे राहिलेले नाही. एकही उद्यान, शाळा, रूग्णालय व इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. जयंती व पुण्यतिथीला होर्डींग व सोशल मिडीयामधून आदर व्यक्त करणारे नेते प्रत्यक्षात त्यांच्या स्मृती जतन करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरातील निष्ठावान शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या निधनानंतर महासभेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना महापौरांसह सर्व पक्षीय नगरसेवकांनी साहेबांचे स्मारक उभे राहिले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले होते. पण प्रत्यक्षात त्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी घणसोलीमधील प्रस्तावीत क्रीडांगणाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केली आहे. पण ते क्रीडांगण उभे राहण्यास आवकाश आहे. राज्य शासनाने एसटी डेपोच्या भुखंडावर त्यांच्या नावाने अभियांत्रीकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा एक वर्षापुर्वी केली आहे. पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. (प्रतिनिधी)