शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

ज्येष्ठ नागरिक भार नसून देशाची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:49 IST

सशक्त समाजासाठी एकत्र कुटुंब पद्धती अतिशय महत्त्वाची असून ती नष्ट होता कामा नये.

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अनेक आहेत. त्यांना सुविधा कमी मिळाल्या तरी चालतील; पण त्यांना खरी गरज आधाराची आहे. कारण, ज्येष्ठ नागरिक हे भार नसून ते देशाची संपत्ती आहेत. त्या अनुषंगाने त्यांना जपले पाहिजे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.‘लोकमत’ आणि श्री गोवर्धनी सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामास्वामी एन. उपस्थित होते. या वेळी सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गील, माजी पोलीस आयुक्त रामराव वाघ, हास्य कवी अशोक नायगावकर, कार्यक्रमाच्या निमंत्रिका आमदार मंदा म्हात्रे आणि ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे चापके उपस्थित होते.सशक्त समाजासाठी एकत्र कुटुंब पद्धती अतिशय महत्त्वाची असून ती नष्ट होता कामा नये. कारण संयुक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांना मानाचे स्थान असते. शासनाच्या कितीही महत्त्वाच्या योजना असल्या तरीदेखील त्या मूळ लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. नवी मुंबईत तीन नवीन विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येत असून, यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त रामास्वामी एन. यांनी या वेळी दिली.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ ज्येष्ठ नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच १६ ज्येष्ठ नागरिक संघाचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिकांविषयी आपली तळमळ व्यक्त केली. येत्या काळात या घटकांसाठीच अधिक काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ज्येष्ठांनी स्वत:ला कधीच एकटे समजू नका, असा मोलाचा सल्ला देतानाच प्रत्येक अडचणीत त्यांच्या सोबत राहण्याची ग्वाही, या व्यासपीठावरून दिली. लवकरच नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानावर ज्येष्ठांकरिता एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाला जवळपास पाच हजार ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहतील. यात ज्येष्ठ नागरिक आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतील, असेही मंदा म्हात्रे यांनी या वेळी स्पष्ट केले. तर ज्येष्ठ नागरिक हा समाजातील अतिशय संवेदनशील घटक आहे. त्यांच्यात इच्छामरणाची बळावत चालली प्रवृत्ती चिंताजनक आहे. देशाचा खरा विकास साधायचा असेल, तर या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई