शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक भार नसून देशाची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:49 IST

सशक्त समाजासाठी एकत्र कुटुंब पद्धती अतिशय महत्त्वाची असून ती नष्ट होता कामा नये.

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अनेक आहेत. त्यांना सुविधा कमी मिळाल्या तरी चालतील; पण त्यांना खरी गरज आधाराची आहे. कारण, ज्येष्ठ नागरिक हे भार नसून ते देशाची संपत्ती आहेत. त्या अनुषंगाने त्यांना जपले पाहिजे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.‘लोकमत’ आणि श्री गोवर्धनी सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामास्वामी एन. उपस्थित होते. या वेळी सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गील, माजी पोलीस आयुक्त रामराव वाघ, हास्य कवी अशोक नायगावकर, कार्यक्रमाच्या निमंत्रिका आमदार मंदा म्हात्रे आणि ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे चापके उपस्थित होते.सशक्त समाजासाठी एकत्र कुटुंब पद्धती अतिशय महत्त्वाची असून ती नष्ट होता कामा नये. कारण संयुक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांना मानाचे स्थान असते. शासनाच्या कितीही महत्त्वाच्या योजना असल्या तरीदेखील त्या मूळ लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. नवी मुंबईत तीन नवीन विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येत असून, यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त रामास्वामी एन. यांनी या वेळी दिली.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ ज्येष्ठ नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच १६ ज्येष्ठ नागरिक संघाचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिकांविषयी आपली तळमळ व्यक्त केली. येत्या काळात या घटकांसाठीच अधिक काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ज्येष्ठांनी स्वत:ला कधीच एकटे समजू नका, असा मोलाचा सल्ला देतानाच प्रत्येक अडचणीत त्यांच्या सोबत राहण्याची ग्वाही, या व्यासपीठावरून दिली. लवकरच नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानावर ज्येष्ठांकरिता एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाला जवळपास पाच हजार ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहतील. यात ज्येष्ठ नागरिक आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतील, असेही मंदा म्हात्रे यांनी या वेळी स्पष्ट केले. तर ज्येष्ठ नागरिक हा समाजातील अतिशय संवेदनशील घटक आहे. त्यांच्यात इच्छामरणाची बळावत चालली प्रवृत्ती चिंताजनक आहे. देशाचा खरा विकास साधायचा असेल, तर या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई