शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 04:13 IST

संततधारेने कोसळणाºया पावसाची तमा न बाळगता, दीड दिवसांच्या बाप्पाला नवी मुंबईकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहराच्या विविध भागांत भक्तिरसात चिंब झालेल्या भक्तांनी दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केले.

नवी मुंबई : संततधारेने कोसळणाºया पावसाची तमा न बाळगता, दीड दिवसांच्या बाप्पाला नवी मुंबईकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहराच्या विविध भागांत भक्तिरसात चिंब झालेल्या भक्तांनी दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केले. महापालिकेच्या माध्यमातून गणेश विसर्जनासाठी त्या त्या विभागांत विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.शुक्रवारी गणेशाचे घराघरांत वाजतगाजत आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतला पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवार सकाळपासून अविरत कोसळणाºया पावसामुळे गणेशभक्तांची काही प्रमाणात गैरसोय झाली. असे असले तरी चिंब पावसाची तमा न बाळगता, भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. शनिवारी दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. वाशी तलाव, कोपरखैरणे, कोपरी तसेच घणसोली गोठीवली, ऐरोली, सानपाडा, नेरुळ, सीबीडी आदी भागांतील तलावात श्रीच्या मूर्तींचे भावपूर्ण वातावरणात व ‘गणपती बाप्पा मोºया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात विसर्जन करण्यात आले.पनवेलमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. विसर्जनासाठी शहरातील तलावात तर ग्रामीण भागात नदीमध्ये गणेशभक्तांनी गर्दी केली होती. पुढच्या वर्षी लवकर या... असे आग्रहाचे निमंत्रण देत बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपतीचे शुक्र वारी आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील सगळी दु:ख दूर करतो, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांनी व्यक्त केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करीत दीड दिवसांच्या बाप्पाला हजारो भाविकांनी निरोप दिला. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात शनिवारी विसर्जन करण्यात आले.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचा फटका विसर्जन कार्याला बसला. विसर्जनाला जाणाºया गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली. विशेषत: ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, गोठीवली, कोपरी या भागांतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यातच दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने खड्ड्यांत पाणी साचून त्याचे डबक्यात रूपांतर झाले आहे. अशा खड्डेमय व जलमय रस्त्यावरून श्रीच्या विसर्जनाची मिरवणूक काढताना भक्तांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.