शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

जप्त केलेली वाहने ठरताहेत डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 02:50 IST

विविध कारवायांमध्ये जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी जागा नसल्याने पोलिसांसह आरटीओपुढे जागेचा प्रश्न उभा राहिला आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई- विविध कारवायांमध्ये जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी जागा नसल्याने पोलिसांसह आरटीओपुढे जागेचा प्रश्न उभा राहिला आहे. सद्य:स्थितीला अशी वाहने पोलीस ठाण्याभोवती अथवा रस्त्यालगत ठेवली जात आहेत. परंतु कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण करून ताबा घेतला जात नसल्याने वर्षानुवर्षे पडून राहिलेली बहुतांश वाहने भंगार बनली असून पोलिसांना त्याची राखण करावी लागत आहे.अपघातग्रस्त अथवा गुन्ह्यात वापरलेली किंवा बेवारस स्थितीमध्ये उभी असलेली वाहने आरटीओ, वाहतूक तसेच शहर पोलिसांकडून जप्त केली जातात. अशा वाहनांमध्ये ट्रक, कार यांसह दुचाकी व रिक्षांचा सर्वाधिक समावेश आहे. ही वाहने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांकडून संबंधितांच्या ताब्यात दिली जातात. अथवा न्यायालयाच्या निदेशानुसार त्यांचा लिलाव केला जातो. परंतु अनेकदा जप्तीची वाहने सोडविण्याचा प्रयत्नदेखील संबंधितांकडून होत नाही. अशी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे पडून राहतात. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात जप्तीच्या वाहनांचा खच पाहायला मिळत आहे. तर आरटीओकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा ढीग एपीएमसीतल्या चाचणी मैदानाच्या एका भागात साचला आहे. ज्या पोलीस ठाण्याभोेवती जराही जागा शिल्लक नाही, पर्यायाने अशी वाहने रस्त्यालगत अथवा परिसरातल्या मोकळ्या भूखंडावर साठवली जातात. शहरात अशी शेकडो वाहने उघड्यावर धूळ खात पडून राहिल्याने झीज होऊन भंगार झाली आहेत. त्यानंतरही केवळ कायदेशीर प्रक्रियेअभावी पोलिसांना या भंगाराचीदेखील राखण करावी लागत आहे.जप्तीची वाहने साठवण्यासाठी आरटीओसह पोलिसांकडे पुरेशी जागा नाही. यामुळे त्यांना केवळ जप्तीची वाहने साठवण्यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता भासत आहे. कायदेशीर प्रक्रियेपूर्वी जप्तीतले वाहन गहाळ झाल्यास संबंधित अधिकाºयाला न्यायालयाची चपराक बसू शकते. यामुळे भंगार झाले तरीही पोलिसांकडून त्याची जपवणूक होत आहे. मुळात ठरावीक कालावधीनंतरही जप्तीच्या वाहनांचा संबंधिताने ताबा घेतला नाही, तर ती सुस्थितीत असतानाच लिलावात काढणे आवश्यक आहे. असे झाले तरच त्यापासून शासनाला पुरेसा मोबदला मिळू शकतो. परंतु वर्षानुवर्षे ती पडून राहिल्यानंतर त्यांचा भगार म्हणून कवडीमोल भावाने लिलाव केला जातो. कायद्याच्या प्रक्रियेतील अशा दिरंगाईमुळे शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या आवारात भंगाराचे ढीग साचले आहेत. याचा परिणाम परिसराच्या स्वच्छतेवरदेखील होत आहे.>रिक्षांची संख्या अधिकआरटीओकडून जप्त केल्या जाणाºया वाहनांमध्ये रिक्षांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. ठरावीक कालावधीनंतर अशा रिक्षांचादेखील लिलाव केला जातो. अशावेळी एका शहरात खरेदी केलेल्या भंगार रिक्षांची डागडुजी करून दुसºया शहरात वापरल्या जातात. शहरात रस्त्यावर धावणाºया बोगस रिक्षांमध्येअशाच भंगार रिक्षांचा समावेश आहे.