शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

सुरक्षारक्षक बोर्डाचीही केली फसवणूक

By admin | Updated: December 21, 2015 01:34 IST

सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरीचे आमिष दाखवून मराठी तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबईसुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरीचे आमिष दाखवून मराठी तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एजंटच मंडळाचे तोतया इन्स्पेक्टर बनल्याचे स्पष्ट झाले आहे. खोटी कागदपत्रे, शिक्के व अधिकाऱ्यांच्या सह्या करून बोर्डाचीही फसवणूक केली आहे. सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणेमध्ये काम करणारा सुरक्षारक्षक एम. जी. मिश्रा याने मराठी तरुणांना फसविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लोकमतने याविषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सुरक्षा मंडळामध्ये खळबळ उडाली आहे. फसविण्यात आलेले तरुण ज्या ठिकाणी काम करत होते तेथून सर्व माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिश्राचा ठावठिकाणा शोधण्यासही सुरवात झाली आहे. बोर्डाच्या नावाने खोटे नियुक्तीपत्र, बोर्डाचे शिक्के, अधिकाऱ्यांच्या सह्याही केल्या असल्याचे समोर आले आहे. याविषयी सुरक्षा मंडळाला यापूर्वीच कुणकुण लागली होती. परंतु कोणाचीही अधिकृत तक्रार नसल्यामुळे याविषयी गुन्हा दाखल केला नाही. सानपाडा पोलीस स्टेशनला बोर्डाच्या नावाचा दुरुपयोग होत असल्याची तक्रार दिली होती. सुरक्षा मंडळामध्ये नोकरी लावणारे रॅकेट अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मंडळाच्या अखत्यारीत जवळपास २५०० कंपन्या आहेत. एखाद्या ठिकाणी सुरक्षारक्षकाची आवश्यकता असेल तर परस्पर त्यांची नियुक्ती केली जात होती. यामधील एक रॅकेट मिश्रा चालवत आहे. त्याने सुरक्षारक्षक मंडळामध्ये एम. के. भोसले नावाचे इस्पेक्टर आहेत. ते आपले काम करून देत असल्याचे भासवत होता. भोसलेंच्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड तयार करून ते तरुणांना दिले जात आहे. त्यामध्ये सानपाडा कार्यालयाचा पत्ता व संपर्क नंबरही दिले आहेत. मराठी तरुणांना दिलेले नियुक्ती पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तरुणांना महानगर गॅस, सेबी, टाटा कन्सल्टन्सी, युनियन बँक, नानावटी रुग्णालयामध्ये नोकरीची जबाबदारी दिली होती. अजूनही काही कर्मचारी तेथे काम करत आहेत. वास्तविक एखाद्या खाजगी किंवा शासकीय आस्थापनाने सुरक्षारक्षकांची मागणी केल्यानंतर बोर्डाच्यावतीने त्यांना संबंधित ठिकाणी पाठविले जाते. कर्मचाऱ्यांनी चार ते पाच महिने काम केले. याचाच अर्थ त्यांच्या नावाने वेतनही बोर्डाकडे पाठविले असणार. मग सदर रक्कम परस्पर कुठे गेली असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एजंटने फक्त सुरक्षारक्षकांची व बोर्डाची फसवणूक केलेली नाही तर सरकारी व खाजगी आस्थापनांचीही फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी बोर्डानेही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होवू लागली आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या तरुणांची भरती बोर्डाने केली नसल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. भरती करताना त्याविषयी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देत असते. तरुणांची शारीरिक, वैद्यकीय चाचणी, चारित्र्य पडताळणी करून अधिकृतपणे कार्यालयात नियुक्तीपत्र दिले जाते. ज्या तरुणांची फसवणूक झाली त्यांना कार्यालयात नियुक्तीपत्र दिलेले नाही. मिश्रा नावाच्या एजंटने बोर्डाच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करून हा प्रकार केला असल्याचे सांगण्यात आले. बोर्डाकडून जवळपास अडीच हजार सरकारी व खाजगी कार्यालयांमध्ये सुरक्षारक्षक पुरविले जात आहेत. एखाद्या ठिकाणी जागा कमी असेल तर तेथे या एजंटने खोटी कागदपत्रे देवून भरती केल्याची माहिती देण्यात आली.