शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
4
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
5
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
6
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
7
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
8
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
9
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
10
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
11
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
12
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
13
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
14
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
15
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
16
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
17
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
18
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
19
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
20
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट

शोध २२,३३० आरोपींचा

By admin | Updated: January 24, 2016 01:45 IST

पोलीस आयुक्तालयामध्ये शोध न लागलेल्या गुन्ह्यांचा बॅकलॉग वाढत असून, त्याच प्रमाणात गुन्ह्यांमधील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची संख्याही वाढत आहे. नवी मुंबई, पनवेल

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईपोलीस आयुक्तालयामध्ये शोध न लागलेल्या गुन्ह्यांचा बॅकलॉग वाढत असून, त्याच प्रमाणात गुन्ह्यांमधील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची संख्याही वाढत आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातील २० पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल २२,३३० आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यापैकी ३०४ जणांना फरार घोषित करण्यात आले असून, यामध्ये छोटा राजन, रवी पुजारीसह अनेक कुख्यात गुंडांचा समावेश आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. देशातील सर्वात वेगाने विस्तार होणाऱ्या शहरांमध्ये या परिसराचा समावेश आहे. जगातील मोठ्या उद्योजकांमध्ये समावेश असणाऱ्या रिलायन्स समूहाची हेड कॉर्टर याच परिसरात आहे. देशातील सर्वात मोठे जेएनपीटी बंदर व आशिया खंडातील सर्वात माठी बाजार समिती या परिसरात आहे. ठाणे, बेलापूरसह तळोजा औद्योगिक वसाहती पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत. नवी मुंबई व दक्षिण नवी मुंबई ही दोन्ही शहरे देशातील पहिली स्मार्ट सिटीची मानकरी ठरण्याची शक्यता आहे. विमानतळ, मेट्रो, नैना परिसरामुळे पुढील पाच वर्षांत ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. परिसराच्या विकासाबरोबर येथील गुन्हेगारी व तिचे स्वरूपही बदलू लागले आहे. पूर्वी चोरी, घरफोडीचे गुन्हे सर्वाधिक होत होते. आताही हे प्रमाण गंभीर असले तरी त्याहीपेक्षा फसवणूक, सायबर गुन्ह्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. या परिसरात बांधकाम व्यवसाय तेजीत असल्याने संघटित गुन्हेगारी टोळ्यांनीही लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याहीपेक्षा जास्त आव्हान प्रलंबित गुन्ह्यांचा उलगडा करणे व आरोपींना शोधण्याचे आहे. नवी मुंबईमध्ये १९७९ पासून मारामारी, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांमधील २२,३३० आरोपी पोलिसांना हवे आहेत. प्रलंबित गुन्ह्यांमध्ये १९९५ ते २००५ या १० वर्षांतील घटना मोठ्या प्रमाणात आहेत. आयुक्तालय क्षेत्रामध्ये फरार गुन्हेगारांच्या यादीमध्येही वाढ होत आहे. अनेक कुख्यात गुंडांचा शोध पोलीस घेत आहेत. सर्वाधिक न्हावाशेवा पोलीस ठाणे क्षेत्रातून १०० गुन्हेगार फरार घोषित आहेत, तर रबाळे पोलीस ठाणे हद्दीतून ६२ गुन्हेगार फरार आहेत. काही वर्षांपूर्वी ऐरोलीतील गुन्हेगारी पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरत होती. पंजाब व महाराष्ट्र बँकेवर दरोडा टाकणाऱ्या आरोपींनी पोलीस अधिकारी बाबासाहेब आढाव व हवालदार भिकू मारुती करडे यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये आढाव जागीच ठार झाले होते. याच परिसरात गोपाळ सैंदाने यांचीही भंगारमाफियांनी हत्या केली होती. पोलिसांना अनंत काळे, विश्वास पाटील यांची हत्या व फिनलँडमधील महिलेवरील बलात्काराच्या गुन्ह्यांमधील आरोपीही अद्याप सापडलेले नाहीत. पाहिजे असलेले व फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अनेक गुन्हेगार इतर राज्यात व विविध आयुक्तालयांत लपलेले असल्याने त्यांच्या अटकेसाठी सहकार्याचे आवाहन तिथल्या पोलीस आयुक्तालयांना करण्यात आले आहे. शिवाय फरार गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव न्यायालयाकडे पाठवला आहे.- दिलीप सावंत, गुन्हे शाखा उपायुक्त.