शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराचा सिडकोसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 03:14 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराचा प्रश्न जैसे अवस्थेत आहे. सिडको प्रशासनाने येथील गावांना स्थलांतरासाठी ७ जुलैपर्यंतची डेडलाइन दिली आहे. मात्र, मागील महिनाभरात स्थलांतराच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराचा प्रश्न जैसे अवस्थेत आहे. सिडको प्रशासनाने येथील गावांना स्थलांतरासाठी ७ जुलैपर्यंतची डेडलाइन दिली आहे. मात्र, मागील महिनाभरात स्थलांतराच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे.विमानतळबाधित दहा गावांतील सुमारे तीन हजार कुटुंबांचे वडघर, वहाळ आणि करंजाडे येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत भूखंड देण्यात आले आहेत; परंतु विविध मागण्यांसाठी काही प्रकल्पग्रस्त स्थलांतर न करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. स्थलांतराला गती मिळावी यासाठी सिडकोने प्रोत्साहन योजना सुरू केली होती. तीन टप्प्यांच्या या योजनेत स्थलांतर करणाऱ्या ग्रामस्थाला त्यांच्या जागेच्या क्षेत्रफळानुसार अतिरिक्त रक्कम देण्याचे सिडकोने जाहीर केले होते. या योजनेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. तीन हजारांपैकी आतापर्यंत सुमारे ११०० प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतरण केले आहे. उर्वरित ग्रामस्थांना स्थलांतरण करण्यासाठी ७ जुलैची अंतिम मुदत देण्यात आली होती; परंतु आता ही मुदतही आठवड्याभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्थलांतराचा प्रश्न विमानतळ मार्गात अडथळा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विमानतळ प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कंबर कसली आहे. ग्रामस्थांनी नियोजित वेळेत स्थलांतर करावे, यासाठी ते आग्रही आहेत. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांनी विमानतळबाधित ग्रामस्थांची बैठक घेतली होती. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित मागण्याही मान्य करण्यात आल्या होत्या.तसेच प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र, प्रकल्पग्रस्तांकडून त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गावांच्या स्थलांतरच्या मुद्द्यावरून सिडकोसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई