शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराचा सिडकोसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 03:14 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराचा प्रश्न जैसे अवस्थेत आहे. सिडको प्रशासनाने येथील गावांना स्थलांतरासाठी ७ जुलैपर्यंतची डेडलाइन दिली आहे. मात्र, मागील महिनाभरात स्थलांतराच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराचा प्रश्न जैसे अवस्थेत आहे. सिडको प्रशासनाने येथील गावांना स्थलांतरासाठी ७ जुलैपर्यंतची डेडलाइन दिली आहे. मात्र, मागील महिनाभरात स्थलांतराच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे.विमानतळबाधित दहा गावांतील सुमारे तीन हजार कुटुंबांचे वडघर, वहाळ आणि करंजाडे येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत भूखंड देण्यात आले आहेत; परंतु विविध मागण्यांसाठी काही प्रकल्पग्रस्त स्थलांतर न करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. स्थलांतराला गती मिळावी यासाठी सिडकोने प्रोत्साहन योजना सुरू केली होती. तीन टप्प्यांच्या या योजनेत स्थलांतर करणाऱ्या ग्रामस्थाला त्यांच्या जागेच्या क्षेत्रफळानुसार अतिरिक्त रक्कम देण्याचे सिडकोने जाहीर केले होते. या योजनेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. तीन हजारांपैकी आतापर्यंत सुमारे ११०० प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतरण केले आहे. उर्वरित ग्रामस्थांना स्थलांतरण करण्यासाठी ७ जुलैची अंतिम मुदत देण्यात आली होती; परंतु आता ही मुदतही आठवड्याभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्थलांतराचा प्रश्न विमानतळ मार्गात अडथळा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विमानतळ प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कंबर कसली आहे. ग्रामस्थांनी नियोजित वेळेत स्थलांतर करावे, यासाठी ते आग्रही आहेत. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांनी विमानतळबाधित ग्रामस्थांची बैठक घेतली होती. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित मागण्याही मान्य करण्यात आल्या होत्या.तसेच प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र, प्रकल्पग्रस्तांकडून त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गावांच्या स्थलांतरच्या मुद्द्यावरून सिडकोसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई