शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

सावरसई गावचा ‘एक गाव एक गणपती’

By admin | Updated: September 8, 2016 03:04 IST

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला व्यापक अधिष्ठान मिळावे यासाठी लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रातील विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव

दत्ता म्हात्रे, पेणभारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला व्यापक अधिष्ठान मिळावे यासाठी लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रातील विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव बघता बघता शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. या सव्वाशे वर्षात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. या उत्सवाच्या स्वरूपात आमूलाग्र्र बदल घडत गेलेले आपण पाहिले, विज्ञान तंत्रज्ञानाची भर उत्सवात पडलेली दिसून येत आहे. हा उत्सव कोट्यवधी भाविकांच्या मनमंदिरात आपले स्थान अबाधित ठेवून आहे. पेणच्या पर्यावरण क्षेत्रातील सावरसई ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा गेली २५ वर्षे अबाधित आहे. सामाजिक बांधिलकी, गावची एकता अखंडता कायम ठेवीत पाच दिवसांच्या गणरायांचे गावकरी विविध उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करतात, तेही शांतता व उत्सवाचे पावित्र्य राखून.पेण-खोपोली रस्त्यावर वसलेले सावरसई गाव. या गावाची तरुणाई, महिला मंडळ, आदिवासी समाज या सर्वांना एकत्रित घेऊन उत्सवाची परंपरा कायम राखल्याने गावाचा एकच गणपती म्हणून उत्सवाच्या पाच दिवस सबंध गावकरी उत्सवात आनंदाने सहभागी होतात. सावरसई ग्रामपंचायतीने गावच्या सांघिक शक्तीच्या जोरावर शासनाची डझनभर पारितोषिके याशिवाय सामाजिक संस्थांनीसुद्धा या गावाला आदर्श गाव म्हणून गौरविले आहे. सध्या युवा पिढीच्या हाती उत्सवाची जबाबदारी असून महिला, युवा, युवती व ज्येष्ठांच्या विचारांच्या आदान प्रदानातून उत्सवाचे नियोजन होते. सकाळी श्री आरती, प्रसाद, दुपारी स्थानिक कलाकारांची नाच गाणी, यात महिलांच्या गणपतीवर आधारित आदिवासी समाजाची लोकशक्ती, एकच बाप्पा असल्याने रात्री उत्सव सभागृहात गावकी जमा होते.इच्छाशक्ती, एकमेकांप्रती आदरभाव व गाव विकासाच्या संकल्पनेला गणेशाचा आशीर्वाद मिळतो. युवाशक्तीचे योगेश दिवेकर, मार्गदर्शक नीळकंठ दिवेकर, उपसरपंच सुरेश पाटील, चंद्रकांत दिवेकर, भगवान सावंत, महिला मंडळाच्या सारिका दिवेकर व सामाजिक राजकीय क्षेत्रातील गावचे प्रस्थ महादेव दिवेकर या सर्वांनी गाव आणि गावाचे गावपण राखले आहे.