शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

पेंटाग्राफच्या आगीमुळे झालेल्या सहा स्फोटांनी हादरले सानपाडा स्थानक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 00:28 IST

Sanpada station : गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास बेलापूरला जाणारी लोकल सानपाडा स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना घेऊन स्थानकातून बाहेर निघत असतानाच तिच्या वरच्या भागात स्फोट झाला.

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : सानपाडा रेल्वेस्थानकात गुरुवारी रात्री लोकलच्या पेंटाग्राफला लागलेल्या आगीमुळे झालेल्या सहा स्फोटांनी स्थानक हादरले होते. या स्फोटांच्या आवाजाने प्रवाशांची पळापळ सुरू झाली होती. या वेळी प्रसंगावधान राखत ऑपरेटिंग विभागाच्या एका कर्मचाऱ्याने वेळीच उद्घोषणा करायला लावल्याने संभाव्य चेंगराचेंगरी टळली. गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास बेलापूरला जाणारी लोकल सानपाडा स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना घेऊन स्थानकातून बाहेर निघत असतानाच तिच्या वरच्या भागात स्फोट झाला. यामुळे रेल्वे थांबण्यापूर्वीच प्रवाशांनी बॉम्बस्फोट झाल्याची शक्यता वर्तवत रेल्वेतून उड्या मारून पळायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच सलग दोन स्फोट झाले. यामुळे नेमके काय घडत आहे हे कळत नसल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. यादरम्यान काही जण रूळ ओलांडून पळू लागल्याने अपघाताची शक्यता होती. शिवाय रेल्वेतून बाहेर पळणाऱ्यांमध्ये महिला, लहान मुलांसह वृद्धदेखील असल्याने त्यांना दुखापतीची शक्यता होती. फलाटांवर उडालेला हा गोंधळ एका ऑपरेटिंग विभागातील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला. त्याने तत्काळ उद्घोषणा कार्यालयात जाऊन तातडीने उद्घोषणा करण्याची सूचना केली. त्यानुसार ‘पेंटाग्राफला लागलेल्या आगीमुळे स्फोट झाले असून, प्रवाशांनी घाबरू नये,’ अशी उद्घोषणा ऐकल्यानंतर प्रवाशांच्या जीवात जीव आला. यानंतर बेलापूरची लोकल गेली असता, तीनच मिनिटांत वडाळ्याला जाणारी लोकल स्थानकात प्रवेश करीत असतानाच तिच्याही पेंटाग्राफला आग लागून सलग तीन स्फोटांचा आवाज आला. त्यामुळे या लोकलमधील प्रवाशांनीही भीतीपोटी रेल्वेतून उड्या मारून पळायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा उद्घोषणा करून परिस्थिती हाताळल्याने मोठी दुर्घटना टळली. यानंतर तब्बल अर्ध्या तासाने ही लोकल स्थानकातून वडाळ्याच्या दिशेने निघाली. 

छताच्या गळतीमुळे पेंटाग्राफला आग सानपाडा स्थानकावरील छताला काही ठिकाणी फटी आहेत. त्यामधून पावसाच्या साचलेल्या पाण्याचा झरा थेट पेंटाग्राफवर पडत होता.   यामुळे पेंटाग्राफला आग  लागून स्फोट झाले.      प्रतिवर्षी पावसाळ्यात या फटींमधून पाण्याच्या धारा कोसळत असतात. यानंतरदेखील थेट पेंटाग्राफवर पडणारे पाणी कसे थांबवता येईल, याचा विचार प्रशासनाकडून झालेला नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई