शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

पेंटाग्राफच्या आगीमुळे झालेल्या सहा स्फोटांनी हादरले सानपाडा स्थानक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 00:28 IST

Sanpada station : गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास बेलापूरला जाणारी लोकल सानपाडा स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना घेऊन स्थानकातून बाहेर निघत असतानाच तिच्या वरच्या भागात स्फोट झाला.

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : सानपाडा रेल्वेस्थानकात गुरुवारी रात्री लोकलच्या पेंटाग्राफला लागलेल्या आगीमुळे झालेल्या सहा स्फोटांनी स्थानक हादरले होते. या स्फोटांच्या आवाजाने प्रवाशांची पळापळ सुरू झाली होती. या वेळी प्रसंगावधान राखत ऑपरेटिंग विभागाच्या एका कर्मचाऱ्याने वेळीच उद्घोषणा करायला लावल्याने संभाव्य चेंगराचेंगरी टळली. गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास बेलापूरला जाणारी लोकल सानपाडा स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना घेऊन स्थानकातून बाहेर निघत असतानाच तिच्या वरच्या भागात स्फोट झाला. यामुळे रेल्वे थांबण्यापूर्वीच प्रवाशांनी बॉम्बस्फोट झाल्याची शक्यता वर्तवत रेल्वेतून उड्या मारून पळायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच सलग दोन स्फोट झाले. यामुळे नेमके काय घडत आहे हे कळत नसल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. यादरम्यान काही जण रूळ ओलांडून पळू लागल्याने अपघाताची शक्यता होती. शिवाय रेल्वेतून बाहेर पळणाऱ्यांमध्ये महिला, लहान मुलांसह वृद्धदेखील असल्याने त्यांना दुखापतीची शक्यता होती. फलाटांवर उडालेला हा गोंधळ एका ऑपरेटिंग विभागातील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला. त्याने तत्काळ उद्घोषणा कार्यालयात जाऊन तातडीने उद्घोषणा करण्याची सूचना केली. त्यानुसार ‘पेंटाग्राफला लागलेल्या आगीमुळे स्फोट झाले असून, प्रवाशांनी घाबरू नये,’ अशी उद्घोषणा ऐकल्यानंतर प्रवाशांच्या जीवात जीव आला. यानंतर बेलापूरची लोकल गेली असता, तीनच मिनिटांत वडाळ्याला जाणारी लोकल स्थानकात प्रवेश करीत असतानाच तिच्याही पेंटाग्राफला आग लागून सलग तीन स्फोटांचा आवाज आला. त्यामुळे या लोकलमधील प्रवाशांनीही भीतीपोटी रेल्वेतून उड्या मारून पळायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा उद्घोषणा करून परिस्थिती हाताळल्याने मोठी दुर्घटना टळली. यानंतर तब्बल अर्ध्या तासाने ही लोकल स्थानकातून वडाळ्याच्या दिशेने निघाली. 

छताच्या गळतीमुळे पेंटाग्राफला आग सानपाडा स्थानकावरील छताला काही ठिकाणी फटी आहेत. त्यामधून पावसाच्या साचलेल्या पाण्याचा झरा थेट पेंटाग्राफवर पडत होता.   यामुळे पेंटाग्राफला आग  लागून स्फोट झाले.      प्रतिवर्षी पावसाळ्यात या फटींमधून पाण्याच्या धारा कोसळत असतात. यानंतरदेखील थेट पेंटाग्राफवर पडणारे पाणी कसे थांबवता येईल, याचा विचार प्रशासनाकडून झालेला नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई