शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

निरूपणातून समर्थ समाजनिर्मिती

By admin | Updated: May 14, 2016 01:00 IST

मानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे

जयंत धुळप, अलिबागमानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे. मानवतेपेक्षा मोठा अन्य कोणताही धर्म मानवी जीवनात नाही, असा मानवतेचा गाभा ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी विषद केला आहे.नम्रता, विश्वास, स्नेह, सहनशीलता आणि आदरभाव यांची मानवामध्ये कमतरता निर्माण झाली की, तो अमानवी वर्तनाकडे वळतो आणि मानवतावादी विचारांत असमतोल निर्माण होतो. मानवी मूल्यांच्या अस्तित्वाचाच जेव्हा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी दासबोधाच्या सोप्या मौखिक निरुपणातून विकारी मनाची मशागत करुन निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा यशस्वी प्रयत्न बैठकांच्या माध्यमातून सुरु असल्याचे ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सांगतात.बैठकीच्या माध्यमातून आध्यात्मिकतेबरोबरच वर्तमान विश्वाच्या वास्तवाचे भान ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेबांकडून प्राप्त होत असते. त्यातूनच जागतिक पर्यावरण समस्या, दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष, व्यसनाधीनता, मानवी आणि सामाजिक आरोग्य अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि आजच्या कळीच्या समस्यांचे निराकरण बैठकीच्या सदस्यांच्या माध्यमातून स्वेच्छेने होत आहे. शासकीय यंत्रणा आजवर जे लक्ष्य साध्य करु शकली नाही, ते लक्ष्य बैठक सदस्यांच्या सामूहिक श्रमदानातून साध्य झाले आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेल्या मुंबई शहराच्या स्वच्छता मोहिमेत किमान दीड लाख बैठक सदस्य सक्रिय सहभागी झाले आणि एकदा नव्हे तर दोन वेळा देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई स्वच्छ झाली. मुंबईसह राज्यातील सुमारे ८० शहरे आणि हजारो खेड्यांमध्ये याच पद्धतीने सार्वजनिक स्वच्छता झाली. मनाच्या सक्षमतेकरिता आरोग्य उत्तम असले पाहिजे आणि त्यासाठी सार्वजनिक स्वच्छता अत्यावश्यक आहे. अस्वच्छता अखेर आपणच करीत असतो परिणामी ती दूर करण्याची जबाबदारी सरकारची नव्हे तर आपलीच आहे, असा विचार बैठकांच्या माध्यमातून मनावर बिंबवल्यावर आपोआपच बैठकीतील सारे सदस्य स्वच्छतादूत बनले आणि श्रमदानातून ही सार्वजनिक स्वच्छता वास्तवात उतरली.वातावरणाचा असमतोल हा निसर्गाचा लहरीपणा आहे, असे वरकरणी आपण बोलत असतो तरी या नैसर्गिक असमतोलास मानवच कारणीभूत असल्याचा विचार डॉ.आप्पासाहेबांनी दिला आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाची महामोहीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली. बेसुमार वृक्षतोडीमुळे पावसावर परिणाम झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यातून जलदुर्भिक्ष निर्माण झाले आणि या साऱ्या समस्यांना आपण कारणीभूत असल्याने आपणच त्या समस्या सोडविल्या पाहिजेत. या विचारातून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली. वृक्ष केवळ लावायचे नाहीत तर त्यांचे संवर्धन देखील आपणच करायचे असा विचार डॉ. आप्पासाहेबांनी मनामनात रुजवला आणि लाखो सदस्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धनाची मोहीम यशस्वी झाली.