शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

निरूपणातून समर्थ समाजनिर्मिती

By admin | Updated: May 14, 2016 01:00 IST

मानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे

जयंत धुळप, अलिबागमानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे. मानवतेपेक्षा मोठा अन्य कोणताही धर्म मानवी जीवनात नाही, असा मानवतेचा गाभा ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी विषद केला आहे.नम्रता, विश्वास, स्नेह, सहनशीलता आणि आदरभाव यांची मानवामध्ये कमतरता निर्माण झाली की, तो अमानवी वर्तनाकडे वळतो आणि मानवतावादी विचारांत असमतोल निर्माण होतो. मानवी मूल्यांच्या अस्तित्वाचाच जेव्हा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी दासबोधाच्या सोप्या मौखिक निरुपणातून विकारी मनाची मशागत करुन निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा यशस्वी प्रयत्न बैठकांच्या माध्यमातून सुरु असल्याचे ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सांगतात.बैठकीच्या माध्यमातून आध्यात्मिकतेबरोबरच वर्तमान विश्वाच्या वास्तवाचे भान ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेबांकडून प्राप्त होत असते. त्यातूनच जागतिक पर्यावरण समस्या, दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष, व्यसनाधीनता, मानवी आणि सामाजिक आरोग्य अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि आजच्या कळीच्या समस्यांचे निराकरण बैठकीच्या सदस्यांच्या माध्यमातून स्वेच्छेने होत आहे. शासकीय यंत्रणा आजवर जे लक्ष्य साध्य करु शकली नाही, ते लक्ष्य बैठक सदस्यांच्या सामूहिक श्रमदानातून साध्य झाले आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेल्या मुंबई शहराच्या स्वच्छता मोहिमेत किमान दीड लाख बैठक सदस्य सक्रिय सहभागी झाले आणि एकदा नव्हे तर दोन वेळा देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई स्वच्छ झाली. मुंबईसह राज्यातील सुमारे ८० शहरे आणि हजारो खेड्यांमध्ये याच पद्धतीने सार्वजनिक स्वच्छता झाली. मनाच्या सक्षमतेकरिता आरोग्य उत्तम असले पाहिजे आणि त्यासाठी सार्वजनिक स्वच्छता अत्यावश्यक आहे. अस्वच्छता अखेर आपणच करीत असतो परिणामी ती दूर करण्याची जबाबदारी सरकारची नव्हे तर आपलीच आहे, असा विचार बैठकांच्या माध्यमातून मनावर बिंबवल्यावर आपोआपच बैठकीतील सारे सदस्य स्वच्छतादूत बनले आणि श्रमदानातून ही सार्वजनिक स्वच्छता वास्तवात उतरली.वातावरणाचा असमतोल हा निसर्गाचा लहरीपणा आहे, असे वरकरणी आपण बोलत असतो तरी या नैसर्गिक असमतोलास मानवच कारणीभूत असल्याचा विचार डॉ.आप्पासाहेबांनी दिला आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाची महामोहीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली. बेसुमार वृक्षतोडीमुळे पावसावर परिणाम झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यातून जलदुर्भिक्ष निर्माण झाले आणि या साऱ्या समस्यांना आपण कारणीभूत असल्याने आपणच त्या समस्या सोडविल्या पाहिजेत. या विचारातून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली. वृक्ष केवळ लावायचे नाहीत तर त्यांचे संवर्धन देखील आपणच करायचे असा विचार डॉ. आप्पासाहेबांनी मनामनात रुजवला आणि लाखो सदस्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धनाची मोहीम यशस्वी झाली.