शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

निरूपणातून समर्थ समाजनिर्मिती

By admin | Updated: May 14, 2016 01:00 IST

मानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे

जयंत धुळप, अलिबागमानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे. मानवतेपेक्षा मोठा अन्य कोणताही धर्म मानवी जीवनात नाही, असा मानवतेचा गाभा ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी विषद केला आहे.नम्रता, विश्वास, स्नेह, सहनशीलता आणि आदरभाव यांची मानवामध्ये कमतरता निर्माण झाली की, तो अमानवी वर्तनाकडे वळतो आणि मानवतावादी विचारांत असमतोल निर्माण होतो. मानवी मूल्यांच्या अस्तित्वाचाच जेव्हा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी दासबोधाच्या सोप्या मौखिक निरुपणातून विकारी मनाची मशागत करुन निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा यशस्वी प्रयत्न बैठकांच्या माध्यमातून सुरु असल्याचे ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सांगतात.बैठकीच्या माध्यमातून आध्यात्मिकतेबरोबरच वर्तमान विश्वाच्या वास्तवाचे भान ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेबांकडून प्राप्त होत असते. त्यातूनच जागतिक पर्यावरण समस्या, दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष, व्यसनाधीनता, मानवी आणि सामाजिक आरोग्य अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि आजच्या कळीच्या समस्यांचे निराकरण बैठकीच्या सदस्यांच्या माध्यमातून स्वेच्छेने होत आहे. शासकीय यंत्रणा आजवर जे लक्ष्य साध्य करु शकली नाही, ते लक्ष्य बैठक सदस्यांच्या सामूहिक श्रमदानातून साध्य झाले आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेल्या मुंबई शहराच्या स्वच्छता मोहिमेत किमान दीड लाख बैठक सदस्य सक्रिय सहभागी झाले आणि एकदा नव्हे तर दोन वेळा देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई स्वच्छ झाली. मुंबईसह राज्यातील सुमारे ८० शहरे आणि हजारो खेड्यांमध्ये याच पद्धतीने सार्वजनिक स्वच्छता झाली. मनाच्या सक्षमतेकरिता आरोग्य उत्तम असले पाहिजे आणि त्यासाठी सार्वजनिक स्वच्छता अत्यावश्यक आहे. अस्वच्छता अखेर आपणच करीत असतो परिणामी ती दूर करण्याची जबाबदारी सरकारची नव्हे तर आपलीच आहे, असा विचार बैठकांच्या माध्यमातून मनावर बिंबवल्यावर आपोआपच बैठकीतील सारे सदस्य स्वच्छतादूत बनले आणि श्रमदानातून ही सार्वजनिक स्वच्छता वास्तवात उतरली.वातावरणाचा असमतोल हा निसर्गाचा लहरीपणा आहे, असे वरकरणी आपण बोलत असतो तरी या नैसर्गिक असमतोलास मानवच कारणीभूत असल्याचा विचार डॉ.आप्पासाहेबांनी दिला आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाची महामोहीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली. बेसुमार वृक्षतोडीमुळे पावसावर परिणाम झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यातून जलदुर्भिक्ष निर्माण झाले आणि या साऱ्या समस्यांना आपण कारणीभूत असल्याने आपणच त्या समस्या सोडविल्या पाहिजेत. या विचारातून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली. वृक्ष केवळ लावायचे नाहीत तर त्यांचे संवर्धन देखील आपणच करायचे असा विचार डॉ. आप्पासाहेबांनी मनामनात रुजवला आणि लाखो सदस्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धनाची मोहीम यशस्वी झाली.