शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निरूपणातून समर्थ समाजनिर्मिती

By admin | Updated: May 14, 2016 01:00 IST

मानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे

जयंत धुळप, अलिबागमानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे. मानवतेपेक्षा मोठा अन्य कोणताही धर्म मानवी जीवनात नाही, असा मानवतेचा गाभा ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी विषद केला आहे.नम्रता, विश्वास, स्नेह, सहनशीलता आणि आदरभाव यांची मानवामध्ये कमतरता निर्माण झाली की, तो अमानवी वर्तनाकडे वळतो आणि मानवतावादी विचारांत असमतोल निर्माण होतो. मानवी मूल्यांच्या अस्तित्वाचाच जेव्हा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी दासबोधाच्या सोप्या मौखिक निरुपणातून विकारी मनाची मशागत करुन निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा यशस्वी प्रयत्न बैठकांच्या माध्यमातून सुरु असल्याचे ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सांगतात.बैठकीच्या माध्यमातून आध्यात्मिकतेबरोबरच वर्तमान विश्वाच्या वास्तवाचे भान ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेबांकडून प्राप्त होत असते. त्यातूनच जागतिक पर्यावरण समस्या, दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष, व्यसनाधीनता, मानवी आणि सामाजिक आरोग्य अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि आजच्या कळीच्या समस्यांचे निराकरण बैठकीच्या सदस्यांच्या माध्यमातून स्वेच्छेने होत आहे. शासकीय यंत्रणा आजवर जे लक्ष्य साध्य करु शकली नाही, ते लक्ष्य बैठक सदस्यांच्या सामूहिक श्रमदानातून साध्य झाले आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेल्या मुंबई शहराच्या स्वच्छता मोहिमेत किमान दीड लाख बैठक सदस्य सक्रिय सहभागी झाले आणि एकदा नव्हे तर दोन वेळा देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई स्वच्छ झाली. मुंबईसह राज्यातील सुमारे ८० शहरे आणि हजारो खेड्यांमध्ये याच पद्धतीने सार्वजनिक स्वच्छता झाली. मनाच्या सक्षमतेकरिता आरोग्य उत्तम असले पाहिजे आणि त्यासाठी सार्वजनिक स्वच्छता अत्यावश्यक आहे. अस्वच्छता अखेर आपणच करीत असतो परिणामी ती दूर करण्याची जबाबदारी सरकारची नव्हे तर आपलीच आहे, असा विचार बैठकांच्या माध्यमातून मनावर बिंबवल्यावर आपोआपच बैठकीतील सारे सदस्य स्वच्छतादूत बनले आणि श्रमदानातून ही सार्वजनिक स्वच्छता वास्तवात उतरली.वातावरणाचा असमतोल हा निसर्गाचा लहरीपणा आहे, असे वरकरणी आपण बोलत असतो तरी या नैसर्गिक असमतोलास मानवच कारणीभूत असल्याचा विचार डॉ.आप्पासाहेबांनी दिला आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाची महामोहीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली. बेसुमार वृक्षतोडीमुळे पावसावर परिणाम झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यातून जलदुर्भिक्ष निर्माण झाले आणि या साऱ्या समस्यांना आपण कारणीभूत असल्याने आपणच त्या समस्या सोडविल्या पाहिजेत. या विचारातून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली. वृक्ष केवळ लावायचे नाहीत तर त्यांचे संवर्धन देखील आपणच करायचे असा विचार डॉ. आप्पासाहेबांनी मनामनात रुजवला आणि लाखो सदस्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धनाची मोहीम यशस्वी झाली.