शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाला मुख्यमंत्र्यांचा सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:51 IST

मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यांच्या त्यागावर आज नवी मुंबई हे अत्याधुनिक शहर उभारले आहे. देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच शहरात उभारले जात आहे. या प्रकल्पासाठीही स्थानिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर दहा गांवाचे चक्क स्थलांतरण करण्यात आले. त्यामुळे या विमानतळाच्या उभारणीचे सर्व श्रेय स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या त्यागाला सलाम केला.स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठे पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. पनवेल तालुक्यातील उलवे येथे २२६८ हेक्टर जागेवर सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जात आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. नवी मुंबई विमानतळासाठी ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी दहा गावे स्थलांतरित केली जाणार असल्याने या गावांचे मूळ अस्तित्व संपुष्टात येणार आहे. स्थलांतरित होणाºया गावांचे वहाळ आणि वडघर येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर ज्यांच्या केवळ जमिनी संपादित केल्या आहेत, त्यांच्यासाठी नियोजित पुष्पकनगरमध्ये २२.५ टक्के विकसित भूखंड दिले आहेत. विमानतळ प्रकल्पाला आपल्या जमिनी देणाºया प्रकल्पग्रस्तांना सर्वोच्च पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. शहराच्या विकासाला मिळणारी गती, भावी पिढीच्या उत्कर्षाचा मार्ग आदी स्तरावर प्रकल्पग्रस्तांचे प्रबोधन करण्यात राज्य सरकार आणि सिडकोला यश आले. त्याचाच परिणाम म्हणून १०७१ नंतर पुन्हा आपल्या जमिनीचा त्याग करून प्रकल्पग्रस्तांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला.तसेच देशातील सर्वात मोठे जेएनपीटी बंदर प्रकल्पग्रस्तांच्याच जमिनीवर उभारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या त्यागाची जाणीव ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव केला.पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून सिडकोसंदर्भातील प्रकल्पग्रस्तांचा पूर्वानुभव फारसा चांगला नाही. पाल्यांना नोकरी, शैक्षणिक सुविधा, साडेबारा टक्के विकसित भूखंड, गावठाण विस्तार, गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे आदी प्रश्नांसाठी प्रकल्पग्रस्तांना आजही संघर्ष करावा लागत आहे. विमानतळ प्रकल्पपूर्ण झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाचा राज्य सरकारला विसर पडू नये, असे सर्वसामान्यांचा सूर आहे.