शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी फळ मार्केटमध्ये गांजा विक्री

By admin | Updated: July 30, 2016 04:44 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मार्केटमध्ये नवी मुंबईमधील सर्वात मोठा गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. येथील अमली

- नामदेव मोरे, नवी मुंबई

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मार्केटमध्ये नवी मुंबईमधील सर्वात मोठा गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. येथील अमली पदार्थ विक्रेत्यांनी तुर्भे, इंदिरानगर व इतर परिसरामध्येही दुकाने थाटली असून या अवैध व्यवसायाकडे बाजार समितीचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख होती. परंतु बाजार समिती प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे येथील फळ व भाजी मार्केट गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. मार्केटमध्ये दोन हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार विनापरवाना वास्तव्य करत आहेत. या कामगारांची कोणाकडेच नोंद नाही. ज्या व्यापाऱ्यांच्या गाळ्यात ते राहतात त्यांच्याकडेही त्यांची नावे व पत्ते उपलब्ध नाहीत. मार्केटमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाकडे बाजार समितीचा परवाना असणे आवश्यक असते. परंतु बाजार समितीकडेही या कामगारांची नोंद नाही. चोवीस तास मार्केटमध्ये ठाण मांडलेल्या या कामगारांमध्ये यापूर्वी बांगलादेशीही सापडले आहेत. दोन महिन्यापूर्वीही येथून बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामधील अनेक कामगारांना अमली पदार्थांचे व्यसन लागले आहे. त्यांना गांजा पुरविण्याचे दोन मोठे अड्डे तयार झाले आहेत. यामधील एक भाजी मार्केटच्या गेटच्या बाहेरील सार्वजनिक शौचालय व दुसरा फळ मार्केटच्या मागील गेटजवळील छोट्या अनधिकृत मंदिरामध्ये गांजा विकला जात आहे. १०० रुपयांना दहा ग्रॅमची पुडी विकली जात आहे. ‘लोकमत’च्या टीमने या ठिकाणी जावून गांजा खरेदी करून विक्रेत्यांशी संवाद साधला असता आमच्याकडे चोवीस तास गांजा मिळतो, असे सांगण्यात आले. मंदिराजवळ कोणालाही विचारले तरी ते आम्ही कुठे आहोत ते सांगतील, असे या विक्रेत्यांनी सांगितले. येथील राजू नावाचा विक्रेता गांजा पुरविण्याचे काम करत असून त्यानेच तुर्भेनाका व इंदिरानगरमध्ये गांजा विक्रीचे अड्डे सुरू केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. बाजार समितीच्या फळ मार्केटमधील सुरक्षा व्यवस्थाच धोक्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत २५ पेक्षा जास्त पत्रे बाजार समिती प्रशासनाला दिली आहेत. मार्केटमध्ये विनापरवाना परप्रांतीय कामगार मुक्काम करत आहेत. यामध्ये वारंवार विदेशी नागरिक आढळून आले आहेत. अशीच स्थिती राहिली तर अतिरेकी कारवाई करणारेही मार्केटमध्ये आश्रय घेण्याची भीती व्यक्त केली आहे. गुप्तचर विभागानेही मार्केटमध्ये देशविरोधी कारवाई करणाऱ्या व्यक्ती आश्रय घेवू शकतात असा अहवाल दिला आहे. खुलेआम गांजाची विक्री फळ मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून गांजा विक्री होत आहे. गांजा कोण विकते व कुठे विकला जातो हे मार्केटमधील सर्वांनाच माहीत आहे. फळ बाजाराच्या मागील बाजूला एपीएमसीचे दोन सुरक्षा रक्षक २४ तास बसलेले असतात. त्यांच्याच समोर गांजाची विक्री होत आहे. परंतु कोणीच आक्षेप घेत नाही. पोलीसही कारवाई करत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दारूचे तीन अड्डे उद्ध्वस्ततुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकून दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. रमेश कॉरीजवळ, श्रमिक नगर व इंदिरा नगर याठिकाणी हे अवैध दारूचे अड्डे चालत होते. याची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने सदर तिन्ही ठिकाणी छापा टाकून तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६५ बाटल्या अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. परप्रांतीय कामगारांचे आश्रयस्थानबाजार समितीच्या नियमाप्रमाणे मार्केटमध्ये काम करणारे व्यापारी, कामगार, वाहतूकदार व खरेदीदारांकडे मार्केट प्रवेशाचा परवाना असणे आवश्यक आहे. परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून दोन हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार फळ बाजारामध्ये मुक्काम करत आहेत. अनेकजण मार्केटच्या बाहेर काम करतात परंतु रात्री मुक्कामाला येथे येत आहेत. यामधील अनेकजण व्यसनांच्या आहारी गेले आहेत. शहरातील सर्वात जास्त गांजा विक्री या ठिकाणी होत असून विक्रेत्यांनी परप्रांतीय कामगारांना लक्ष्य केले आहे. बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये कोणताही अवैध प्रकार होत असल्यास त्यावर कारवाई केली जाईल. स्वत: मार्केटमधील स्थितीची पाहणी करणार असून चुकीच्या गोष्टी निदर्शनास येताच तत्काळ कारवाई केली जाईल. - शिवाजी पहीनकर, सचिव, एपीएमसी