शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

आरटीआयच्या अर्जातून ‘जनहितार्थ’ उद्देशाला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:43 IST

चौकशीची गरज; वैयक्तिक वादातून ‘अर्थकारणाची’ मागवली जातेय माहिती

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : माहिती अधिकार अर्जाच्या आडून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. त्यात बांधकामाशी संबंधित सर्वाधिक अर्जा$चा समावेश आहे. अशा जनहितार्थ नसलेल्या अर्जाची चौकशी पोलिसांमार्फत झाल्यास खंडणीबहाद्दर समोर येण्याची दाट शक्यता आहे.केवळ वैयक्तिक हेव्या-दाव्यातून माहिती अधिकाराचे अर्ज करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडत आहेत. त्यात एकाच गोष्टीवर एकापेक्षा अनेक अर्ज टाकून संबंधिताला त्रास देण्याचे प्रकार सर्वाधिक घडत आहेत. यावरून माहिती अधिकाराचा सर्वाधिक वापर जनहितार्थ ऐवजी वैयक्तिक स्वार्थासाठी होत असल्याचे उघड दिसत आहे. अशाच कथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या अर्जाच्या भडिमारामुळे पालिकेचे अधिकारी त्रस्त झाले आहेत. २०१९ मध्ये पालिकेकडे एकूण ६,०९२ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर चालू वर्षात एप्रिल अखेरपर्यंत १,२७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज अतिक्रमण विभागाशी संबंधित आहेत. २०१९ मध्ये पालिकेकडे एकूण प्राप्त अर्जांपैकी २,०८१ अर्ज हे केवळ अतिक्रमण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यात परिमंडळ एक मध्ये १,०७१ व परिमंडळ दोनमध्ये १,०१० अर्जाचा समावेश आहे. त्यानंतर, नगररचना विभागाकडे १,०९२ अर्ज प्राप्त झाले आहेत.नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात विनापरवाना व वाढीव बांधकाम होत आहेत. त्यांची माहिती मागवून संबंधिताला कारवाईची भीती दाखविण्यासाठी माहिती अधिकाराचा सर्रास वापर होत आहे. अशाच प्रकरणांमधून शहरात विभागनिहाय माहिती अधिकार कार्यकर्ते तयार झाले आहेत. त्यांच्याकडून वैयक्तिक द्वेषातून अथवा मिळालेल्या टिपवरून एखाद्या व्यक्तीवर राग काढण्यासाठी पालिका, तसेच सिडकोकडे माहिती अधिकाराच्या अर्जाचा भडिमार होत आहे. त्यातूनही समाधान न झाल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडून हित साधण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारांनी पालिका अधिकारी त्रस्त झाले आहेत.शहरात सर्वच प्राधिकारणांकडे प्राप्त होणाºया अर्जाची पोलिसांमार्फत चौकशीची मागणी होऊ लागली आहे. प्रत्येक अर्जाचा उद्देश शुद्ध आहे का, त्यात जनतेचे हित साध्य झाले का, अशा बाबींची चौकशी झाल्यास केवळ ब्लॅकमेलिंगसाठी बनलेले शेकडो आरटीआय कार्यकर्ते उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शहरातील व्यावसायिकांचा एक गट पोलीस आयुक्तांना भेटण्याच्या तयारीत आहे.बांधकामाशी संबंधित माहिती जास्तमार्च महिन्यापासून नवी मुंबईत लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योग व कामकाज ठप्प असताना माहिती अधिकाराच्या अर्जाचा भडिमार सुरूच होता. त्याद्वारे एप्रिलअखेरपर्यंत १,२७५ अर्ज मिळाले आहेत. त्यातही बांधकामाशी संबंधित अर्जाचा सर्वाधिक समावेश आहे.वैयक्तिक वादातून एखाद्या व्यावसायिकांच्या जागेबाबत सातत्याने सिडको, तसेच पालिकेकडे आरटीआय अर्ज करून मनस्ताप दिला जात आहे. त्यावरून सर्वच आरटीआय कार्यकर्त्यांच्या अर्जामागचा उद्देश पोलिसांमार्फत तपासला जावा, अशी मागणी होत आहे.पालिकेकडे प्राप्त अर्जविभाग वर्ष २०१९अतिक्रमण २०८१नगररचना १०९२अभियांत्रिकी ७५३आरोग्य ३३५शिक्षण १२८अग्निशमन ११८

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकार