शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात ३८ कोटींची उधळपट्टी; ठेकेदार, अधिकाऱ्यांचे संगनमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:38 IST

विजेचे खांब बदलण्यासाठी प्रस्ताव, कोरोनामुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. एप्रिलपासून जीएसटीचे अनुदानही महापालिकेला मिळालेले नाही. अशा परिस्थितीतही महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत दहा कोटीपेक्षा अधिक खर्च केला आहे.

नवी मुंबई : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक व आरोग्य विषयक खर्च वगळता इतर कोणतेही कामे करू नयेत, अशा अशयाचे परिपत्रक राज्य सरकारने मे महिन्यात जारी केले आहे. परंतु या परिपत्रकाला केराची टोपली दाखवत महापालिकेने विद्युत खांबे बदलण्याच्या कामासाठी तब्बल ३८ कोटी ३३ लाख रूपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटात महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेल्या या उधळपट्टीबाबत शहरातील सुजाण नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या २४ हजारांच्या घरात गेली आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडाही धडकी भरविणारा आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वोत्परी प्रयत्न केले जात आहेत. कोविडमध्ये शहरवासियांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यादृष्टीने महापालिकेकडून सर्वकष प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे संकट आणखी किती काळ असेल, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे पुढील काही महिने तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परोकोटीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेला मोठ्या निधीची गरज आहे. ही वस्तुस्थिती असताना सध्या कोणतीही गरज नसताना केवळ विद्युत खांबे बदलण्यासाठी महापालिकेच्या संबधित विभागाकडून तब्बल ३८ कोटींच्या निविदा मागविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. एप्रिलपासून जीएसटीचे अनुदानही महापालिकेला मिळालेले नाही. अशा परिस्थितीतही महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत दहा कोटीपेक्षा अधिक खर्च केला आहे. तसेच वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यासाठी आणखी २0 कोटींच्या निधीची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता आतापासूनच काटकसर केली नाही, तर भविष्यात महापालिकेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारने ४ मे २0२0 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोविड व्यतिरिक्त अत्यावश्यक सुविधांवर एकूण नियोजित खर्चापैकी केवळ ३३ टक्के खर्च करण्याचे सुचित केले आहे. असे असतानाही महापालिकेतील काही अधिकारी आणि ठेकेदार असलेल्या माजी नगरसेवकांनी संगनमत करून विद्युत खांबे बदलण्याच्या नावाखाली ३८ कोटी ३३ लाख रूपयांचा अनावश्यक खर्च करण्याचा घाट घातल्याचा आरोप केला जात आहे. हा संपूर्ण खर्च बेलापूर, नेरूळ, तुर्भे आणि वाशी या चार विभागातील पदपथावरील विद्युत खांबे बदलण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकरणी लक्ष घालून विद्युत खांबे बदलण्याच्या अनावश्यक खर्चाला स्थगीती द्यावी, अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे.विद्युत खांब बदलण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा महापालिकेत मी येण्यापूर्वी काढल्या असाव्यात, तरी त्याबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल. - अभिजीत बांगर आयुक्त, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका