शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

कोरोनाच्या संकटात ३८ कोटींची उधळपट्टी; ठेकेदार, अधिकाऱ्यांचे संगनमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:38 IST

विजेचे खांब बदलण्यासाठी प्रस्ताव, कोरोनामुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. एप्रिलपासून जीएसटीचे अनुदानही महापालिकेला मिळालेले नाही. अशा परिस्थितीतही महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत दहा कोटीपेक्षा अधिक खर्च केला आहे.

नवी मुंबई : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक व आरोग्य विषयक खर्च वगळता इतर कोणतेही कामे करू नयेत, अशा अशयाचे परिपत्रक राज्य सरकारने मे महिन्यात जारी केले आहे. परंतु या परिपत्रकाला केराची टोपली दाखवत महापालिकेने विद्युत खांबे बदलण्याच्या कामासाठी तब्बल ३८ कोटी ३३ लाख रूपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटात महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेल्या या उधळपट्टीबाबत शहरातील सुजाण नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या २४ हजारांच्या घरात गेली आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडाही धडकी भरविणारा आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वोत्परी प्रयत्न केले जात आहेत. कोविडमध्ये शहरवासियांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यादृष्टीने महापालिकेकडून सर्वकष प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे संकट आणखी किती काळ असेल, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे पुढील काही महिने तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परोकोटीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेला मोठ्या निधीची गरज आहे. ही वस्तुस्थिती असताना सध्या कोणतीही गरज नसताना केवळ विद्युत खांबे बदलण्यासाठी महापालिकेच्या संबधित विभागाकडून तब्बल ३८ कोटींच्या निविदा मागविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. एप्रिलपासून जीएसटीचे अनुदानही महापालिकेला मिळालेले नाही. अशा परिस्थितीतही महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत दहा कोटीपेक्षा अधिक खर्च केला आहे. तसेच वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यासाठी आणखी २0 कोटींच्या निधीची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता आतापासूनच काटकसर केली नाही, तर भविष्यात महापालिकेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारने ४ मे २0२0 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोविड व्यतिरिक्त अत्यावश्यक सुविधांवर एकूण नियोजित खर्चापैकी केवळ ३३ टक्के खर्च करण्याचे सुचित केले आहे. असे असतानाही महापालिकेतील काही अधिकारी आणि ठेकेदार असलेल्या माजी नगरसेवकांनी संगनमत करून विद्युत खांबे बदलण्याच्या नावाखाली ३८ कोटी ३३ लाख रूपयांचा अनावश्यक खर्च करण्याचा घाट घातल्याचा आरोप केला जात आहे. हा संपूर्ण खर्च बेलापूर, नेरूळ, तुर्भे आणि वाशी या चार विभागातील पदपथावरील विद्युत खांबे बदलण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकरणी लक्ष घालून विद्युत खांबे बदलण्याच्या अनावश्यक खर्चाला स्थगीती द्यावी, अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे.विद्युत खांब बदलण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा महापालिकेत मी येण्यापूर्वी काढल्या असाव्यात, तरी त्याबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल. - अभिजीत बांगर आयुक्त, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका