शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अवैध पार्किंगचा गोरखधंदा तेजीत, वाहतूक विभागाची ‘अर्थपूर्ण’ चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:22 IST

शहरात अवैध पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नवी मुंबई : शहरात अवैध पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: अवजड वाहनांनी आता थेट वसाहतीअंतर्गत रस्त्यावर शिरकाव केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे दळणवळण यंत्रणा कोलमडू लागली आहे. वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. लहान-मोठे अपघात घडत आहेत. या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांच्या अर्थपूर्ण छुप्पीमुळे अवैध पार्किंगचा हा गोरखधंदा तेजीत आल्याचे चित्र सायबर सिटीत पाहावयास मिळत आहे.मागील दोन दशकांत नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. लोकसंख्येच्या वाढीबरोबर येथील उद्योगधंदेही वाढीस लागले, त्यानुसार वाहनांची संख्याही वाढली आहे. शहर उभारताना पार्किंगचे सुयोग्य नियोजन झाले नाही. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. रस्ते अपुरे पडू लागले आहेत. पार्किंगच्या सुविधा नसल्याने वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने उभी करीत आहेत. प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत अरुंद रस्तेही आता वाहनांच्या पार्किंगला अपुरे पडू लागले आहेत. या रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात आहेत. मागील काही महिन्यांपासून नागरी वसाहतीतील अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांचा वावर दिसू लागला आहे. यात ट्रक, टँकर, मोठे ट्रेलर, खासगी बसेस, ट्रॅव्हल्सच्या गाड्या आदीचा समावेश आहे. अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असतानाही नागरी वसाहतीतील रस्त्यांवर या गाड्यांच्या रांगा दिसून येतात. नागरी वसाहतीतील रस्त्यांवर अवजड वाहने पार्क केल्याने त्या परिसरातील दळणवळणाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. स्कूलबस आणि रुग्णवाहिकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ तुर्भे येथे आहे. या बाजारपेठेत महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून दरदिवशी कृषिमालाची शेकडो वाहने येतात. या वाहनांच्या पार्किंगसाठीसेक्टर १९ येथे विस्तीर्ण ट्रक टर्मिनल बनविण्यात आले आहेत; परंतु आता हे ट्रक टर्मिनलही अपुरे पडू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून एपीएमसी परिसरातील रस्त्यांवर ट्रक पार्क केले जात आहेत. आता तर या अवजड वाहनांनी आजूबाजूच्या नागरी वसाहतीतील रस्त्यांवर आपला विस्तार वाढविला आहे. या परिस्थितीला वेळीच निर्बंध घातले गेले नाहीत, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम शहरवासीयांना भोगावे लागतील, अशी भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.दरम्यान, तुर्भे नाका येथे अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगच्या विरोधात स्वावलंबी सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बी. वाघमारे यांनी रविवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. संबंधित विभागाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी उपोषण मागे घेतले. असे असेल तरी येत्या काळात अजवड वाहनांच्या पार्र्किंगची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.>वाहतूक पोलिसांच्या भूमिकेविषयी संभ्रमनो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून तत्परतेने कारवाई केली जाते. मात्र, त्याच वेळी वसाहतीअंतर्गत अरुंद रस्त्यावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. यात मोठे अर्थकारण असल्याचीही चर्चा आहे. या रॅकेटमध्ये काही दलाल सक्रिय आहेत. त्यांच्यामार्फत वाहनधारकांकडून महिन्याला ठरावीक रक्कम वसूल केली जाते. वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलीस ठाणे, महापालिकेतील संबंधित अधिकारी व स्थानिक पुढाऱ्यांपर्यंत ही रक्कम पोहोचविली जाते. ही रक्कम लाखोंच्या घरात असल्याची माहिती सूत्राने दिली.>लोकप्रतिनिधींची उदासीनतामागील २० वर्षांपासून या समस्येकडे सत्ताधाºयांनी दुर्लक्ष केले. लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनानेही या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. याचा परिणाम म्हणून आज या समस्येने आक्राळ स्वरूप धारण केले आहे.