शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

रस्ते, पदपथांवर होणार ६३४ कोटी रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:05 IST

अर्थसंकल्पात १५४ कामांचा समावेश : एमआयडीसीलाही प्राधान्य

नामदेव मोरे 

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील तब्बल ६३४ कोटी रुपये अडथळामुक्त रस्ते व पदपथ बांधण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. एमआयडीसीमधील रस्त्यांसाठीही २२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पामबीच रस्त्याला लागून सायकल ट्रॅकही प्रस्तावित केला आहे.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी अर्थसंकल्पात मोठ्या प्रकल्पांऐवजी अत्यावश्यक सुविधांना प्राधान्य दिले आहे.

शहरवासीयांना अडथळामुक्त रस्ते व पदपथ उपलब्ध व्हावेत यावर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वाधिक खर्च या कामांसाठी होणार आहे. वास्तविक महापालिकेच्या प्रत्येक अर्थसंकल्पात या कामांना झुकते माप दिले जाते. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. नागरिक व लोकप्रतिनिधींकडूनही याच कामांची मागणी असते. मागील काही वर्षांमध्ये अडथळामुक्त पदपथांना प्राधान्य दिले जात आहे. पण प्रत्यक्षात अनेक पदपथांचा चालण्यासाठी वापरच करता येत नाही.काही ठिकाणी पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे सर्व खर्च व्यर्थ जात आहे. शहरातील रस्त्यांचे काम व मलनि:सारण वाहिनी, जलवाहिनी, मोबाइल कंपन्या व इतर कंपन्यांचे काम यामध्ये समन्वय नसतो. यामुळे महापालिका रस्ता बनविते. मात्र बनविलेला रस्ता विविध कारणांसाठी खोदला जातो व पुन्हा तोच रस्ता बनविण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. या वर्षी बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, घणसोली, दिघा व एमआयडीसी परिसरात तब्बल १५४ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यासाठी ६३४ कोटी ३१ लाख रुपयांची तरतूद केली आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये या कामांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

पामबीच रोड हा शहरातील सर्वांत महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याला लागून सायकल ट्रॅक बनविणे प्रस्तावित आहे. या कामासाठी १९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पालिकेने यापूर्वी तुर्भे व वाशीमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. पुढील वर्षभरामध्ये नेरूळ परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून त्यासाठी ९५ कोटींची तरतूद केली आहे. ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कामांनाही प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. या परिसरामध्ये अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. काही कामे पूर्ण झाली असून काही सुरू आहेत. शिल्लक कामे पुढील वर्षभरामध्ये पूर्ण केली जाणार असून त्यासाठी जवळपास २२८ कोटी खर्च होणार आहेत.रस्ते व पदपथांच्या कामांचा तपशीलविभाग प्रस्तावित कामे अपेक्षित खर्च (कोटी)बेलापूर २९ ३९.१९नेरूळ ६ १३७वाशी ४९ ८१.०८तुर्भे, सानपाडा ३४ ४०.४८घणसोली १२ २२.४१दिघा, ऐरोली ११ ८५.१७एमआयडीसी १३ २२८.९४प्रत्यक्ष पाहणी व्हावीमहापालिकेने अडथळामुक्त पदपथ या उपक्रमाअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पदपथ तयार केले आहेत. परंतु अनेक ठिकाणी पदपथांवर गॅरेज, फेरीवाले व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. पदपथांचा वापर चालण्यासाठी होत नसल्याने पालिकेचा खर्च व्यर्थ गेला आहे. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या कामांचे सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईroad safetyरस्ते सुरक्षा