शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

नेरळ बसस्थानकाजवळ रस्त्याची चाळण, रस्त्यावर बनले तळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:18 IST

रस्त्यावर बनले तळे : आंदोलने करूनही परिस्थिती जैसे थे

नेरळ : शहराच्या पूर्व भागात असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटी स्थानक येथे येणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण व्हावे, यासाठी नेरळ एसटी स्थानकातून रिक्षा वाहतूक करणारे रिक्षाचालक, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषण केले होते. दरम्यान, उपोषण सोडताना रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी वर्गाने रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन फोल ठरल्याने वाहनचालक आणि एसटी गाड्यांना रस्ता पार करणे कठीण होऊन बसले आहे.

नेरळ-कळंब रस्त्याने नेरळ एसटी स्टॅण्डकडे जाणारा रस्ता असून त्या रस्त्याने नेरळ रेल्वे स्टेशन आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र हेदेखील आहेत. मात्र, त्या रस्त्याने राज्य परिवहन मंडळाच्या एसटी गाड्या कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात जात असतात. त्या एसटी गाड्या दिवसभरात असंख्य फेऱ्या मारत असतात. त्या एसटी स्थानक आणि नेरळ रेल्वे स्थानक या ठिकाणी पोहोचण्यासाठी ग्रामीण भागातील किमान ४५-५० गावांतील लोक हे ये -जा करीत असतात. मात्र, त्या रस्त्याने वाहतूक करणे रस्त्यावरील खड्ड्यांनी कठीण होऊन बसले आहे. कारण या ४०० मीटर रस्त्याचे गेल्या अनेक वर्षांत अखंड डांबरीकरण करण्यात आले नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या या रस्त्यावरून किमान २०० रिक्षा प्रवाशांच्या सेवेत असतात.या स्थानकातून कळंब आणि कशेळेपर्यंत या एसटी स्थानकातून रिक्षा आणि व्हॅन या गाड्या प्रवासी वाहतूक करीत असतात. त्या सर्व गाड्या नेरळ-कळंब या मुख्य रस्त्याला येण्यासाठी जो मार्ग पकडतात, त्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून हे खड्डे अनेक वर्षांपासून तसेच आहेत. गतवर्षी रिक्षाचालकांनी रस्त्यावरील खड्डे स्वत:च्या खर्चाने भरले होते, तर जिल्हा परिषदेने रस्त्याचे काम करताना डांबरीकरण न करता ते थेट काँक्रीटचा रस्ता करावा, अशी मागणी रिक्षाचालक करीत आहेत.वर्षापासून मागणी करूनदेखील जिल्हा परिषद लक्ष देत नसल्याने जानेवारी २०१९ मध्ये येथील रिक्षाचालकांनी उपोषण केले होते. एक दिवस तर २०० हून अधिक रिक्षांनी वाहतूक बंद केली होती, तर दुसºया दिवशी रात्री उशिरा रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी येऊन लेखी पत्र देऊन उपोषण सोडले होते. त्या वेळी रायगड जिल्हा परिषदेने आश्वासन दिल्याप्रमाणे नेरळ एसटी स्टॅण्डकडे जाणाºया रस्त्याचे काँक्रीटचे काम आजपर्यंत सुरू केले नाही. ४०० मीटरचा रस्ता तयार करण्याची कार्यवाही केली जाईल हे आश्वासन देणारे रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. ए. केदार हे निवृत्तही झाले आहेत, त्यामुळे उपोषणकर्त्यांची फसवणूक झाली असून, आज रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणेही कठीण होऊन गेले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला खोलगट भाग यामुळे वाहने खड्डे चुकविताना थेट शेतात जात आहेत.त्यामुळे रस्त्याची गरज असताना जिल्हा परिषद बांधकाम विभाग काहीही करण्याच्या स्थितीत नसल्याने रस्त्याने वाहतूक करणारे वाहनचालक आणि रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत.आम्ही रस्ता व्हावा, म्हणून उपोषणे केली; पण केवळ आश्वासन दिले, तीदेखील पाळली नाहीत. त्यामुळे आमच्या भावनांचा खेळ अधिकारी वर्गाने मांडला असून, आम्ही आता याहून मोठे आंदोलन करू.- श्रावण जाधव,अध्यक्ष,जय मल्हार रिक्षा संघटनाआम्ही सर्व कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषदेकडे पाठवली आहेत, त्यांच्याकडून ते मंजूर होऊन आल्यास रस्त्याचे काम होईल.- पी. गोपणे,शाखा अभियंता,बांधकाम विभाग,रायगड जिल्हा परिषद

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNavi Mumbaiनवी मुंबई