शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

निकृष्ट नालेसफाईमुळे पुराचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:23 IST

माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी करून छायाचित्रांसह वस्तुस्थिती आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही. नाल्यांमध्ये गाळ कायम असून, पावसाळ्यात पुन्हा पूरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरी वसाहतीसह एमआयडीसीतील कारखान्यांमध्येही पाणी जाण्याची शक्यता आहे. माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी करून छायाचित्रांसह वस्तुस्थिती आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.नवी मुंबई मनपा क्षेत्रामध्ये दिवा ते दिवाळे दरम्यान खाली किनारा व दिघा ते बेलापूर दरम्यान डोंगर रांग अशी निसर्गाची देणगी लाभली आहे. पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. या वर्षी नालेसफाईची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. नाल्यांमधील गाळ तसाच आहे. अनेक ठिकाणी पात्र अरुंद झाले आहे. गतवर्षी मुसळधार पावसाचे पाणी बोनसरी व इतर ठिकाणी नागरी वसाहतीमध्ये गेले होते. काही कारखान्यांमध्येही पाणी शिरले होते. यामुळे या वर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची दुरुस्ती, गाळ काढणे ही कामे करण्याची मागणी केली होती. प्रशासनानेही कामे केल्याचे सांगितले होते. माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी एमआयडीसी परिसराचा दौरा केला असता, कामे निकृष्ट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.औद्योगिक वसाहतीमधील नाल्यांची छायाचित्रे व कामांविषयी वस्तुस्थिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. निकृष्ट कामांमुळे पावसाळ्यात कारखान्यांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले, तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही माजी उपमहापौरांनी दिला आहे. याविषयी आता प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.>पावसाळापूर्व नालेसफाईची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ तसाच असून, पावसाचे पाणी कारखाने व नागरी वसाहतीमध्ये जाण्याची शक्यता आहे. याविषयी सर्व छायाचित्रे आयुक्तांना पाठविली आहेत. निकृष्ट कामांमुळे काही नुकसान झाल्यास, त्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार असणार आहे.- मंदाकिनी रमाकांत म्हात्रेमाजी उपमहापौर