शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ओव्हरलोड वाहनांमुळे अपघाताचा धोका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:48 IST

उलवेतील रहिवासी त्रस्त : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : मालवाहतूक वाहनांमधून होणारी ओव्हरलोड वाहतूक अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे. अशातच उलवे परिसरातील रहिवासी भागातून ही वाहने भरधाव वेगात जात असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. परंतु, तक्रार करूनदेखील कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.उलवे परिसरातून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यात बांधकामाचे साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. मात्र, ही वाहतूक करताना डम्परमधून क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जात आहे. शिवाय, नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केली जाणारी खडी, माती, दगड बंदिस्त करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, परिसरात धूलिकण पसरून मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे. याचा नाहक त्रास ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे उघडपणे नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या वाहतुकीला आळा घालण्याची मागणी उलवेतील सिडको प्रकल्पग्रस्त हक्कप्राप्ती समितीचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी वाहतूक पोलीस व आरटीओकडे केली होती. मात्र, तक्रार केल्यानंतर केवळ चौकशी करून प्रत्यक्षात कारवाईकडे दुर्लक्ष होतअसल्याचा आरोप केला आहे.

रस्त्यांची दयनीय अवस्थाक्षमतेपेक्षा जास्त माल भरून धावणाऱ्या डम्परमुळे परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटली आहेत. त्यामुळे सुविधांवरदेखील त्याचा परिणाम उमटत आहे. तर, ही मालवाहतूक कुठून कुठे होते, याचादेखील उलगडा अद्याप झालेला नसून आवश्यक कागदपत्रेदेखील वाहनचालकांकडे नसतात. त्यामुळे उल्वेवासीयांच्या जीविताला धोकादायक ठरणारी ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी होत आहे.