शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

भूमिपुत्रांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे - दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 06:49 IST

नवी मुंबईसह कोकणातील भूमिपुत्रांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे. आगरी - कोळी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई - नवी मुंबईसह कोकणातील भूमिपुत्रांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे. आगरी - कोळी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्यावतीने नेरूळमधील रामलीला मैदानामध्ये आयोजित आगरी-कोळी महोत्सवात केसरकर बोलत होते. या महोत्सवातून भूमिपुत्रांची संस्कृती व परंपरा जोपासण्याचे काम सुरू आहे. अशाप्रकारचे महोत्सव सर्व ठिकाणी झाले पाहिजेत. या महोत्सवातून संस्कृती रक्षणासह गृहउद्योगांना चालना मिळत असते. नवी मुंबईसह कोकणातील भूमिपुत्रांच्या हक्काचे रक्षण झाले पाहिजे. नवी मुंबईच्या विकासामध्येही भूमिपुत्रांचे योगदान मोठे आहे. स्थानिकांचे पारंपरिक व्यवसाय टिकले पाहिजेत. आम्ही कोकणामध्ये फिशरी व्हिलेजची संकल्पना राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.एका गावामध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू असून तो यशस्वी झाल्यानंतर इतर ठिकाणीही तो राबविला जाईल.शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनीही आगरी-कोळी महोत्सवामुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर पडली असल्याचे सांगितले. स्थानिक कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी सांगितले.आगरी-कोळी महोत्सवात महाराष्ट्राच्या लोककलांचे दर्शन होत असल्याचे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. आयोजक नामदेव भगत यांनी महोत्सवाचे आयोजन व १२ वर्षांच्या वाटचालीविषयी माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे बेलापूर मतदार संघाचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, नगरसेवक शिवराम पाटील, द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी, रंगनाथ औटी, शहर प्रमुख विजय माने, दिलीप घोडेकर, पूनम पाटील, अमित पाटील, मिथुन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.भूमिपुत्रांच्या त्यागावर नवी मुंबई उभी राहिली आहे. आगरी-कोळी समाजाचे सांस्कृतिक वैभव शहरवासीयांना समजावे यासाठी १२ वर्षांपासून महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यामध्ये स्थानिक संस्कृतीबरोबर महाराष्ट्रातील लोककलांची माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत.- नामदेव भगत, आयोजकसंस्कृती रक्षणाचा प्रयत्ननवी मुंबईमधील आगरी-कोळी नागरिकांनी त्यांची संस्कृती व लोककला प्राणपणाने जपल्या आहेत. गावातील प्रत्येक मंदिरामध्ये नियमित भजनाचे आयोजन केले जाते. लोकगीते, लोकनृत्याचेही आयोजन केले जात आहे. १२ दिवसांच्या महोत्सवामध्ये नवरी नटली, याल तर हसाल, दर्या हाय आमचा राजा, कीर्तन, महाराष्ट्र लावणी, मराठी लोकगीते, स्थानिक कलावंतांचे गुणदर्शन कार्यक्रम, नाचान रंगला कोळीवाडा व इतर कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई