शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

भूमिपुत्रांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे - दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 06:49 IST

नवी मुंबईसह कोकणातील भूमिपुत्रांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे. आगरी - कोळी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई - नवी मुंबईसह कोकणातील भूमिपुत्रांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे. आगरी - कोळी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्यावतीने नेरूळमधील रामलीला मैदानामध्ये आयोजित आगरी-कोळी महोत्सवात केसरकर बोलत होते. या महोत्सवातून भूमिपुत्रांची संस्कृती व परंपरा जोपासण्याचे काम सुरू आहे. अशाप्रकारचे महोत्सव सर्व ठिकाणी झाले पाहिजेत. या महोत्सवातून संस्कृती रक्षणासह गृहउद्योगांना चालना मिळत असते. नवी मुंबईसह कोकणातील भूमिपुत्रांच्या हक्काचे रक्षण झाले पाहिजे. नवी मुंबईच्या विकासामध्येही भूमिपुत्रांचे योगदान मोठे आहे. स्थानिकांचे पारंपरिक व्यवसाय टिकले पाहिजेत. आम्ही कोकणामध्ये फिशरी व्हिलेजची संकल्पना राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.एका गावामध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू असून तो यशस्वी झाल्यानंतर इतर ठिकाणीही तो राबविला जाईल.शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनीही आगरी-कोळी महोत्सवामुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर पडली असल्याचे सांगितले. स्थानिक कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी सांगितले.आगरी-कोळी महोत्सवात महाराष्ट्राच्या लोककलांचे दर्शन होत असल्याचे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. आयोजक नामदेव भगत यांनी महोत्सवाचे आयोजन व १२ वर्षांच्या वाटचालीविषयी माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे बेलापूर मतदार संघाचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, नगरसेवक शिवराम पाटील, द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी, रंगनाथ औटी, शहर प्रमुख विजय माने, दिलीप घोडेकर, पूनम पाटील, अमित पाटील, मिथुन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.भूमिपुत्रांच्या त्यागावर नवी मुंबई उभी राहिली आहे. आगरी-कोळी समाजाचे सांस्कृतिक वैभव शहरवासीयांना समजावे यासाठी १२ वर्षांपासून महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यामध्ये स्थानिक संस्कृतीबरोबर महाराष्ट्रातील लोककलांची माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत.- नामदेव भगत, आयोजकसंस्कृती रक्षणाचा प्रयत्ननवी मुंबईमधील आगरी-कोळी नागरिकांनी त्यांची संस्कृती व लोककला प्राणपणाने जपल्या आहेत. गावातील प्रत्येक मंदिरामध्ये नियमित भजनाचे आयोजन केले जाते. लोकगीते, लोकनृत्याचेही आयोजन केले जात आहे. १२ दिवसांच्या महोत्सवामध्ये नवरी नटली, याल तर हसाल, दर्या हाय आमचा राजा, कीर्तन, महाराष्ट्र लावणी, मराठी लोकगीते, स्थानिक कलावंतांचे गुणदर्शन कार्यक्रम, नाचान रंगला कोळीवाडा व इतर कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई