शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

रिक्षाचोरी करणारी टोळी अटकेत

By admin | Updated: January 5, 2016 02:07 IST

रिक्षांची चोरी करून त्यामध्ये बदल करून वापरणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

नवी मुंबई : रिक्षांची चोरी करून त्यामध्ये बदल करून वापरणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या २१ रिक्षा जप्त केल्या असून, त्यापैकी ७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. चोरलेल्या रिक्षांचे चेसीस नंबर मिटवून त्यावर बनावट चेसीस नंबर टाकण्यात ही टोळी सराईत आहे.नवी मुंबई परिसरात रिक्षाचोरीचे प्रमाण वाढले असून, चोरीच्या रिक्षा इतरत्र वापरल्या जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त दिलीप सावंत, साहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजण जगताप यांचे पथक अधिक तपास करीत होते. तपासादरम्यान चोरीच्या रिक्षा मुंब्रा परिसरात वापरल्या जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानुसार साहाय्यक निरीक्षक प्रतापराव कदम, उपनिरीक्षक पडळकर यांच्या पथकाने मुंब्रा येथे सापळा रचला होता. त्यामध्ये अब्दुल खान ऊर्फ बटलाभाई (४०) व बाकर रिझवी (४८) हे दोघे त्यांच्या हाती लागले. चौकशीत त्यांच्याकडील रिक्षा चोरीची असून तिचा मूळ चेसीस नंबर मिटवून बनावट चेसीस नंबर कोरल्याचे आढळून आले. शिवाय मूळ रिक्षामध्ये थोडाफार बदल करून बनावट नंबरप्लेट लावून ही रिक्षा वापरली जात होती. याप्रकरणी त्यांना अटक केली असता, त्यांनी कासीम रिझवी (४०), मुकीन खान (२४) व फुरकान खान (२८) या तिघांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे या तिघांनाही मुंब्रा व लगतच्या परिसरात सापळा रचून अटक केली. यावेळी कासीम रिझवी या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. तो नवी मुंबईसह ठाणे परिसरातून रिक्षांची चोरी करीत असे. चोरलेल्या रिक्षा काही दिवस लपवून ठेवल्यानंतर तो रिक्षाचा मूळ चेसीस नंबर मिटवून त्याजागी बनावट नंबर कोरायचा. शिवाय रिक्षाच्या वूड व सीटमध्ये बदल करून बनावट नंबर प्लेटच्या आधारे त्या रिक्षा वापरासाठी बाहेर काढत असे. त्यापैकी काही रिक्षा भाड्याने वापरासाठी तर काही रिक्षांची तो विक्रीही करायचा. मात्र चोरीच्या रिक्षा वापरत असतानाही बनावट चेसीस नंबरमुळे त्या रिक्षा चोरीच्या असल्याचे अद्याप उघड झाले नव्हते. अखेर नवी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे हा प्रकार उघड झाला. तसेच त्यांच्याकडून चोरीच्या २१ रिक्षा जप्त करण्यातही तपास पथकाला यश आले आहे. सुमारे २१ लाखांच्या या चोरीच्या रिक्षा आहेत. त्यापैकी सात गुन्ह्यांची उकल झाली असून, ५ नवी मुंबईतले तर दोन मीरा रोड व मानपाडा परिसरातील असल्याचे अपर आयुक्त विजय चव्हाण यांनी सांगितले. तर त्यांच्याकडून रिक्षाचोरीचे इतरही अनेक प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.